शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

वणीसाठी प्रवेशाचे स्वतंत्र वेळापत्रक

By admin | Updated: June 26, 2017 00:50 IST

दहाविच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडल्या. जिल्ह्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सर्व कनिष्ठ महाविद्यालयाने सुरू केली आहे.

अकरावीचे प्रवेश : विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी रस्सीखेच लोकमत न्यूज नेटवर्क वणी : दहाविच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडल्या. जिल्ह्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सर्व कनिष्ठ महाविद्यालयाने सुरू केली आहे. मात्र वणी शहरासाठी शिक्षण विभागाने स्वतंत्र वेळापत्रक तयार केले असून त्यानुसार मंगळवारपासून विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात राबविली जाणार आहे. वणीत विज्ञान शाखेच्या दोनच तुकड्या अनुदानीत असल्याने दरवर्षी विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात गाजत आहे. काही विद्यार्थ्यांच्या सामाजिक संघटना धरणे आंदोलन व इतर आंदोलनात्मक अस्त्राचा वापर करून शिक्षण विभागाला वेठीस धरत आहे. प्रशासनाला नाईलाजाने अनुदानीत तुकड्यामध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व अध्ययन प्रक्रियेवर ताण येतो. त्यामुळे यावर्षी शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी वणीकडे अधिक लक्ष दिले आहे. वणीसाठी प्रवेशाचे वेगळे वेळापत्रक तयार केले आहे. विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी सामाईक प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात प्रवेशाचे केंद्र उघडण्यात आले आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राध्यापक नंदकिशोर खीरटकर यांची केंद्रप्रमुख म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी नेमणूक केली आहे. शहरातील लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय, शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय येथे अनुदानीत प्रत्येकी एक तुकडी व लॉयन्स कनिष्ठ महाविद्यालय व वणी पब्लिक स्कूल येथील कायम विना अनुदानीत तुकडीसाठी ही प्रवेश प्रक्रिया होणार आहे, तर वाणिज्य शाखेसाठी लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयात एक तुकडी व वणी पब्लिक स्कुलमध्ये इंग्रजी माध्यमातील एक तुकडी यांचे प्रवेश अर्ज एकत्रपणे प्रवेश केंद्रावर भरावे लागणार आहे. १ जुलैपर्यंत प्रवेश अर्जाचे वितरण व भरलेले अर्ज स्विकारणे, ५ जुलैपर्यंत असलेल्या अर्जाची छाननी, ६ जुलैला प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी आरक्षणानुसार प्रसिद्ध केली जाणार आहे. १० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. ११ जुलै हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. १२ जुलैला रिक्त जागेकरिता प्रतीक्षा यादी जाहीर होईल. १४ जुलैपर्यंत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. १५ जुलै हा दिवस राखीव ठेऊन १७ जुलैला दुसरी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध होणार आहे. १८ जुलैपर्यंत दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन प्रवेश प्रक्रिया थांबविली जाणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य सेतू यावर्षी शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रीकेवर अनुत्तीर्ण हा शेरा लिहीला नाही. एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटीनुसार ११ वीत प्रवेश मिळणार आहे, तर दोनपेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य सेतू योजनेअंतर्गत सहा महिन्याचे प्रशिक्षण घेऊन स्वत:चा रोजगार सुरू करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी लागणारे आवेदनपत्र शाळांना पुरविण्यात आले आहे. ते विद्यार्थ्यांनी भरून दाखवायचे आहे. नापास विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा १९ जुलैपासून घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ३० जुनपर्यंत विलंब शुल्कासहित आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत आहे.