शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

जिल्हा परिषदेत गुरूजनांच्या कार्याचा गौरव

By admin | Updated: September 7, 2016 01:32 IST

सतत नवनवीन उपक्रम राबवून ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या तब्बल ३१ गुरूंचा मंगळवारी जिल्हा परिषदेने शाल,....

यवतमाळ : सतत नवनवीन उपक्रम राबवून ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या तब्बल ३१ गुरूंचा मंगळवारी जिल्हा परिषदेने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. यात १७ जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार व १४ शिक्षकांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय प्रवेशोत्सव, जाहिरात बनवा पटसंख्या वाढवा स्पर्धेतील यशस्वी शिक्षकांचाही गौरव करण्यात आला.पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि प्रशस्तिपत्र देऊन जिल्हा परिषदेच्या सभागृहात गौरविण्यात आले. यात गजानन तुरारे, रामभाऊ बोलवार, चंद्रशेखर तिखे, कैलास गव्हाणकर, महादेव निमकर, गोविंद घाडगे, विजय जाचक, विनोद डंभारे, आमिन चव्हाण, विजय कडू, गणेश अर्जापुरे, देविदास बोंडे, गणेश निकोले, वंदना केने, फरीद अहमद खान रशीद खान, प्रशांत गवळी, तर माध्यमिकच्या विणा सुनील शहाडे यांचा गौरव करण्यात आला.याशिवाय किसन भुरके, प्रसाद देशपांडे, विजय विश्वकर्मा, नंदू चव्हाण, जगदीश खाडे, संजय गडपायले, गजानन भगत, घनश्याम पाटील, शंकर इंगळे, कमलकिशोर कदम, पुष्पा गेडाम, सुरेश कुंभलकर, गणपत गाऊत्रे आणि मोरेश्वर पुंडशास्त्री यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.या सर्वांना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, समाज कल्याण सभापती लता खांदवे, महिला व बालकल्याण सभापती विमल चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर आदींच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला विविध विभाग प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कुटुंबीय, शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)गुणवंत विद्यार्थी, विजेत्यांचा सन्मानयाच कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळांतील दहावी आणि बारावीतील २७ गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच तंबाखूमुक्ती निबंध लेखन स्पर्धेतील विजेते वासुदेव सोनिराम बोडखे यांना प्रथम, अर्चना वासेकर यांना दिव्तीय, तर सीमा दामोधर पोटदुखे व अजाब खडसे यांना विभागून तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय प्रतिमा खडतकर, सरदेश दुर्गे, गणेश चव्हाण यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. यासोबतच पटसंख्या वाढविण्यासाठी ‘जाहिरात बनवा’ स्पर्धेतील विजेते व शाळेच्या पहिल्या दिवशी यशस्वी प्रवेशोत्सव राबविणाऱ्या ४४ शाळांचाही सन्मान करण्यात आला.