शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

उमरखेडमध्ये ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्याचा फंडा

By admin | Updated: April 25, 2016 02:14 IST

पाणीपुरवठा, पथदिवे यांचे बिल भरु न शकणाऱ्या ग्रामपंचायती अचानक सक्षम झाल्या असून या ‘सक्षम’

पदाधिकारी ठेकेदार : ग्रामपंचायतींना मिळते सक्षमतेचे प्रमाणपत्र उमरखेड : पाणीपुरवठा, पथदिवे यांचे बिल भरु न शकणाऱ्या ग्रामपंचायती अचानक सक्षम झाल्या असून या ‘सक्षम’ ग्रामपंचायतींनी गावातील व गावाबाहेरील विकास कामे करण्याचा सपाटा लावला आहे. त्यात पदाधिकारी ठेकेदार झाले असून कामाच्या गुणवत्तेकडे कुणाचेही लक्ष नाही. राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे विकास कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत सक्षम असणे गरजेचे आहे. पाच लाखांवरील कामासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न ५० हजारावर आणि १० लाखापर्यंत कामासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न एक लाख रुपये असणे बंधनकारक आहे. अशाच ग्रामपंचायतींना त्यांच्या गावठाण हद्दीतील शासन नियमाप्रमाणे शाळा खोली बांधकाम, अंतर्गत सिमेंट रस्ते, नाली व १५ लाखांच्या आतील वास्तू बांधकाम, ग्रामपंचायत भवन, स्मशानभूमी बांधकाम अशी कामे करता येतात. मात्र ही सर्व कामे सोडून अनेक ग्रामपंचायती जिल्हा परिषदेच्या मालकीचे डांबरी रस्ते, पूल, रस्ता दुरुस्ती अशी कामे करू लागली आहे. त्यासाठी अचानक वाढीव उत्पन्न दाखविले जात आहे. हद्दीबाहेरील जिल्हा परिषद बांधकाम विभागातील एमडीआर, ओडीआर आणि व्हीआर ग्रामीण रस्ते, पूल दुरुस्तीची कामे, बनावट उत्पन्न वाढीच्या दाखल्यावर केले जात आहे. सदर दाखले ग्रामपंचायत सक्षम नसतानाही ग्रामसेवकाच्या माध्यमातून गटविकास अधिकाऱ्यांकडून आणले जातात. अनेक ग्रामपंचायतीची कर वसुली मोठ्या प्रमाणात थकीत असताना आपल्या हद्दीतील कामे सोडून कार्यक्षेत्राबाहेरील कामांचा सपाटा लावला आहे. ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती बिकट असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील कामे करण्यास वाढीव उत्पन्न दाखवून ही कामे बळकावली जात आहे. त्यामुळे सर्व प्रकरणात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आदींनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. सोबतच या प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. (शहर प्रतिनिधी)उत्पन्न जाते कुठे ?एकीकडे विकास कामे करणाऱ्या कंत्राटदाराला कामापोटी दहा ते २० टक्के नफा मिळतो. एमआरईजीएसची कामे नाकारणारी ही यंत्रणा ही सर्व कामे टेंडर न भरता करीत आहे. त्यामुळे वाढीव उत्पन्नाचा बागुलबुवा करणाऱ्याचे यातून मिळालेले उत्पन्न जाते कुठे हा प्रश्न आहे. संबंधित ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती, यंत्र सामुग्री, मनुष्यबळ आदी पडताळून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. एकीकडे ग्रामपंचायतीचे सचिव व पदाधिकारी पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेऊन थातूरमातूर कामे करीत आहे. आर्थिकदृष्ट्या गब्बर होत आहे.