शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

बदलत्या वातावरणाने कृषी उत्पादन गारद

By admin | Updated: January 8, 2016 03:10 IST

दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा कापसाला मनाजोगा भाव मिळण्याची आशा होती.

कापसावर तेल्या रोग : एक महिन्यापूर्वीच तुरीचा हंगाम संपलारूपेश उत्तरवार यवतमाळ दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा कापसाला मनाजोगा भाव मिळण्याची आशा होती. भाव तर मिळाला नाहीच, पण रोगांच्या आक्रमणाने बहुतांश शेतकऱ्यांची उभी पऱ्हाटी वाळून गेली. सातत्याने बदलणाऱ्या वातावरणाचा हा दुष्परिणाम असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असले तरी, नुकसानग्रस्तांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना अजूनही दृष्टिपथात नाहीत. ही कथा केवळ कापसाचीच नाही, तर खरिपातील सोयाबीन आणि तुरीलाही फटका बसला आहे. अन् आता रब्बी पिकांनाही बदलत्या वातावरणाची झळ पोहोचली आहे.ग्लोबल वार्मिंगने ऋतूचक्रच प्रभावित झाले आहे. पावसाळा एक महिना पुढे सरकला आहे. थंडीच्या महिन्यात थंडी पडेनाशी झाली. याचा परिणाम थेट कृषी क्षेत्रावर पडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे होते. त्या खालोखाल सोयाबीन आणि तूर पीक घेण्यात आले. खरिप हंगाम संपण्यात जमा झाला आहे. कोरडवाहू क्षेत्रात उलंगवाडीची स्थिती आहे. ओलिताची अवस्था अशीच बिकट होत आहे.ढगाळी वातावरण आणि धुवारीमुळे कापसाचे पीक प्रभावित झाले आहे. कपाशीवर तेल्या रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे पाने करपायला सुरवात झाली आहे. पान तेलकट आणि काळे पडत आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हादरले आहे. कोरडवाहू क्षेत्रात शेतकऱ्यांना एकरी काही किलो आणि क्विंटलचा अ‍ॅव्हरेज आला. तर ओलितात दोन अथवा तीन क्विंटलचा सरासरी वेचा निघाला आहे. सोयाबीन आणि कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून घेतलेल्या तुरीला मूठभर शेंगा आणि हिरवा पालाच राहीला. बदलत्या वातावरणाने तुरीवर किडीचे आक्रमण झाले. धुवारीने गळ झाली. सात बारांपैकी काही बार फळलेच नाही. परिणामी फेब्रुवारी महिन्यात निघणारी तूर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांचा दारात आली. परंतु, त्यातून २-४ कट्टे तूर निघणेही अवघड झाले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून थ्रेशर मशिन माघारी फिरल्या. तुरीला जरी चांगले दर असले, तरी शेतकऱ्यांच्या शेतात तुरीचे उत्पादन नसल्यातच जमा आहे. गव्हाची आणि हरभऱ्याची स्थितीही भयावह आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनी शेतात गहू आणि हरभरा पेरला. मात्र थंडीचा पत्ताच नाही. या दोनही पिकांना थंडी आवश्यक आहे. थंडीअभावी गव्हाच्या उंबयांचा आकार निम्माच झाला आहे. थंडीअभावी हरभऱ्यावरही किडीचे आक्रमण झाले आहे. यामुळे फुलगळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.