शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

आर्णीत वीजपुरवठा वारंवार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:38 IST

ग्रामीण भाग आणि शहराला एकाच फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. आता हे दोन्ही भाग ...

ग्रामीण भाग आणि शहराला एकाच फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. आता हे दोन्ही भाग वेगळे करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मागील पाच वर्षांपूर्वी दिग्रसवरून वीजपुरवठा केला जात होता. त्यावेळीसुद्धा शहरात एवढ्या प्रमाणात पुरवठा वारंवार खंडित होत नव्हता. आता त्याहीपेक्षा जास्त वेळ पुरवठा खंडित होत आहे.

जवळा येथे १३२ केव्ही उपकेंद्र होऊनसुद्धा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीविरुद्ध रोष वाढत आहे. वितरण कंपनीचे नियोजन कुचकामी ठरले आहे. १३२ चे उपकेंद्र झाल्यावर आर्णीकर नागरिक सुखावले होते. पुरवठ्याबाबत तक्रारी निकाली लागतील, असे वाटत होते. मात्र, झाले उलटेच. उलट आता तक्रारी वाढल्या आहेत. यावरून वीज वितरण कंपनीचे धोरण चुकीचे असल्याचे सिद्ध होत आहे.

आर्णी शहर हे नावालाच उरले आहे. सुविधा ग्रामीण भागाच्याच मिळत आहे. शहराला वेगळा वीजपुरवठा नसल्याने अनेक अडचणी उभ्या राहत आहेत. जवळा येथील १३२ केव्हीवरून आर्णी शहराला पुरवठा केला जातो. तेथूनच ३३ केव्ही येरमलहेटी, लोणबेहळ येथील ३३ केव्ही येथे पुरवठा गेला आहे. यादरम्यान कुठेही काही बिघाड झाला, तर संपूर्ण आर्णी शहर काळोखात सापडते. आर्णी शहराला वेगळा वीजपुरवठा नसल्याने अनेक अडचणींचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे.

बॉक्स

तारा लोंबकळल्या, रोहित्र नादुरुस्त

शहरातील तारा लोंबकळल्या आहेत. ट्रान्सफाॅर्मर, एबी स्विचमध्ये अनेक त्रुटी आहेत. कर्मचाऱ्यांना पुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पुरेसे उपकरण नसल्यामुळे त्यांची घुसमट होते. मात्र, नागरिकांच्या रोषाला त्यांनाच बळी पडावे लागते. आर्णी शहर ५० हजार लोकवस्तीचे आहे. लागूनच नागपूर- तुळजापूर महामार्ग गेला आहे. त्यामुळे शहराला मोठे महत्त्व आले. शहर वाढत असताना वीज विभागाकडून पाहिजे अशा सुविधा नागरिकांना मिळत नसल्याने संताप आहे.