शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

बिटी बियाण्यांना संकरितचा दर्जा द्यावा; राज्य कृषी आयुक्तालयाचा केंद्राला प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 15:27 IST

कपाशीवरील बोंडअळीच्या हल्ल्याने बिटी बियाण्यांची पोलखोल झाली आहे. त्यामुळे या बिटी बियाण्यांना आता संकरित बियाणे म्हणून विक्रीस मान्यता द्यावी, असा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने राज्य शासनामार्फत केंद्र सरकारला सादर केला आहे. त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देकपाशी बियाण्यांच्या एक कोटी ६० लाख पाकिटांची विक्री

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : कपाशीवरील बोंडअळीच्या हल्ल्याने बिटी बियाण्यांची पोलखोल झाली आहे. त्यामुळे या बिटी बियाण्यांना आता संकरित बियाणे म्हणून विक्रीस मान्यता द्यावी, असा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने राज्य शासनामार्फत केंद्र सरकारला सादर केला आहे. त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.राज्यात ४२ लाख सहा हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीचा पेरा होतो. त्यासाठी बिटी बियाण्यांची एक कोटी ६० लाख पाकिटे दरवर्षी खरीप हंगाम विकली जातात. त्यातील एकट्या विदर्भाचा वाटा सुमारे ७३ लाख पाकिटांचा असतो. यावर्षी मात्र कपाशीच्या बियाण्यातील बिटी जीनचा पर्दाफाश झाला आहे. या बियाण्यातील जीन बिटीचे कामच करीत नसल्याचे बोंडअळीच्या आक्रमणाने सिद्ध केले. ४० लाख हेक्टरपैकी बहुतांश क्षेत्रात बोंडअळीने हल्ला केला आहे. त्याबाबत शासन स्तरावर एक लाख दोन हजार २१२ शेतकऱ्यांच्या तक्रारींची नोंद झाली असली तरी प्रत्यक्षात दहा लाखांवर शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याचे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनने स्पष्ट केले आहे. बोंडअळीच्या आक्रमणामुळे शेतकऱ्यांचे १४ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. कंपन्यांनी बिटी ऐवजी हायब्रीड व नॉनबिटी बियाण्यांची विक्री तर केली नाही ना असा संशयही व्यक्त केला जात आहे.

बियाण्यांचे ११० नमुने अप्रमाणितकृषी खात्याने घेतलेल्या नमुन्यांपैकी कापूस बियाण्यांचे ११० नमुने अप्रमाणित आढळून आले आहे. या प्रकरणात संबंधित कंपन्या व विक्रेत्यांवर न्यायालयात खटलेही दाखल केले गेले.

कृषी आयुक्तांचा केंद्राकडे प्रस्तावदरम्यान बिटी बियाण्यांबाबत वाढत्या तक्रारी व शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता पुण्याच्या कृषी आयुक्तांनी या बियाण्यांचा बिटीचा दर्जाच काढून घेण्याची जोरदार मागणी केली आहे. या बिटी बियाण्यांना संकरित बियाणे म्हणून विक्रीस मान्यता देण्याची विनंती केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव राज्य शासनाने दिल्लीत सादरही केला आहे.

कापूस संशोधन संस्थेचाही जोरनागपुरातील कापूस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केंद्र शासनाला पाठविलेल्या अहवालात बिटी बियाणे बंद करून हायब्रीड बियाणे विक्रीची परवानगी मागितल्याची माहिती आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास कपाशी बियाण्यांची किंमती अर्ध्यावर येऊ शकतात. त्यामुळे कपाशीचा उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळू शकतो.

टॅग्स :agricultureशेती