शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

एक लाख ‘बीपीएल’ कुटुंबांना गॅस सिलिंडर

By admin | Updated: August 20, 2016 00:13 IST

वृक्षतोडीवर मात करून पर्यावरण संवर्धनासाठी केंद्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

केंद्राचे अनुदान : महिलांच्या नावे मालकी, लाभार्थी हिस्स्यासाठी मदत यवतमाळ : वृक्षतोडीवर मात करून पर्यावरण संवर्धनासाठी केंद्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या योजनेच्या माध्यमातून दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना गॅस सिलिंडर वितरित करण्यात येणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना अनुदानावर गॅस सिलिंडर मिळणार आहे. लाभार्थी वाटा जे ग्राहक उचलू शकणार नाही, त्यांची जबाबदारी गॅस कंपनी उचलणार आहे. यामुळे गोरगरीब कुटुंबांच्या झोपडीतही गॅस सिलिंडर पाहायला मिळणार आहे. केंद्र शासनाने गरिबांच्या घरात गॅस पोहोचविण्यासाठी पंतप्रधान उज्वल योजना हाती घेतली आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला अनुदानात गॅस सिलिंडर मिळणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी केंद्राने जाहीर केली आहे. या यादीत नाव असणाऱ्या लाभार्थ्यांनाच गॅस सिलिंडरचे कनेक्शन दिले जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख लाभार्थी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. गॅस खरेदीसाठी केंद्राने काही अटी ठेवल्या आहेत. ५४०० रूपयांचे गॅस सिलिंडर बीपीएल धारकांना ५० टक्के अनुदानावर दिले जाणार आहे. याकरिता दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला ३४०० रूपयात गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहे. यामध्ये पात्र ग्राहकाला १७०० रूपये भरावे लागणार आहेत. तर १७०० रूपयांचा वाटा केंद्र शासन भरणार आहे. जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब लाभार्थी वाटा भरण्यासाठी अक्षम आहे अशा कुटुंबाचा वाटा गॅस कंपनी भरणार आहे. हा वाटा कर्जाच्या रूपात असणार आहे. ग्राहकांनी सिलिंडरची खरेदी केल्यानंतर सबसिडीची रक्कम कंपनी आपल्याकडे वळती करणार आहे. या माध्यमातून कर्जाची परतफेड केली जाणार आहे. यामुळे पैसे नसणाऱ्या पात्र ग्राहकांना गॅस सिलिंडर उपलब्ध होणार आहे. या गॅस सिलिंडरची मालकी कुटुंबातील महिलांच्या नावे असणार आहे. (शहर वार्ताहर) असे लागणार कागदपत्र प्रधानमंत्री उज्वल योजनेसाठी २०१३ ची दारिद्रय रेषेची यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. या यादीतील पात्र लाभार्थ्यांची नावे कंपनीने गॅस वितरकांकडे पाठविली आहेत. या ग्राहकांना विनाअट गॅस सिलिंडर द्यायची आहेत. यासाठी दारिद्र्य रेषेचे कार्ड, कार्डातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड, बँक खात्याचे पासबुक, दोन पासपोर्ट फोटो, मतदान कार्ड अथवा वीजबिल, ड्रायव्हिंग लायसन असावे लागणार आहे. यासाठी विनाशुल्क अर्ज आणि कागदपत्र गॅस कंपनी भरून घेणार आहे. गाव सोडल्याने वाढल्या अडचणी प्रत्येक गॅस एजंसी मालकांना यादीनुसार गॅस सिलिंडरचे वितरण करण्याच्या सूचना आहेत. ही यादी २०१३ ची आहे. यामुळे यादीतील अनेक लोक गाव सोडून गेले. तर अनेक जन बाहेरगावावरून शहरात आले. यामुळे पात्र लाभार्थी असले तरी त्यांना यादीत नाव नसल्याने दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला गॅस सिलिंडर मिळणार नाही. यातून अडचणी वाढल्या आहेत.