शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अनुभवी शेतकऱ्यांसमोर कृषी शास्त्रज्ञ हतबल

By admin | Updated: August 7, 2015 02:23 IST

सोयाबीनवर खोडकीड की येलोमोझॅक यावरून शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ आमने-सामने उभे ठाकले होते.

खोडकिडीवर शिक्कामोर्तब : अंबोडात सोयाबीनची पाहणीसंजय भगत  महागावसोयाबीनवर खोडकीड की येलोमोझॅक यावरून शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ आमने-सामने उभे ठाकले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात हा प्रश्न गेल्यानंतर त्यांनी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांची चमू महागाव तालुक्यात पाठविली. या चमूने केलेल्या पाहणीत सोयाबीनवर खोडकिड आल्याचेच शिक्कामोर्तब झाले. अखेर अनुभवी शेतकऱ्यांसमोर कृषी शास्त्रज्ञही हतबल झाल्याचे दिसून आले. महागाव तालुक्यातील अंबोडा परिसरातील सोयाबीनवर किडींनी आक्रमण केले होते. शेतकरी खोडकिड असल्याचे सांगत होते. तर पंजाबराव देशमुख कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ येलोमोझॅक असल्याचे म्हणत होते. यावरून शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ आमने-सामने आले. हा वाद जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांच्या दरबारात पोहोचला. त्यांनी अंबोडा परिसरातील शेतीची पाहणी करण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची चमू पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गुरुवारी दुपारी कृषी विद्यापीठाचे पथक येथे दाखल झाले. या पथकात सहयोगी संचालक डॉ.सी.यू. पाटील, वनस्पती रोगशास्त्राचे प्रा.डॉ.योगेश इंगळे, किटक शास्त्रज्ञ डॉ.श्याम मुंजे यांच्यासह अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे, तालुका कृषी अधिकारी आर.डी. रणवीर यांचा समावेश होता. या पथकाने अंबोडा येथील शेतकरी अमृतराव देशमुख, मनीष जाधव, हनुमंतराव देशमुख, दादाराव ठाकरे, दिलीप घोडेकर, रवींद्र राऊत, सुरेश देशमुख यांच्या शेताची पाहणी केली. रवींद्र राऊत यांच्या शेतातील सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव असल्याचे शास्त्रज्ञांनी मान्य केले. यामुळेच सोयाबीनचे ६० टक्के नुकसान झाल्याचेसुद्धा त्यांनी विश्रामगृहावर आयोजित बैठकीत सांगितले. यावेळी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप हनुमंतराव देशमुख यांनी केला. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन का केले नाही, असा सवाल त्यांनी केला. डॉ.पाटील यांनी तर दोन वर्ष शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीकच घेऊ नये, असे सूचविले. त्याशिवाय या परिसरातील सोयाबीन रोगमुक्त होणार नसल्याचा दावा केला. यावेळी कृषी विभाग आणि शास्त्रज्ञ यांच्यात एकवाक्यता दिसून येत नव्हती. त्या बाबतही शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांची फिरकी घेतली. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा काहीच फायदा होत नसल्याचा आरोप अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी यावेळी केला. खोडकिडीचा प्रादुर्भाव तालुक्यात असून शेतकऱ्यांनी हिरव्यागार पिकाकडे पाहून समाधान मानू नये, झाडाच्या बुडापासून पिकाची तपासणी करावी, तरच त्यावरील अळीचा शोध लागेल. खोडकिडीमुळे झाड पिवळे पडले असून यावर्षीसुद्धा सोयाबीनचा फटका बसणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.कृषी विभाग पिवळा मोझॅक असल्याचे सांगत आहे. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आपले अज्ञात शेतकऱ्यांसमोर लपवू नये, यामुळेच शेतकरी देशोधडीला लागला, असाही आरोप उपस्थितांनी केला आहे. हा प्रकार सुरू असताना अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड यांनी मधला मार्ग म्हणून तालुक्यातील आणखी सोयाबीन प्लॉट पाहण्याची विनंती केली. त्यानुसार महागाव येथील बैठक अर्धवट सोडून पथक उमरखेड मार्गावरील मुडाणा, चिल्ली, सुकळी भागात पाहणी करण्यासाठी गेले.