शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

गणबादेव गणेश मंडळाची १११ वर्षांची परंपरा

By admin | Updated: September 21, 2015 02:31 IST

लोकमान्य टिळकांपासून प्रेरणा घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सलग १११ वर्षांपासून सामाजिक प्रबोधनाचे कार्य येथील गणबादेव गणेश मंडळ करीत आहे.

 सामाजिक ऐक्य : १९०५ मध्ये गणेश मंडळाची पुसदमध्ये स्थापना अखिलेश अग्रवाल पुसदलोकमान्य टिळकांपासून प्रेरणा घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सलग १११ वर्षांपासून सामाजिक प्रबोधनाचे कार्य येथील गणबादेव गणेश मंडळ करीत आहे. यावर्षीही या मंडळाने परंपरागत पद्धतीने गणेशाची स्थापना केली असून पुसदच्या वैभवात भर टाकली आहे. लोकमान्य बाळगंगाधर टिकळ यांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली. त्याला आता १२२ वर्ष झाली आहेत. त्यांच्याच प्रेरणेतून पुसद येथे दत्तराव पाटील यांनी सर्वप्रथम गणबादेव सार्वजनिक गणेश उत्सवाला प्रारंभ केला. १९०५ मध्ये पूस नदीच्या तीरावर दत्तराव पाटील यांनी गणेश मंडळाची स्थापना केली. कोणत्याही कार्याच्या प्रारंभी पूजनीय असलेल्या गणेशावर पाटील घराण्याची अपार श्रद्धा होती. डोक्यावर पगड्या, कपाळी गंध, हाती टाळ अन् मृदुंगाच्या ठेक्यात गणबादेवाचे पुसदमध्ये आगमन झाले होते. हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या या मंडळाचा रथ मुस्लीम कारागिरांनी तयार केलेला आहे. गत १११ वर्षांपासून गणबादेवाची पालखी भक्तीभावाने आजही भोई वाहतो. गणेशोत्सव हे समाज प्रबोधनाचे माध्यम समजून सामाजिक व सांस्कृतिक उभारणीत या मंडळाचा मोठा वाटा आहे. आज गणेशोत्सवाच रुप बदलले आहे. मूर्ती, डिजे, ढोलताशे, रोषणाई यावर लाखो रुपये खर्च होत आहे. मात्र गणबादेव मंडळाने १११ वर्षापूर्वीची आपली परंपरा आजही कायम ठेवली आहे. परंपरागत पद्धतीनेच गणरायाचे आगमन होते. त्यानंतर दहा दिवस कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, कथाकथन, भारुड आदींच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. गेल्या चार पिढ्यांपासून हा गणेशोत्सव समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे. विशेष म्हणजे आजही या मंडळाची मूर्ती मातीपासूनच तयार केलेली असते. गणबादेवाची मूर्ती एका आकाराची असून या मंडळाला नारायणराव ताजनेकर यांनी विनामूल्य पुरविली आहे. त्यानंतर त्यांचे चिरंजीव लक्ष्मणराव ताजनेकर आणि आता त्यांची मुले ही परंपरा सांभाळत आहे. आजही पुसदचा मानाचा गणपती म्हणून उत्सवात अग्रस्थानी गणबादेवच असतो. त्या पाठोपाठ इतर गणेश मंडळे सहभागी होतात. पुसद शहराच्या वैभवात भर घालणे हे मंडळ समाज प्रबोधनातही आघाडीवर आहे.