शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

मुलगी विकत घेऊनच करावे लागते लग्न

By admin | Updated: January 17, 2017 01:17 IST

विकासाचे दावे करणाऱ्या मध्य प्रदेशात उपवर मुलींची संख्या घटली. तेथील उपवर मुले आयुष्यभर अविवाहित राहण्याच्या भीतीने अखेर महाराष्ट्रातील मुली चक्क विकत घेत आहेत.

अपहरणप्रकरण : आरोपींची धक्कादायक कबुली सुरेंद्र राऊत यवतमाळविकासाचे दावे करणाऱ्या मध्य प्रदेशात उपवर मुलींची संख्या घटली. तेथील उपवर मुले आयुष्यभर अविवाहित राहण्याच्या भीतीने अखेर महाराष्ट्रातील मुली चक्क विकत घेत आहेत. पण हा सौदा सहजासहजी होत नाही. त्यासाठी स्थानिकांना हाताशी धरून गरिबांच्या मुलींचे अपहरण केले जाते. अशाच प्रकरणात दोन तरुणांना शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या कबुलीजबाबतून हे विदारक सामाजिक वास्तव पुढे आले आहे.‘स्थानिक समाजात लग्नासाठी मुलीच मिळत नाही. राज्याबाहेरून अपहरण करून आणलेल्या मुलींशी विवाह करण्याशिवाय पर्यायच नाही.’ अशी धक्कादायक कबुली अटकेतील तरुणांनी पोलिसांपुढे दिली. मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील तरणा येथील या तरुणांवर अपहरण, अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. मनोज बन्सीला कसेरा (२३) आणि महेश गोविंद कसेरा (२५) अशी या आरोपींची नावे आहेत.या तरुणांनी यवतमाळातील दोघींचे अपहरण करून त्यांच्याशी लग्न केले. दोन्ही मुलींची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय हालाखीची आहे. यातील एक तर तब्बल वर्षभरापासून घरी आली नाही. याबाबत तिच्या आईवडीलांनीसुद्धा साधी विचारपूस केली नाही. अशाही स्थितीत तिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन ब्यूटीपार्लरचा डिप्लोमा केला. सुतगिरणीत काम करतानाच तिची ओळख एका तरुणीशी झाली. या दोन्ही मुली एका मोठ्या टोळीची सदस्य असलेल्या महिलेच्या संपर्कात आल्या. याच महिलेने चार साथीदारांच्या मदतीने या दोघीेंचे अपहरण करून मनोज आणि महेशला विकल त्यानंतर विवाह केला. यातील महेश हा हलवाईचे (मिठाई बनवितो) काम करतो. तर मनोज गॅरेजमध्ये कामाला आहे. त्याने लग्न केलेली तरणी सहा महिन्यांची गर्भवती आहे. या दोघांनी कौटुंबिक जबाबदारी पूर्ण केल्याचेही पोलिसांना सांगितले. एकीची प्रकृती वारंवार बिघडत असल्याने तिचा चांगल्या डॉक्टरकडे उपचार सुरू असल्याचे महेशने सांगितले. या दोघांवरही गंभीर गुन्हे दाखल झाल्याने त्यांची सुटका होणे शक्य नाही. दरवर्षी गावात अशा पद्धतीच्या विवाहामुळे अनेक तरूणांना तुरूंगात जावे लागत असल्याचेही त्यांनी कबूल केले. सक्तीचे मातृत्वविवाहासाठी मुलीच मिळत नसल्याने मध्य प्रदेशात जातीपातीच्या भिंती केव्हाच कोसळल्या आहेत. तेथे थेट मुलगी विकत घेऊन लग्न लावले जाते. त्यानंतर ही मुलगी त्याच कुटुंबातील सदस्य बनून राहते. लग्नानंतर मुलगी पळून जाऊ नये म्हणून पहिल्याच वर्षी मूल होण्याचा आग्रह धरला जातो.