शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

बिटी बियाण्यांना संकरितचा दर्जा द्यावा; राज्य कृषी आयुक्तालयाचा केंद्राला प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 15:27 IST

कपाशीवरील बोंडअळीच्या हल्ल्याने बिटी बियाण्यांची पोलखोल झाली आहे. त्यामुळे या बिटी बियाण्यांना आता संकरित बियाणे म्हणून विक्रीस मान्यता द्यावी, असा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने राज्य शासनामार्फत केंद्र सरकारला सादर केला आहे. त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देकपाशी बियाण्यांच्या एक कोटी ६० लाख पाकिटांची विक्री

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : कपाशीवरील बोंडअळीच्या हल्ल्याने बिटी बियाण्यांची पोलखोल झाली आहे. त्यामुळे या बिटी बियाण्यांना आता संकरित बियाणे म्हणून विक्रीस मान्यता द्यावी, असा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने राज्य शासनामार्फत केंद्र सरकारला सादर केला आहे. त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.राज्यात ४२ लाख सहा हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीचा पेरा होतो. त्यासाठी बिटी बियाण्यांची एक कोटी ६० लाख पाकिटे दरवर्षी खरीप हंगाम विकली जातात. त्यातील एकट्या विदर्भाचा वाटा सुमारे ७३ लाख पाकिटांचा असतो. यावर्षी मात्र कपाशीच्या बियाण्यातील बिटी जीनचा पर्दाफाश झाला आहे. या बियाण्यातील जीन बिटीचे कामच करीत नसल्याचे बोंडअळीच्या आक्रमणाने सिद्ध केले. ४० लाख हेक्टरपैकी बहुतांश क्षेत्रात बोंडअळीने हल्ला केला आहे. त्याबाबत शासन स्तरावर एक लाख दोन हजार २१२ शेतकऱ्यांच्या तक्रारींची नोंद झाली असली तरी प्रत्यक्षात दहा लाखांवर शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याचे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनने स्पष्ट केले आहे. बोंडअळीच्या आक्रमणामुळे शेतकऱ्यांचे १४ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. कंपन्यांनी बिटी ऐवजी हायब्रीड व नॉनबिटी बियाण्यांची विक्री तर केली नाही ना असा संशयही व्यक्त केला जात आहे.

बियाण्यांचे ११० नमुने अप्रमाणितकृषी खात्याने घेतलेल्या नमुन्यांपैकी कापूस बियाण्यांचे ११० नमुने अप्रमाणित आढळून आले आहे. या प्रकरणात संबंधित कंपन्या व विक्रेत्यांवर न्यायालयात खटलेही दाखल केले गेले.

कृषी आयुक्तांचा केंद्राकडे प्रस्तावदरम्यान बिटी बियाण्यांबाबत वाढत्या तक्रारी व शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता पुण्याच्या कृषी आयुक्तांनी या बियाण्यांचा बिटीचा दर्जाच काढून घेण्याची जोरदार मागणी केली आहे. या बिटी बियाण्यांना संकरित बियाणे म्हणून विक्रीस मान्यता देण्याची विनंती केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव राज्य शासनाने दिल्लीत सादरही केला आहे.

कापूस संशोधन संस्थेचाही जोरनागपुरातील कापूस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केंद्र शासनाला पाठविलेल्या अहवालात बिटी बियाणे बंद करून हायब्रीड बियाणे विक्रीची परवानगी मागितल्याची माहिती आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास कपाशी बियाण्यांची किंमती अर्ध्यावर येऊ शकतात. त्यामुळे कपाशीचा उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळू शकतो.

टॅग्स :agricultureशेती