शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परिवहनतर्फे मुलींना मोफत पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:19 IST

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एस.टी.च्या मोफत पासची ‘अहिल्याबाई होळकर योजना’ बारावीपर्यंत मुलींना लागू केली. ही योजना लाखो मुलींना वरदान ठरली असून ती आम्हाला दिवाळी भेटच असल्याच्या प्रतिक्रीया मुलींनी येथे व्यक्त केल्या.

ठळक मुद्देदिवाळी पर्वावर दिली भेट : हजारो मुलींनी घेतला लाभ

विनोद ताजने।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एस.टी.च्या मोफत पासची ‘अहिल्याबाई होळकर योजना’ बारावीपर्यंत मुलींना लागू केली. ही योजना लाखो मुलींना वरदान ठरली असून ती आम्हाला दिवाळी भेटच असल्याच्या प्रतिक्रीया मुलींनी येथे व्यक्त केल्या.राज्यातील कोणत्याही शाळेत दहावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींना आपल्या गावाजवळच्या शाळेत शिक्षणासाठी जाण्याकरिता राज्य शासनाने ‘अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना’ सुरू केली. त्यामुळे मुलींना आपल्या आवडीच्या व दर्जेदार शाळेमध्ये शिक्षण घेणे सुलभ झाले आहे. मुलींना एस.टी.महामंडळाकडून त्रैमासिक मोफत पास दिला जातो. एका मार्गावर किमान एका बसचे विद्यार्थी असल्यास त्या मार्गावर बसची फेरी सुरू करण्याचे सौजन्यही एस.टी.महामंडळाकडून दाखविले जाते. त्यामुळे शाळांमधील मुलींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. ही योजना बारावीपर्यंतच्या मुलींसाठी लागू करावी, अशी मागणी होत होती. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मुलींची ही मागणी दिवाळीच्या पर्वावर मंजूर केली.आता ‘अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना’ १२ वीपर्यंतच्या मुलींसाठी लागू करण्यात आली आहे. असंख्य मुलींना आपल्या गावात १२ वीपर्यंत शिक्षणाची सोय नसल्याने गावापासून दुसºया शाळेत शिक्षणासाठी जावे लागते. यासाठी मुली एस.टी.चा पास काढून किंवा आॅटोने महाविद्यालयात जात होत्या. पालकांचे ५०० ते ६०० किंवा त्याहून अधिक पैसे मुलीच्या प्रवासासाठी खर्च होत होते. आता राज्य शासनाच्या मोफत पास घोषणेमुळे पालकांच्या खर्चाची बचत होणार आहे. दिवाळीच्या पर्वावरच हातात मोफत पास आल्याने विद्यार्थीनी हरखून गेल्या आहेत. तालुक्यातील शिरपूर येथील श्री गुरूदेव विद्यालयाच्या १११ मुलींना या योजनेचा लाभ मिळाला. या मुली मंदर, केसुर्ली, शेलू, खांदला, बारेगाव, कुरई, ढाकोरी, डोर्ली, वेळाबाई, मोहदा, कृष्णानपूर या गावांवरून शिरपूर येथे एसटीचा पास काढून शिक्षणासाठी येत आहेत. शनिवारी प्रा.गणेश लोहे यांनी या १११ मुलींना मोफत पासचे वितरण केले. यावेळी प्रा.विजय करमनकर, प्रा.सुधीर वटे, प्रा.सीमा सोनटक्के, प्रा.रूपेश धुर्वे व प्रा.वासुदेव ठाकरे उपस्थित होते.वणी तालुक्यातील शाळांमध्ये मुलींचाच बोलबालामागील काही वर्षापासून वणी तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये मुलींची संख्या मुलाच्या संख्येपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. यावरून मुलींच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट होते. तसेच गुणवत्तेमध्येही मुली मुलांना मागे टाकून आगेकुच करीत आहे. शळांमध्ये होणाºया स्पर्धा, कार्यक्रम यामध्येही मुलांपेक्षा मुलीच पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.