शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
2
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
3
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
4
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
5
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
6
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
7
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
8
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
9
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
10
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
11
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
12
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
13
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
14
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
15
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
16
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
17
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
18
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
19
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
20
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार क्विंटल कापूस व्यापाऱ्यांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:46 IST

ऑनलाईन लोकमत दारव्हा : तालुक्यात अद्यापही शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव गरजू शेतकऱ्यांना आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. सध्या हा बाजार तेजीत असून शासनाच्या उदासीन धोरणामुळे तब्बल चार हजार क्विंटल कापूस व्यापाऱ्यांच्या घशात गेला आहे.यावर्षी शेतमालाची किमान आधारभूत किंमत जाहीर झाल्यानंतर शासनाने जाहिरातबाजी करून शेतमाल ...

ठळक मुद्देदारव्हा तालुका : शासकीय खरेदी केंद्राची अद्यापही प्रतीक्षा

ऑनलाईन लोकमत दारव्हा : तालुक्यात अद्यापही शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव गरजू शेतकऱ्यांना आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. सध्या हा बाजार तेजीत असून शासनाच्या उदासीन धोरणामुळे तब्बल चार हजार क्विंटल कापूस व्यापाऱ्यांच्या घशात गेला आहे.यावर्षी शेतमालाची किमान आधारभूत किंमत जाहीर झाल्यानंतर शासनाने जाहिरातबाजी करून शेतमाल विक्रीकरिता आॅनलाईन नोंदणी करावी तसेच शासकीय खरेदी केंद्रावर माल विक्रीकरिता आणण्याचे आवाहन केले. परंतु कापसाचे पीक हातात पडून महिना झाला तरी दारव्हा तालुक्यात कापूस विक्रीसाठी ना नोंदणी करून घेण्यात आली ना शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले. परिस्थिती एवढी बिकट आहे की अद्याप सेंटर सीसीआय की पणन महासंघाने सुरू करावे याचाही निर्णय झाला नाही. या दोन एजंसीमध्ये फक्त टोलवाटोलवी सुरू आहे. राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या यवतमाळ येथील कार्यालयात विचारणा केली तर दारव्हा सेंटर सीसीआयकडे असल्याचे सांगण्यात येते आणि सीसीआयचे अधिकारी पुरेसा स्टाफ नसल्याचे कारण पुढे करतात. त्यामुळे इतर ठिकाणी महिनाभरापासून कापूस खरेदी सुरू असताना दारव्हा तालुक्यात मात्र अद्याप खरेदीचा मुहूर्त सापडला नाही. या खेळखंडोबामुळे खासगी व्यापाऱ्यांचे चांगले फावत आहे. गरजू शेतकऱ्यांना लेटलतिफ धोरणामुळे विलंब लागत असलेल्या शासकीय कापूस खरेदीची वाट पाहणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना आपला माल मिळेल त्या भावात खुल्या बाजारात विकावा लागतो. सध्या मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीला येत असल्याने अनेक व्यापाºयांनी आपली दुकाने थाटली आहे.आर्णी मार्गावर तर या दुकानांच्या रांगा लागल्या आहे. बाजार समितीच्या आकडेवारीनुसार जवळपास चार हजार क्विंटलची खरेदी झाली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस खुल्या बाजारात येवूनसुद्धा शासकीय केंद्र उघडण्याच्या कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. यामुळे शेतकºयांत नाराजी आहे. त्यामुळे दारव्हा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकºयांना शासनाने वाºयावर सोडले की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राजकीय नेते गप्पचमहिनाभरापासून तालुक्यात कापसाचा बाजार तेजीत असताना अद्यापही शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. तरीसुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नावर कुणीही बोलायला तयार नाही. सत्ताधारी, विरोधी सर्व राजकीय नेते गप्प असून नेत्यांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.