शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

गावठाणाच्या नोंदी बेपत्ता

By admin | Updated: August 31, 2015 02:21 IST

तालुक्यातील ११५ गावांमधील गावठाणाची नोंद भूमी अभिलेख विभागाकडे नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

किशोर वंजारी नेरतालुक्यातील ११५ गावांमधील गावठाणाची नोंद भूमी अभिलेख विभागाकडे नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. मागील ५० वर्षांपासून सर्वेक्षणच झाले नसल्याने शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणात बुडत आहे. ग्रामपंचायतीचेही वेळकाढू धोरण याबाबीला तेवढेच जबाबदार असल्याचे सांगितले जाते. नेर तालुक्यात १२१ गावांचा समावेश आहे. यात ५१ ग्रामपंचायती आणि एक नगरपरिषदेचा समावेश आहे. शेतकरी, प्लॉटधारक, घरपट्टे, ले-आऊटधारक यांचा संबंध भूमी अभिलेख कार्यालयाशी येतो. मात्र या कार्यालयात सुरू असलेला भोंगळ कारभार त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. या मागील कारणही आता स्पष्ट झाले आहे. महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या नोंदी भूमी अभिलेख विभागात करण्याची तसदीच घेतली नाही. भूमी अभिलेख विभागानेही कधी यासाठी प्रयत्न केले नाही. गावठाणाच्या नोंदी नसल्यामुळे भूमी अभिलेख विभाग भूखंडाची मोजणी करू शकत नाही. नेर नगरपरिषद क्षेत्रात ले-आऊटचे प्रस्थ वाढले आहे. ले-आऊटमालक महागड्या किमतीत प्लॉट विकून मोकळे होतात. प्लॉटधारकांना मात्र काही अडचणी आल्यास मोजणी करता येत नाही. कारण या भूखंडाची नोंद भूमी अभिलेख विभागातच नसल्याची बाब पुढे येते. भूखंड मोजणीत निर्माण झालेल्या अडचणींमुळे वादाचे प्रकारही घडत आहे. शेतशेजारी, घरशेजारी यांच्यात थोड्या थोड्या जागेवरून खटके उडतात. वास्तविक नोंद करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत आणि महसूल विभागाची आहे. परंतु या दोनही घटकांनी घोंगडे झटकण्याचाच प्रयत्न केला आहे. याचा त्रास मात्र सर्वसामान्य लोकांना होत आहे. प्लॉटधारकांनी विकलेल्या प्लॉटची मोजणी करायची कशी, हा प्रश्न आता प्लॉट मालकापुढे निर्माण झाला आहे. मागील ५० वर्षांपासूनच्या नोंदी नसतानाही भूमी अभिलेख विभागाने मात्र याकडे सातत्याने कानाडोळा केला जात आहे. याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.