शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीत वीजपुरवठा वारंवार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:38 IST

ग्रामीण भाग आणि शहराला एकाच फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. आता हे दोन्ही भाग ...

ग्रामीण भाग आणि शहराला एकाच फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. आता हे दोन्ही भाग वेगळे करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मागील पाच वर्षांपूर्वी दिग्रसवरून वीजपुरवठा केला जात होता. त्यावेळीसुद्धा शहरात एवढ्या प्रमाणात पुरवठा वारंवार खंडित होत नव्हता. आता त्याहीपेक्षा जास्त वेळ पुरवठा खंडित होत आहे.

जवळा येथे १३२ केव्ही उपकेंद्र होऊनसुद्धा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीविरुद्ध रोष वाढत आहे. वितरण कंपनीचे नियोजन कुचकामी ठरले आहे. १३२ चे उपकेंद्र झाल्यावर आर्णीकर नागरिक सुखावले होते. पुरवठ्याबाबत तक्रारी निकाली लागतील, असे वाटत होते. मात्र, झाले उलटेच. उलट आता तक्रारी वाढल्या आहेत. यावरून वीज वितरण कंपनीचे धोरण चुकीचे असल्याचे सिद्ध होत आहे.

आर्णी शहर हे नावालाच उरले आहे. सुविधा ग्रामीण भागाच्याच मिळत आहे. शहराला वेगळा वीजपुरवठा नसल्याने अनेक अडचणी उभ्या राहत आहेत. जवळा येथील १३२ केव्हीवरून आर्णी शहराला पुरवठा केला जातो. तेथूनच ३३ केव्ही येरमलहेटी, लोणबेहळ येथील ३३ केव्ही येथे पुरवठा गेला आहे. यादरम्यान कुठेही काही बिघाड झाला, तर संपूर्ण आर्णी शहर काळोखात सापडते. आर्णी शहराला वेगळा वीजपुरवठा नसल्याने अनेक अडचणींचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे.

बॉक्स

तारा लोंबकळल्या, रोहित्र नादुरुस्त

शहरातील तारा लोंबकळल्या आहेत. ट्रान्सफाॅर्मर, एबी स्विचमध्ये अनेक त्रुटी आहेत. कर्मचाऱ्यांना पुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पुरेसे उपकरण नसल्यामुळे त्यांची घुसमट होते. मात्र, नागरिकांच्या रोषाला त्यांनाच बळी पडावे लागते. आर्णी शहर ५० हजार लोकवस्तीचे आहे. लागूनच नागपूर- तुळजापूर महामार्ग गेला आहे. त्यामुळे शहराला मोठे महत्त्व आले. शहर वाढत असताना वीज विभागाकडून पाहिजे अशा सुविधा नागरिकांना मिळत नसल्याने संताप आहे.