शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

अरुणावती पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा

By admin | Updated: January 12, 2015 23:00 IST

बंद अवस्थेत असलेली अरुणावती पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी निधी मिळावा, यासाठी गेली दोन महिन्यांपासून प्रयत्नात असलेल्या नगरपरिषदेला अखेर यश मिळाले आहे.

दारव्हा : बंद अवस्थेत असलेली अरुणावती पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी निधी मिळावा, यासाठी गेली दोन महिन्यांपासून प्रयत्नात असलेल्या नगरपरिषदेला अखेर यश मिळाले आहे. उन्हाळ्यात दारव्हा शहराची तहान भागविण्याकरिता एकमेव पर्याय असलेल्या या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेसाठी एक कोटी रुपये मिळाले असून कामाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर योजनेच्या कामासाठी एक कोटी २७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पैकी एक कोटी एक लाख ६० हजार रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडून तर उर्वरित २० टक्के रक्कम नगरपरिषदेला खर्च करावी लागणार आहे. निधी मिळाल्यामुळे आता प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन योजनांमधील मोठी असलेली पेकर्डा योजना यावर्षी म्हसणी धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने काही दिवसातच बंद पडू शकते. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असणाऱ्या शहरातील ६० टक्के भागाला पाणीटंचाईला सामोरे जावू लागू शकते. हा धोका लक्षात घेता नगराध्यक्ष अशोक चिरडे यांनी आधीपासूनच अरुणावती पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. एवढ्या महत्त्वाच्या विषयात जिल्हा प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याने योजनेचा प्रस्ताव महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे पाठविण्यात आला. याची त्वरित दखल घेत त्यांनी नागपूर येथे बैठक घेतली. त्यावेळी नगराध्यक्ष चिरडे यांनी अरुणावती योजना सुरू न झाल्यास शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होवू शकते. त्यामुळे या योजनेच्या कामासाठी निधी देण्याची मागणी केली. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेत आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या होत्या. उशिरा का होईना नगरपरिषदेला या योजनेच्या कामासाठी निधी मिळाला आहे. त्यामुळे कामाच्या प्रक्रियेला सुरुवातदेखील झाली आहे. शनिवारी यवतमाळ येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनी, नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांची बैठक पार पडली. योजनेचे काम तत्काळ सुरू होण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)