शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

किसान सन्मानधनाच्या पोर्टलवर घाटी शिवार बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:27 IST

१९८ शेतकरी वंचित : घाटंजी तहसीलवर संतप्त शेतकऱ्यांची धडक (फोटो) घाटंजी : शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री ...

१९८ शेतकरी वंचित : घाटंजी तहसीलवर संतप्त शेतकऱ्यांची धडक

(फोटो)

घाटंजी : शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री सन्मानधन योजना सुरू केली. मात्र या योजनेच्या पोर्टलवर घाटंजी तालुक्यातील घाटी शिवाराची नोंदच नाही. त्यामुळे तब्बल १९८ शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून मदतीला मुकले आहेत. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी तहसील कार्यालयावर धडक देऊन प्रशासनावर रोष व्यक्त केला.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना २०१९ मध्ये लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक मदत देण्यात येते. मात्र या लाभापासून घाटी शिवारातील १९८ शेतकरी वंचित असून, घाटी हे नाव या योजनेच्या पोर्टलवरच नाही. त्यामुळे तेथील सर्व शेतकरी वंचित आहेत. मात्र इतरही योजनांपासून वंचित आहेत.

पोर्टलवर नाव येण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने दिली; मात्र कार्यवाही झाली नाही. उलट कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त धीरज कुमार यांचा या योजनेसाठी उत्कृष्ट काम केल्यामुळे सत्कार केला गेला. परंतु, वंचित शेतकऱ्यांचे काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी केला. घाटी येथील शेतकरी सर्व योजनांपासून वंचित राहात आहेत. घाटीचे नाव लवकरात लवकर पोर्टलवर उपलब्ध व्हायला हवे व सर्व प्रलंबित शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे २०१९ पासून आतापर्यंत पैसे व इतर सर्व नुकसानभरपाई करून द्यावी अन्यथा आंदोलनासाठी तयार रहावे, असा इशारा महेश पवार यांनी दिला. यावेळी शेतकरी राजेश जाधव, केशव बोंद्रे, पांडुरंग भोयर, कृष्णराव सिंगेवार, नामदेव निमनकार, संजय बोंद्रे, अवधूत चौरागडे, विकास फुसे, लक्ष्मण गिरी, अरविंद गोरे, नागोराव सावसाकडे, जाफर इमाम खा पठाण, राजेश ठाकरे, संजय सावसाकडे, गोविंदा साखरकर, माया मंगाम, सुमन कनाके, मधुकर पेटेवार, जुबेर मिया देशमुख, शेखचंद कुरेशी, वासुदेव सिडाम, विष्णू शिंदे, मारुती नखाते, विठ्ठल शेंद्रे, दादाराव उदार, नीलेश भूत उपस्थित होते.

कोट

एका वर्षापूर्वी निवेदन देऊनसुद्धा प्रशासनाला जाग येत नाही. जेव्हापासून योजना डिजिटल झाल्या आहेत. तेव्हापासून जास्तीत जास्त वेळेस आम्ही वंचितच राहिलो. कारण पोर्टलवर घाटी नावच नाही. किसान सन्मान निधीपासून मदत मिळेल, अशी अपेक्षा केली. मात्र तिथेसुद्धा काहीच नाही.

- राजेश जाधव, वंचित शेतकरी, घाटी