शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

सहा पैकी चार विधानसभा क्षेत्र शिवसेनेला पोषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 23:58 IST

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात येणाऱ्या सहा पैकी चार विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला पोषक वातावरण आहे. त्यामुळे शिवसेनेला विजय सहज शक्य होईल, अशी माहिती जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नागपुरातील आढावा बैठकीत दिली.

ठळक मुद्देयवतमाळ-वाशिम लोकसभा : उद्धव ठाकरेंकडून नागपुरात आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात येणाऱ्या सहा पैकी चार विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला पोषक वातावरण आहे. त्यामुळे शिवसेनेला विजय सहज शक्य होईल, अशी माहिती जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नागपुरातील आढावा बैठकीत दिली.शिवसेना पक्ष प्रमुख शुक्रवारी नागपुरात आले. त्यांनी विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. दुपारी ३.३० वाजता यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठीची आढावा बैठक पार पडली. यावेळी या मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार, खासदार, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, माजी आमदार आदी उपस्थित होते. सुमारे २५ मिनिटे ही बैठक चालली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी दिग्रस, यवतमाळ, वाशिम व कारंजा येथे शिवसेनेला पोषक वातावरण आहे.तर राळेगाव व पुसद मतदारसंघात आणखी परिश्रम करून संघटन बांधणी करावी लागणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. सहापैकी एकाच मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. परंतु पोषक वातावरण व त्याला परिश्रमाची साथ लाभल्यास शिवसेनेच्या आमदारांची संख्या एक वरून चार वर जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शिवाय लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात कायम ठेवण्यासही यश येईल, असे स्पष्ट करण्यात आले.शिवसेनेच्या तमाम पदाधिकाऱ्यांनी गटातटात गुंतून न राहता पक्षासाठी एकजुटीने काम करावे आणि शिवसेनेची ताकद वाढवावी, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केल्या.शिवसैनिकांनो, कामाला लागाआगामी लोकसभा निवडणुकीत कोण उमेदवार असेल, कुणाचे तिकीट पक्के होणार याचा विचार न करता शिवसैनिकांनी पक्षासाठी कामाला लागावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केले. आमदार-खासदारांनीही जनतेच्या कामांवर भर द्यावा, कार्यकर्त्यांनी ही कामे करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.दोन्ही नेत्यांमधील वाद मिटविणारमहसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्यातील वादाकडे एका पदाधिकाºयाने बैठकीत उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची भक्कम ताकद आहे. नेत्यांमधील वाद मिटल्यास ही ताकद आणखी वाढेल, असे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद राहणार नाही, वाद असतील तर ते आपण स्वत: मिटवू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना