शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीत वीजपुरवठा वारंवार खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:38 IST

ग्रामीण भाग आणि शहराला एकाच फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. आता हे दोन्ही भाग ...

ग्रामीण भाग आणि शहराला एकाच फिडरवरून वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. आता हे दोन्ही भाग वेगळे करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मागील पाच वर्षांपूर्वी दिग्रसवरून वीजपुरवठा केला जात होता. त्यावेळीसुद्धा शहरात एवढ्या प्रमाणात पुरवठा वारंवार खंडित होत नव्हता. आता त्याहीपेक्षा जास्त वेळ पुरवठा खंडित होत आहे.

जवळा येथे १३२ केव्ही उपकेंद्र होऊनसुद्धा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीविरुद्ध रोष वाढत आहे. वितरण कंपनीचे नियोजन कुचकामी ठरले आहे. १३२ चे उपकेंद्र झाल्यावर आर्णीकर नागरिक सुखावले होते. पुरवठ्याबाबत तक्रारी निकाली लागतील, असे वाटत होते. मात्र, झाले उलटेच. उलट आता तक्रारी वाढल्या आहेत. यावरून वीज वितरण कंपनीचे धोरण चुकीचे असल्याचे सिद्ध होत आहे.

आर्णी शहर हे नावालाच उरले आहे. सुविधा ग्रामीण भागाच्याच मिळत आहे. शहराला वेगळा वीजपुरवठा नसल्याने अनेक अडचणी उभ्या राहत आहेत. जवळा येथील १३२ केव्हीवरून आर्णी शहराला पुरवठा केला जातो. तेथूनच ३३ केव्ही येरमलहेटी, लोणबेहळ येथील ३३ केव्ही येथे पुरवठा गेला आहे. यादरम्यान कुठेही काही बिघाड झाला, तर संपूर्ण आर्णी शहर काळोखात सापडते. आर्णी शहराला वेगळा वीजपुरवठा नसल्याने अनेक अडचणींचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे.

बॉक्स

तारा लोंबकळल्या, रोहित्र नादुरुस्त

शहरातील तारा लोंबकळल्या आहेत. ट्रान्सफाॅर्मर, एबी स्विचमध्ये अनेक त्रुटी आहेत. कर्मचाऱ्यांना पुरवठा खंडित झाल्यानंतर तो पूर्ववत करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पुरेसे उपकरण नसल्यामुळे त्यांची घुसमट होते. मात्र, नागरिकांच्या रोषाला त्यांनाच बळी पडावे लागते. आर्णी शहर ५० हजार लोकवस्तीचे आहे. लागूनच नागपूर- तुळजापूर महामार्ग गेला आहे. त्यामुळे शहराला मोठे महत्त्व आले. शहर वाढत असताना वीज विभागाकडून पाहिजे अशा सुविधा नागरिकांना मिळत नसल्याने संताप आहे.