शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: October 17, 2016 18:13 IST

विद्यार्थी संख्या कमी झाल्याने अतिरिक्त ठरलेले आश्रमशाळांचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू करण्याचा आदेश सोमवारी शासनाने काढला आहे.

आश्रमशाळांचे कर्मचारी : पाच महिन्यांपासून आर्थिक कोंडीविलास गावंडे , यवतमाळ विद्यार्थी संख्या कमी झाल्याने अतिरिक्त ठरलेले आश्रमशाळांचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन सुरू करण्याचा आदेश सोमवारी शासनाने काढला आहे. समायोजन होईपर्यंत त्यांना वेतन दिले जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील एक हजार २०० शिक्षक-कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यात सर्वाधिक ४०० शिक्षक-कर्मचारी सोलापूर जिल्ह्यातील आहे.समाजकल्याण विभागाच्या ५२६ प्राथमिक आणि २९६ माध्यमिक अशा ८२२ आश्रमशाळांतील शिक्षक-कर्मचारी २०१४-१५ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरले होते. विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या या आश्रमशाळा आहे. विद्यार्थी संख्या कमी झाल्याने वर्ग आणि तुकड्या कमी झाल्या होत्या.

दरम्यान, शासनाने १ एप्रिल २०१६ रोजी ह्यकाम नाही-वेतन नाहीह्ण हे धोरण जाहीर केले. यानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन हे धोरण जाहीर झाल्यापासून थांबविण्यात आले.

वेतन बंद झाल्याने राज्यातील १२०० शिक्षक-कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी सुरू झाली. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. या धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने विविध माध्यमातून न्याय मागितला. ह्यकाम नाही-वेतन नाहीह्ण या धोरणात बदल करून शुद्धिपत्रक काढण्याची मागणी लावून धरली. परंतु शासन आपल्या निर्णयावर ठाम होते. अखेर या संघटनेने न्यायालयाचे दार ठोठावले. उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद, नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली.

मुंबई उच्च न्यायालयाने शासनाने आपल्या धोरणात बदल करावा, असा आदेश दिला. यासाठीचे शुद्धिपत्रक काढण्याकरिता १७ आॅक्टोबर अखेरची तारीख देवून, अन्यथा एकतर्फी निर्णय दिला जाईल, असे ठणकावले. अखेर शासनाने सोमवार, १७ आॅक्टोबर रोजी शुद्धिपत्रक काढले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे वेतन समायोजन होईपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांचे समायोजन आश्रमशाळांमध्ये प्राधान्याने करावे, असेही या शुद्धिपत्रकात नमूद केले आहे. शिक्षणहक्क कायदा लागू व्हावाशिक्षणहक्क कायद्यानुसार ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अपेक्षित आहे. सामाजिक न्याय विभागाला हा कायदा लागू नसल्याने ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक दिला जातो. विविध कारणांमुळे विद्यार्थी संख्या घटत चालली आहे. शिक्षणहक्क कायदा सामाजिक न्याय विभागाला लागू झाल्यास अतिरिक्तचा प्रश्न राहणार नाही, असे महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष भूपाल राठोड यांनी सांगितले. अतिरिक्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी गेली सात महिन्यांपासून हा लढा सुरू होता, असे ते म्हणाले.