शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

गजाननबाबांचा आशीर्वाद अन् १०५ व्या वर्षीही उपवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 22:13 IST

पहाटे चार वाजता जागणे, झुंजुमूंजूतच काठी टेकवत टेकवत ‘मॉर्निंग वॉक’ करणे, मग दातवनाने दात घासणे, नियमित १० वाजताच जेवण करणे, .....

ठळक मुद्देशतायुषी वत्सलाबार्इं : सकाळी पायपीट, दुपारी गप्पा अन् नियमित झोप

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पहाटे चार वाजता जागणे, झुंजुमूंजूतच काठी टेकवत टेकवत ‘मॉर्निंग वॉक’ करणे, मग दातवनाने दात घासणे, नियमित १० वाजताच जेवण करणे, दुपारी नातवांशी गप्पा अन् रात्री ११ वाजता न चुकता शांत झोपी जाणे... ही दिनचर्या आहे १०५ वर्षांच्या वत्सलाबाई नवसुजी एकनार नावाच्या शतायुषी आजीची. शेगावच्या गजानन महाराजांचा प्रत्यक्ष आशीर्वाद लाभलेल्या या आजी आजही दर गुरुवारी पूर्ण दिवस उपवास पाळतात. ‘परमेस्वरावर भरोसा ठेवला न् नातवायचे मुखं पाहाले भेटले तं कोनाले मरा लागते गा?’ जीवनावरच्या या श्रद्धेमुळेच आजी आजही ठणठणीत आहे.यवतमाळ तालुक्यात कार्ली गावात ही आजी राहते. सुरकुत्यांनी सजलेला चेहरा. मान किंचित थरथरते. पण नजर तेज. शंभर वर्षांहून अधिक काळ पाहिलेल्या वत्सलाबार्इंच्या मनात आठवणींचा खजिना आहे. ‘लोकमत’शी बोलताना संत गजानन महाराजांच्या भेटीचा क्षण ओठांवर आला. ‘द्वारका पाह्यली. तिन्ही देवं पाहून आली. पन गजानन बाबावानी खुशी कुठीसा नाई...’संत गजानन महाराजांची भेट कशी झाली, हा किस्सा सांगताना वत्सलाबाईच्या शब्दांमध्ये धार चढली. नाथपंथी असलेला एकनार परिवार गुरं घेऊन गावोगावी भटकंती करायचा. एखाद्या शेतात गुरं बसवून तिथेच पाल ठोकून राहायचे. महिलांनी शेतात मजुरी करायची. अशा भटकंतीत हा परिवार शेगावच्या आसपास पोहोचला. वत्सलाबाईला खूप दिवसांपासून ‘तिजारं’ आलं होतं. तिजारं म्हणजे ताप, सर्दी, खोकला. हे तिजारं काही केल्या कमी होईना. जडीबुटी खाऊनही उपयोग झाला नाही. ‘मंग माह्या भासरा मने का एकडाव गजानन बाबाच्या पाया पड’ गजानन महाराजांच्या भेटीची इच्छा असलेली वत्सलाबाई शेतात मजुरी करीत असताना गलका झाला..‘अवं माय गजानन बाबा चाल्ले ना इथूनस..’ झालं. साºया बाया वावरातून तडक रस्त्यावर येऊन उभ्या राहिल्या. गजानन महाराजांच्या पायावर त्यांनी डोके टेकविले. महाराजांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवला, डोक्यावर हात ठेवला, डोक्याचे केस तिच्याच तोंडात घातले अन् म्हणाले, ‘जा आता’! १०५ वर्षांच्या वत्सलाबाई ही घटना सांगताना आवर्जुन म्हणाली, मी आज बी गुरुवारी गजानन बाबाचा उपास धरते.नाम साहेबराव, घर मे चिंध्या चिंध्याब्रिटिश काळ पाहिलेल्या वत्सलाईबाई म्हणतात, ‘कोण राजा हाये आमाले घेनं देनं नोह्यतं.’ त्यांचे पती भावड्या आणि दीर साहेबराव व कुशा त्यांच्या गावच्या परिसरात खूप परिचित होते. त्यामुळे इंग्रज सरकारमधील काही कर्मचारी पैसे उकळण्याच्या उद्देशाने मुद्दाम त्यांना पाहण्यासाठी आले. तर त्यांची गरिबी पाहून ते अवाक् झाले अन् रागाने म्हणाले, ‘नाम साहेबराव और घर मे चिंध्या चिंध्या!’ हे वाक्य काही काळासाठी गावात एखाद्या वाक्प्रचारासारखे वापरले जाई, अशी आठवणही वत्सलाबाईने हसून सांगितली.जुन्या काळची नोटाबंदीतवाचा काळ लई सोपा व्हता. दोन आण्याले पायलीभर जवारी भेटे. जुन्या काळाचा आताच्या काळाशी संबंध जोडताना वत्सलाबाईने एक मजेशीर आठवण सांगितली. तवा बी नोटाबंदी झाल्ती. दूध ईकल्यावर माह्याकडं पैसे राहे. एक आणा गिना सबन डाबाराचे पैसे राहे. पन मंग थे पैसे काहूका तं बंद झाले न् साहेब लोकं मंग कागदायचे पैसे देये. माह्याकडचे डाबराचे पैसे बदलवाले मले मंग येवतमाळले नाई तं आर्णीले जा लागे. डाबराचे द्याचे नं कागदाचे आनाचे असं होये तवा...’५० सदस्यांचे गोकूळवत्सलाबार्इंचे कोणतेही समवयस्क आज हयात नाही. तीन मुलं, तीन मुली, तीन सुना, आठ नातू, आठ नातसुना, २५ पणतू अशा ५० जणांच्या कुटुंबाची वत्सलाबाई प्रमुख आहे. तिच्या नावावर १४ एकर जमीन आहे. नातसुनांच्या कामावर अजूनही बारीक लक्ष.