शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

शेतकर्‍यांना आकर्षित करण्याचे फंडे

By admin | Updated: June 6, 2014 00:13 IST

खरीप हंगाम जवळ येवून ठेपला आहे. अतवृष्टीमुळे सोयाबीनसारखे पीक हातातून गेले आहे. यंदा सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा पडणार असल्यामुळे कृषी विभागाने घरचे बियाणे वापरण्याचे सल्ले देणे सुरू केले आहे.

जादा उत्पन्नाचे दावे : कृषी केंद्र संचालकांना विविध आमिषेयवतमाळ : खरीप हंगाम जवळ येवून ठेपला आहे. अतवृष्टीमुळे सोयाबीनसारखे पीक हातातून गेले आहे. यंदा सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा पडणार असल्यामुळे कृषी विभागाने घरचे बियाणे वापरण्याचे सल्ले देणे सुरू केले आहे. अशातच संभ्रमावस्थेत असलेल्या शेतकर्‍यांना आकर्षित करण्यासाठी विविध बियाणे कंपन्यांनी अभिनव फंडे शोधले आहे. जादा उत्पादनाची हमी देणारी फलके कृषी केंद्र व दर्शनीय ठिकाणी लावल्यामुळे शेतकर्‍यांचा संभ्रम वाढला आहे.यंदा सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा पडल्यामुळे कपाशीच्या लागवडीकडे शेतकर्‍यांनी मोर्चा वळविला आहे. अशातच मागील दोन महिन्यांपासून विविध कपाशी बियाण्यांच्या कंपन्यांनी आपल्या वाणाचे दावे करण्याची अभिनव शक्कल लढविली आहे. शेतकर्‍यांना आपलेच बियाणे कसे जादा उत्पन्न देणारे आहे, हे सांगण्यासाठी मोठाले फलक लावण्यात आले आहे. ज्या शेतकर्‍यांना प्रत्यक्षात एकरी दहाही क्विंटल कापूस झाला नाही अशा शेतकर्‍यांच्या नावे एकरी १८ ते २0 क्विंटल उत्पन्न घेतल्याचे जाहिरातीच्या माध्यमातून सांगितल्या जात आहे. वास्तविक पाहता जे शेतकरी एकरी १५ क्विंटलच्या वर उत्पन्न घेतात त्या शेतकर्‍यांकडे ओलिताची व्यवस्था असते. मात्र जाहिरात फलकावर ओलिताच्या व्यवस्थापनाबाबत काहीही नमूद केलेले नसते. जाहिरात फलकावरील शेतकर्‍याला उत्पादन झाले. मग आपल्याला का होणार नाही, या भावनेतून अनेक शेतकरी जाहिरातबाजीला बळी पडताना दिसत आहे.एकीकडे सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा पडला असताना सोयाबीनच्या बियाण्यांची मागणी मात्र वाढली आहे. अशातच तुटवड्याच्या नावाखाली एका बॅगला तीन हजार रुपये वसूल करण्याचा फंडाही कृषी केंद्र संचालकांनी वापरणे सुरू केले आहे. सोयाबीनचा जादा अँवरेज देणारे बियाणे अमक्या कंपनीचे आहे. त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात, अशा प्रकारचे प्रलोभन शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे कपाशीच्या बियाण्याची जादा विक्री व्हावी म्हणून काही कंपन्यांनी कृषी केंद्र संचालकांना विविध ऑफर्स दिल्याची माहिती आहे. या माध्यमातून बँकॉकसारख्या देशातील दौरेही ठरविण्यात आले आहे.ज्या कृषी केंद्र संचालकांना परदेशात जावयाचे नाही त्यांना मात्र परदेश दौर्‍यासाठी लागणारी रक्कम नगदीत कापून दिल्या जात असल्याची चर्चा आहे. अतवृष्टी व गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना बियाणे घेण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असताना कृषी केंद्र संचालक व काही कंपन्या मात्र भ्रममुलक दावे करणारे वाण शेतकर्‍यांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)