शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

सहा पैकी चार विधानसभा क्षेत्र शिवसेनेला पोषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 23:58 IST

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात येणाऱ्या सहा पैकी चार विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला पोषक वातावरण आहे. त्यामुळे शिवसेनेला विजय सहज शक्य होईल, अशी माहिती जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नागपुरातील आढावा बैठकीत दिली.

ठळक मुद्देयवतमाळ-वाशिम लोकसभा : उद्धव ठाकरेंकडून नागपुरात आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात येणाऱ्या सहा पैकी चार विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला पोषक वातावरण आहे. त्यामुळे शिवसेनेला विजय सहज शक्य होईल, अशी माहिती जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नागपुरातील आढावा बैठकीत दिली.शिवसेना पक्ष प्रमुख शुक्रवारी नागपुरात आले. त्यांनी विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. दुपारी ३.३० वाजता यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठीची आढावा बैठक पार पडली. यावेळी या मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार, खासदार, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, माजी आमदार आदी उपस्थित होते. सुमारे २५ मिनिटे ही बैठक चालली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी दिग्रस, यवतमाळ, वाशिम व कारंजा येथे शिवसेनेला पोषक वातावरण आहे.तर राळेगाव व पुसद मतदारसंघात आणखी परिश्रम करून संघटन बांधणी करावी लागणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. सहापैकी एकाच मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. परंतु पोषक वातावरण व त्याला परिश्रमाची साथ लाभल्यास शिवसेनेच्या आमदारांची संख्या एक वरून चार वर जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शिवाय लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात कायम ठेवण्यासही यश येईल, असे स्पष्ट करण्यात आले.शिवसेनेच्या तमाम पदाधिकाऱ्यांनी गटातटात गुंतून न राहता पक्षासाठी एकजुटीने काम करावे आणि शिवसेनेची ताकद वाढवावी, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केल्या.शिवसैनिकांनो, कामाला लागाआगामी लोकसभा निवडणुकीत कोण उमेदवार असेल, कुणाचे तिकीट पक्के होणार याचा विचार न करता शिवसैनिकांनी पक्षासाठी कामाला लागावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केले. आमदार-खासदारांनीही जनतेच्या कामांवर भर द्यावा, कार्यकर्त्यांनी ही कामे करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.दोन्ही नेत्यांमधील वाद मिटविणारमहसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्यातील वादाकडे एका पदाधिकाºयाने बैठकीत उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची भक्कम ताकद आहे. नेत्यांमधील वाद मिटल्यास ही ताकद आणखी वाढेल, असे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद राहणार नाही, वाद असतील तर ते आपण स्वत: मिटवू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना