शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

चौदाव्या वित्त आयोगाचा ६० टक्के निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:28 IST

गावाच्या विकासासाठी दिला जाणारा चौदाव्या वित्त आयोगाचा निधी योग्य नियोजनाअभावी परत जाण्याची शक्यता वाढली आहे. अधिकाऱ्यांकडून होत असलेली चालढकल याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देचौदाव्या वित्त आयोगाचा निधी योग्य नियोजनाअभावी परत जाण्याची शक्यता

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : गावाच्या विकासासाठी दिला जाणारा चौदाव्या वित्त आयोगाचा निधी योग्य नियोजनाअभावी परत जाण्याची शक्यता वाढली आहे. अधिकाऱ्यांकडून होत असलेली चालढकल याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील केवळ ४० टक्के निधी खर्च झाला आहे.प्रतिव्यक्ती ४०९ रुपये याप्रमाणे गावाला चौदाव्या वित्त आयोगातून निधी दिला जातो. ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये रक्कम टाकली जाते. ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार या निधीतून कामे हाती घेतली जातात. एक हजार लोकसंख्येच्या गावाला चार लाख नऊ हजारांचा निधी प्राप्त होतो. मात्र हा निधी खर्च करण्यास अधिकाºयांकडे कुठलेही नियोजन नाही. परिणामी गावाच्या विकासाला खीळ बसला आहे.२०१७-१८ या आर्थिक वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी तालुक्यातील ग्रामपंचायतींना मिळाला. आरोग्य, शिक्षण, रोजगार, घनकचरा, पिण्याचे पाणी, सांडपाण्याच्या नाल्या आदी सुविधांसाठी हा निधी वापरला जावू शकतो. यासाठीचे नियोजन मात्र केले जात नाही. कामाचे नियोजन आणि खर्चाविषयी चर्चेसाठी दर १५ दिवसांनी बैठक घेणे अपेक्षित आहे. याकडे दुर्लक्ष केले गेले.महिला बालकल्याण, मागासकल्याण क्षेत्र, दिव्यांग आदींसाठी या निधीतून कामे अथवा मदत अपवादानेच झाली आहे. ग्रामीण रस्ते, आरोग्य या समस्या भीषण झाल्या आहे. निधी असूनही केवळ दुर्लक्ष झाल्याने लाखो रुपये ग्रामपंचायतींच्या खात्यात पडून आहे. तालुक्यात या योजनेची पुरती वाट लागली आहे. गावाच्या विकासासाठी आलेल्या निधीचा योग्य उपयोग व्हावा, अशी अपेक्षा आहे.पाणीटंचाई उपाययोजनासुद्धा नाहीनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. गावासह शेतशिवारातील जलस्त्रोत आटले आहे. टँकरवर तहान भागवावी लागत आहे. ग्रामपंचायतींकडे पैसा आहे. मात्र कारणांचा पाढा वाचत टंचाई दूर करण्यात चालढकल केली जात आहे. अशावेळी निधीचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.