शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित विद्यार्थ्यांचे भविष्य वाऱ्यावर

By admin | Updated: December 1, 2015 06:27 IST

मजुरीसाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबातील शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न जिल्ह्यात निर्माण झाला

यवतमाळ : मजुरीसाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबातील शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न जिल्ह्यात निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेने हंगामी वसतिगृहांची तजविज त्यांच्यासाठी केलेली असली तरी, या वसतिगृहांना बऱ्याच गावांमध्ये प्रतिसाद नाही. जवळपास २०० गावांत हा प्रश्न असताना केवळ २० गावांतून हंगामी वसतिगृहांचे प्रस्ताव प्रशासनाकडे आले आहेत. त्यामुळे स्थलांतरित कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याची भीती आहे.साधारण आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यातील शेकडो गावातील मजूर इतर जिल्ह्यात रोजगारासाठी जातात. नागपूरपासून ते मराठवाड्यापर्यंत जाणारे हे जत्थे थेट मार्च महिन्यातच गावाकडे परत येतात. दिवाळी ते होळी इतका दीर्घकाळ ही कुटुंबे गावापासून दूर असतात. या काळात त्यांची मुले त्यांच्यासोबतच स्थलांतरित होतात. परजिल्ह्यात गेल्यावर आम्ही आमच्या मुलांना तेथील शाळेत पाठवू, असा होरा या मजुरांचा असतो. प्रत्यक्षात त्या गावात गेल्यावर मुले शाळेत जात नाही. अर्ध्या सत्रातून नव्या शाळेत जाताना त्यांची मनापासून तयारी नसते. काही मुले आईवडिलांसोबत मजुरीलाही जातात.अशा मुलांना पालकांनी गावातच ठेवावे, यासाठी स्थानिक शिक्षक मनधरणी करतात. परंतु, बऱ्याचदा त्याचा फायदा होत नाही. त्यासाठीच शासनाने हंगामी वसतिगृहे ही संकल्पना अमलात आणली आहे. गावातील मुख्याध्यापकाकडून जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रस्ताव मागविते. यावर्षी केवळ २० मुख्याध्यापकांनी हंगामी वसतिगृहांचे प्रस्ताव पाठविले. ही समस्या जिल्ह्यातील २०० गावांमध्ये आहे. बहुतांश गावांतील मुख्याध्यापक इच्छूक नाहीत. हंगामी वसतिगृहांसाठी उशिरा मिळणारी परवानगी, खर्च आणि निधीतील तफावत अशा विविध कारणांमुळे मुख्याध्यापक इच्छूक नाहीत. (स्थानिक प्रतिनिधी)जिल्ह्याची कन्सेप्ट गेली राज्यभरहंगामी वसतिगृहे ही जिल्ह्यानेच राज्याला दिलेली देण आहे. दिंडाळा गावातील बहुतांश नागरिक दरवर्षी स्थलांतर करतात. काही वर्षापूर्वी या गावातील सर्व लोकांनी धान्य गोळा करून शाळेला दिले आणि आपण परतेपर्यंत मुलांना सांभाळण्याची जबाबदारी शाळेला दिली. तत्कालीन गटशिक्षणाधिकारी आणि विद्यमान उपशिक्षणाधिकारी डॉ. वाल्मीक इंगोले यांनी या गावकऱ्यांचे कौतुक करून ही संकल्पना शासन दरबारी मांडली. त्यानंतर शासनाने संपूर्ण राज्यासाठीच हंगामी वसतिगृहांची अमलबजावणी सुरू केली.आता शिक्षण हमी कार्ड४रोजगार किंवा इतर कारणांमुळे स्थलांतरित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने आता ‘शिक्षण हमी कार्डा’ची तरतूद केली आहे. शिक्षण सचिव नंदकुमार यांनी नुकतीच यवतमाळातील कार्यशाळेदरम्यान या संदर्भातील माहिती दिली. या कार्डाच्या बळावर विद्यार्थी ज्या गावात स्थलांतरित होईल, तेथील शाळेत त्याला प्रवेश दिला जाईल.