शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडमध्ये ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्याचा फंडा

By admin | Updated: April 25, 2016 02:14 IST

पाणीपुरवठा, पथदिवे यांचे बिल भरु न शकणाऱ्या ग्रामपंचायती अचानक सक्षम झाल्या असून या ‘सक्षम’

पदाधिकारी ठेकेदार : ग्रामपंचायतींना मिळते सक्षमतेचे प्रमाणपत्र उमरखेड : पाणीपुरवठा, पथदिवे यांचे बिल भरु न शकणाऱ्या ग्रामपंचायती अचानक सक्षम झाल्या असून या ‘सक्षम’ ग्रामपंचायतींनी गावातील व गावाबाहेरील विकास कामे करण्याचा सपाटा लावला आहे. त्यात पदाधिकारी ठेकेदार झाले असून कामाच्या गुणवत्तेकडे कुणाचेही लक्ष नाही. राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे विकास कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत सक्षम असणे गरजेचे आहे. पाच लाखांवरील कामासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न ५० हजारावर आणि १० लाखापर्यंत कामासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न एक लाख रुपये असणे बंधनकारक आहे. अशाच ग्रामपंचायतींना त्यांच्या गावठाण हद्दीतील शासन नियमाप्रमाणे शाळा खोली बांधकाम, अंतर्गत सिमेंट रस्ते, नाली व १५ लाखांच्या आतील वास्तू बांधकाम, ग्रामपंचायत भवन, स्मशानभूमी बांधकाम अशी कामे करता येतात. मात्र ही सर्व कामे सोडून अनेक ग्रामपंचायती जिल्हा परिषदेच्या मालकीचे डांबरी रस्ते, पूल, रस्ता दुरुस्ती अशी कामे करू लागली आहे. त्यासाठी अचानक वाढीव उत्पन्न दाखविले जात आहे. हद्दीबाहेरील जिल्हा परिषद बांधकाम विभागातील एमडीआर, ओडीआर आणि व्हीआर ग्रामीण रस्ते, पूल दुरुस्तीची कामे, बनावट उत्पन्न वाढीच्या दाखल्यावर केले जात आहे. सदर दाखले ग्रामपंचायत सक्षम नसतानाही ग्रामसेवकाच्या माध्यमातून गटविकास अधिकाऱ्यांकडून आणले जातात. अनेक ग्रामपंचायतीची कर वसुली मोठ्या प्रमाणात थकीत असताना आपल्या हद्दीतील कामे सोडून कार्यक्षेत्राबाहेरील कामांचा सपाटा लावला आहे. ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती बिकट असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील कामे करण्यास वाढीव उत्पन्न दाखवून ही कामे बळकावली जात आहे. त्यामुळे सर्व प्रकरणात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आदींनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. सोबतच या प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. (शहर प्रतिनिधी)उत्पन्न जाते कुठे ?एकीकडे विकास कामे करणाऱ्या कंत्राटदाराला कामापोटी दहा ते २० टक्के नफा मिळतो. एमआरईजीएसची कामे नाकारणारी ही यंत्रणा ही सर्व कामे टेंडर न भरता करीत आहे. त्यामुळे वाढीव उत्पन्नाचा बागुलबुवा करणाऱ्याचे यातून मिळालेले उत्पन्न जाते कुठे हा प्रश्न आहे. संबंधित ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती, यंत्र सामुग्री, मनुष्यबळ आदी पडताळून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. एकीकडे ग्रामपंचायतीचे सचिव व पदाधिकारी पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेऊन थातूरमातूर कामे करीत आहे. आर्थिकदृष्ट्या गब्बर होत आहे.