शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन

By admin | Updated: March 10, 2016 03:18 IST

पहिले राज्यस्तरीय फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन घाटंजी तालुक्यातील माणुसदरी येथे १६ व १७ मार्च रोजी आयोजित केले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष

१६ व १७ मार्च : समारोपाच्या अध्यक्षस्थानी श्रीपाल सबनीस, कार्यक्रमांची रेलचेलयवतमाळ : पहिले राज्यस्तरीय फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन घाटंजी तालुक्यातील माणुसदरी येथे १६ व १७ मार्च रोजी आयोजित केले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी पत्रपरिषदेत दिली. पवार म्हणाले, या संमेलनातील सर्व कार्यक्रम केवळ शेती व शेतकऱ्यांशी निगडीत असतील. लोकजागृती मंच, पंचायत समिती घाटंजी व शांतीदूत बुद्धविहार समिती माणूसदरी यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित केले आहे. आदिवासी बहुल माणुसदरी गावात वसंतराव नाईक साहित्यनगरी वसविण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन बुधवार, १६ मार्च रोजी दुपारी चार वाजता ३३ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रविचंद्र हडसनकर (नांदेड) यांच्या हस्ते होईल. संमेलनाध्यक्ष म्हणून मोतीराम कटरे (मुंबई) हे राहतील. सायंकाळी सात वाजता ‘शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना’ या विषयावर वऱ्हाडी कवी मिर्झा रफी अहमद बेग यांचा मिर्झा एक्सप्रेस हा कार्यक्रम होईल. गुरुवार, १७ मार्च रोजी लोकशाहीर नागोराव गुरनुले यांचे शेतकरी प्रबोधन गीते सकाळी १० वाजता राहील. सकाळी ११ वाजता ‘शेतकऱ्यांचे प्रश्न आणि फुले आंबेडकरी विचार’ या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी प्रा. माधव सरकुंडे राहतील. दुपारी एक वाजता शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व दुपारी दोन वाजता कविसंमेलन होईल. अध्यक्षस्थानी बळी खैरे राहतील. सायंकाळी पाच वाजता समारोपीय कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस, पुणे हे राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार राजू तोडसाम, अ‍ॅड. अनिल किलोर, अण्णासाहेब पारवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी, पत्रकार न. मा. जोशी, सुरेश शहापूरकर, श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नागेश गोरख, तहसीलदार एम.एम. जोरवर, डॉ. निरंजन मसराम, संजय पालतेवार आदींची उपस्थिती राहील. सायंकाळी सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य देवांनद पवार यांनी पत्रपरिषदेत दिली. (प्रतिनिधी)