शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या वातावरणाने कृषी उत्पादन गारद

By admin | Updated: January 8, 2016 03:10 IST

दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा कापसाला मनाजोगा भाव मिळण्याची आशा होती.

कापसावर तेल्या रोग : एक महिन्यापूर्वीच तुरीचा हंगाम संपलारूपेश उत्तरवार यवतमाळ दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा कापसाला मनाजोगा भाव मिळण्याची आशा होती. भाव तर मिळाला नाहीच, पण रोगांच्या आक्रमणाने बहुतांश शेतकऱ्यांची उभी पऱ्हाटी वाळून गेली. सातत्याने बदलणाऱ्या वातावरणाचा हा दुष्परिणाम असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असले तरी, नुकसानग्रस्तांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना अजूनही दृष्टिपथात नाहीत. ही कथा केवळ कापसाचीच नाही, तर खरिपातील सोयाबीन आणि तुरीलाही फटका बसला आहे. अन् आता रब्बी पिकांनाही बदलत्या वातावरणाची झळ पोहोचली आहे.ग्लोबल वार्मिंगने ऋतूचक्रच प्रभावित झाले आहे. पावसाळा एक महिना पुढे सरकला आहे. थंडीच्या महिन्यात थंडी पडेनाशी झाली. याचा परिणाम थेट कृषी क्षेत्रावर पडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे होते. त्या खालोखाल सोयाबीन आणि तूर पीक घेण्यात आले. खरिप हंगाम संपण्यात जमा झाला आहे. कोरडवाहू क्षेत्रात उलंगवाडीची स्थिती आहे. ओलिताची अवस्था अशीच बिकट होत आहे.ढगाळी वातावरण आणि धुवारीमुळे कापसाचे पीक प्रभावित झाले आहे. कपाशीवर तेल्या रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे पाने करपायला सुरवात झाली आहे. पान तेलकट आणि काळे पडत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हादरले आहे. कोरडवाहू क्षेत्रात शेतकऱ्यांना एकरी काही किलो आणि क्विंटलचा अ‍ॅव्हरेज आला. तर ओलितात दोन अथवा तीन क्विंटलचा सरासरी वेचा निघाला आहे. सोयाबीन आणि कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीला मूठभर शेंगा आणि हिरवा पालाच राहीला. बदलत्या वातावरणाने तुरीवर किडीचे आक्रमण झाले. धुवारीने गळ झाली. सात बारांपैकी काही बार फळलेच नाही. परिणामी फेब्रुवारी महिन्यात निघणारी तूर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांचा दारात आली. परंतु, त्यातून २-४ कट्टे तूर निघणेही अवघड झाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून थ्रेशर मशिन माघारी फिरल्या. तुरीला जरी चांगले दर असले, तरी शेतकऱ्यांच्या शेतात तुरीचे उत्पादन नसल्यातच जमा आहे. गव्हाची आणि हरभऱ्याची स्थितीही भयावह आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनी शेतात गहू आणि हरभरा पेरला. मात्र थंडीचा पत्ताच नाही. या दोनही पिकांना थंडी आवश्यक आहे. थंडीअभावी गव्हाच्या उंबयांचा आकार निम्माच झाला आहे. थंडीअभावी हरभऱ्यावरही किडीचे आक्रमण झाले आहे. यामुळे फुलगळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.