शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

मुलगी विकत घेऊनच करावे लागते लग्न

By admin | Updated: January 17, 2017 01:17 IST

विकासाचे दावे करणाऱ्या मध्य प्रदेशात उपवर मुलींची संख्या घटली. तेथील उपवर मुले आयुष्यभर अविवाहित राहण्याच्या भीतीने अखेर महाराष्ट्रातील मुली चक्क विकत घेत आहेत.

अपहरणप्रकरण : आरोपींची धक्कादायक कबुली सुरेंद्र राऊत यवतमाळविकासाचे दावे करणाऱ्या मध्य प्रदेशात उपवर मुलींची संख्या घटली. तेथील उपवर मुले आयुष्यभर अविवाहित राहण्याच्या भीतीने अखेर महाराष्ट्रातील मुली चक्क विकत घेत आहेत. पण हा सौदा सहजासहजी होत नाही. त्यासाठी स्थानिकांना हाताशी धरून गरिबांच्या मुलींचे अपहरण केले जाते. अशाच प्रकरणात दोन तरुणांना शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या कबुलीजबाबतून हे विदारक सामाजिक वास्तव पुढे आले आहे.‘स्थानिक समाजात लग्नासाठी मुलीच मिळत नाही. राज्याबाहेरून अपहरण करून आणलेल्या मुलींशी विवाह करण्याशिवाय पर्यायच नाही.’ अशी धक्कादायक कबुली अटकेतील तरुणांनी पोलिसांपुढे दिली. मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील तरणा येथील या तरुणांवर अपहरण, अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. मनोज बन्सीला कसेरा (२३) आणि महेश गोविंद कसेरा (२५) अशी या आरोपींची नावे आहेत.या तरुणांनी यवतमाळातील दोघींचे अपहरण करून त्यांच्याशी लग्न केले. दोन्ही मुलींची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय हालाखीची आहे. यातील एक तर तब्बल वर्षभरापासून घरी आली नाही. याबाबत तिच्या आईवडीलांनीसुद्धा साधी विचारपूस केली नाही. अशाही स्थितीत तिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन ब्यूटीपार्लरचा डिप्लोमा केला. सुतगिरणीत काम करतानाच तिची ओळख एका तरुणीशी झाली. या दोन्ही मुली एका मोठ्या टोळीची सदस्य असलेल्या महिलेच्या संपर्कात आल्या. याच महिलेने चार साथीदारांच्या मदतीने या दोघीेंचे अपहरण करून मनोज आणि महेशला विकल त्यानंतर विवाह केला. यातील महेश हा हलवाईचे (मिठाई बनवितो) काम करतो. तर मनोज गॅरेजमध्ये कामाला आहे. त्याने लग्न केलेली तरणी सहा महिन्यांची गर्भवती आहे. या दोघांनी कौटुंबिक जबाबदारी पूर्ण केल्याचेही पोलिसांना सांगितले. एकीची प्रकृती वारंवार बिघडत असल्याने तिचा चांगल्या डॉक्टरकडे उपचार सुरू असल्याचे महेशने सांगितले. या दोघांवरही गंभीर गुन्हे दाखल झाल्याने त्यांची सुटका होणे शक्य नाही. दरवर्षी गावात अशा पद्धतीच्या विवाहामुळे अनेक तरूणांना तुरूंगात जावे लागत असल्याचेही त्यांनी कबूल केले. सक्तीचे मातृत्वविवाहासाठी मुलीच मिळत नसल्याने मध्य प्रदेशात जातीपातीच्या भिंती केव्हाच कोसळल्या आहेत. तेथे थेट मुलगी विकत घेऊन लग्न लावले जाते. त्यानंतर ही मुलगी त्याच कुटुंबातील सदस्य बनून राहते. लग्नानंतर मुलगी पळून जाऊ नये म्हणून पहिल्याच वर्षी मूल होण्याचा आग्रह धरला जातो.