शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

शेतकर्‍यांना आकर्षित करण्याचे फंडे

By admin | Updated: June 6, 2014 00:13 IST

खरीप हंगाम जवळ येवून ठेपला आहे. अतवृष्टीमुळे सोयाबीनसारखे पीक हातातून गेले आहे. यंदा सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा पडणार असल्यामुळे कृषी विभागाने घरचे बियाणे वापरण्याचे सल्ले देणे सुरू केले आहे.

जादा उत्पन्नाचे दावे : कृषी केंद्र संचालकांना विविध आमिषेयवतमाळ : खरीप हंगाम जवळ येवून ठेपला आहे. अतवृष्टीमुळे सोयाबीनसारखे पीक हातातून गेले आहे. यंदा सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा पडणार असल्यामुळे कृषी विभागाने घरचे बियाणे वापरण्याचे सल्ले देणे सुरू केले आहे. अशातच संभ्रमावस्थेत असलेल्या शेतकर्‍यांना आकर्षित करण्यासाठी विविध बियाणे कंपन्यांनी अभिनव फंडे शोधले आहे. जादा उत्पादनाची हमी देणारी फलके कृषी केंद्र व दर्शनीय ठिकाणी लावल्यामुळे शेतकर्‍यांचा संभ्रम वाढला आहे.यंदा सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा पडल्यामुळे कपाशीच्या लागवडीकडे शेतकर्‍यांनी मोर्चा वळविला आहे. अशातच मागील दोन महिन्यांपासून विविध कपाशी बियाण्यांच्या कंपन्यांनी आपल्या वाणाचे दावे करण्याची अभिनव शक्कल लढविली आहे. शेतकर्‍यांना आपलेच बियाणे कसे जादा उत्पन्न देणारे आहे, हे सांगण्यासाठी मोठाले फलक लावण्यात आले आहे. ज्या शेतकर्‍यांना प्रत्यक्षात एकरी दहाही क्विंटल कापूस झाला नाही अशा शेतकर्‍यांच्या नावे एकरी १८ ते २0 क्विंटल उत्पन्न घेतल्याचे जाहिरातीच्या माध्यमातून सांगितल्या जात आहे. वास्तविक पाहता जे शेतकरी एकरी १५ क्विंटलच्या वर उत्पन्न घेतात त्या शेतकर्‍यांकडे ओलिताची व्यवस्था असते. मात्र जाहिरात फलकावर ओलिताच्या व्यवस्थापनाबाबत काहीही नमूद केलेले नसते. जाहिरात फलकावरील शेतकर्‍याला उत्पादन झाले. मग आपल्याला का होणार नाही, या भावनेतून अनेक शेतकरी जाहिरातबाजीला बळी पडताना दिसत आहे.एकीकडे सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा पडला असताना सोयाबीनच्या बियाण्यांची मागणी मात्र वाढली आहे. अशातच तुटवड्याच्या नावाखाली एका बॅगला तीन हजार रुपये वसूल करण्याचा फंडाही कृषी केंद्र संचालकांनी वापरणे सुरू केले आहे. सोयाबीनचा जादा अँवरेज देणारे बियाणे अमक्या कंपनीचे आहे. त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात, अशा प्रकारचे प्रलोभन शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे कपाशीच्या बियाण्याची जादा विक्री व्हावी म्हणून काही कंपन्यांनी कृषी केंद्र संचालकांना विविध ऑफर्स दिल्याची माहिती आहे. या माध्यमातून बँकॉकसारख्या देशातील दौरेही ठरविण्यात आले आहे.ज्या कृषी केंद्र संचालकांना परदेशात जावयाचे नाही त्यांना मात्र परदेश दौर्‍यासाठी लागणारी रक्कम नगदीत कापून दिल्या जात असल्याची चर्चा आहे. अतवृष्टी व गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना बियाणे घेण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असताना कृषी केंद्र संचालक व काही कंपन्या मात्र भ्रममुलक दावे करणारे वाण शेतकर्‍यांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)