शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

मुलगी विकत घेऊनच करावे लागते लग्न

By admin | Updated: January 17, 2017 01:17 IST

विकासाचे दावे करणाऱ्या मध्य प्रदेशात उपवर मुलींची संख्या घटली. तेथील उपवर मुले आयुष्यभर अविवाहित राहण्याच्या भीतीने अखेर महाराष्ट्रातील मुली चक्क विकत घेत आहेत.

अपहरणप्रकरण : आरोपींची धक्कादायक कबुली सुरेंद्र राऊत यवतमाळविकासाचे दावे करणाऱ्या मध्य प्रदेशात उपवर मुलींची संख्या घटली. तेथील उपवर मुले आयुष्यभर अविवाहित राहण्याच्या भीतीने अखेर महाराष्ट्रातील मुली चक्क विकत घेत आहेत. पण हा सौदा सहजासहजी होत नाही. त्यासाठी स्थानिकांना हाताशी धरून गरिबांच्या मुलींचे अपहरण केले जाते. अशाच प्रकरणात दोन तरुणांना शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या कबुलीजबाबतून हे विदारक सामाजिक वास्तव पुढे आले आहे.‘स्थानिक समाजात लग्नासाठी मुलीच मिळत नाही. राज्याबाहेरून अपहरण करून आणलेल्या मुलींशी विवाह करण्याशिवाय पर्यायच नाही.’ अशी धक्कादायक कबुली अटकेतील तरुणांनी पोलिसांपुढे दिली. मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील तरणा येथील या तरुणांवर अपहरण, अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. मनोज बन्सीला कसेरा (२३) आणि महेश गोविंद कसेरा (२५) अशी या आरोपींची नावे आहेत.या तरुणांनी यवतमाळातील दोघींचे अपहरण करून त्यांच्याशी लग्न केले. दोन्ही मुलींची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय हालाखीची आहे. यातील एक तर तब्बल वर्षभरापासून घरी आली नाही. याबाबत तिच्या आईवडीलांनीसुद्धा साधी विचारपूस केली नाही. अशाही स्थितीत तिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन ब्यूटीपार्लरचा डिप्लोमा केला. सुतगिरणीत काम करतानाच तिची ओळख एका तरुणीशी झाली. या दोन्ही मुली एका मोठ्या टोळीची सदस्य असलेल्या महिलेच्या संपर्कात आल्या. याच महिलेने चार साथीदारांच्या मदतीने या दोघीेंचे अपहरण करून मनोज आणि महेशला विकल त्यानंतर विवाह केला. यातील महेश हा हलवाईचे (मिठाई बनवितो) काम करतो. तर मनोज गॅरेजमध्ये कामाला आहे. त्याने लग्न केलेली तरणी सहा महिन्यांची गर्भवती आहे. या दोघांनी कौटुंबिक जबाबदारी पूर्ण केल्याचेही पोलिसांना सांगितले. एकीची प्रकृती वारंवार बिघडत असल्याने तिचा चांगल्या डॉक्टरकडे उपचार सुरू असल्याचे महेशने सांगितले. या दोघांवरही गंभीर गुन्हे दाखल झाल्याने त्यांची सुटका होणे शक्य नाही. दरवर्षी गावात अशा पद्धतीच्या विवाहामुळे अनेक तरूणांना तुरूंगात जावे लागत असल्याचेही त्यांनी कबूल केले. सक्तीचे मातृत्वविवाहासाठी मुलीच मिळत नसल्याने मध्य प्रदेशात जातीपातीच्या भिंती केव्हाच कोसळल्या आहेत. तेथे थेट मुलगी विकत घेऊन लग्न लावले जाते. त्यानंतर ही मुलगी त्याच कुटुंबातील सदस्य बनून राहते. लग्नानंतर मुलगी पळून जाऊ नये म्हणून पहिल्याच वर्षी मूल होण्याचा आग्रह धरला जातो.