शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सहा पैकी चार विधानसभा क्षेत्र शिवसेनेला पोषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 23:58 IST

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात येणाऱ्या सहा पैकी चार विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला पोषक वातावरण आहे. त्यामुळे शिवसेनेला विजय सहज शक्य होईल, अशी माहिती जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नागपुरातील आढावा बैठकीत दिली.

ठळक मुद्देयवतमाळ-वाशिम लोकसभा : उद्धव ठाकरेंकडून नागपुरात आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात येणाऱ्या सहा पैकी चार विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला पोषक वातावरण आहे. त्यामुळे शिवसेनेला विजय सहज शक्य होईल, अशी माहिती जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नागपुरातील आढावा बैठकीत दिली.शिवसेना पक्ष प्रमुख शुक्रवारी नागपुरात आले. त्यांनी विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. दुपारी ३.३० वाजता यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठीची आढावा बैठक पार पडली. यावेळी या मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार, खासदार, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, माजी आमदार आदी उपस्थित होते. सुमारे २५ मिनिटे ही बैठक चालली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी दिग्रस, यवतमाळ, वाशिम व कारंजा येथे शिवसेनेला पोषक वातावरण आहे.तर राळेगाव व पुसद मतदारसंघात आणखी परिश्रम करून संघटन बांधणी करावी लागणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. सहापैकी एकाच मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. परंतु पोषक वातावरण व त्याला परिश्रमाची साथ लाभल्यास शिवसेनेच्या आमदारांची संख्या एक वरून चार वर जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शिवाय लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात कायम ठेवण्यासही यश येईल, असे स्पष्ट करण्यात आले.शिवसेनेच्या तमाम पदाधिकाऱ्यांनी गटातटात गुंतून न राहता पक्षासाठी एकजुटीने काम करावे आणि शिवसेनेची ताकद वाढवावी, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केल्या.शिवसैनिकांनो, कामाला लागाआगामी लोकसभा निवडणुकीत कोण उमेदवार असेल, कुणाचे तिकीट पक्के होणार याचा विचार न करता शिवसैनिकांनी पक्षासाठी कामाला लागावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केले. आमदार-खासदारांनीही जनतेच्या कामांवर भर द्यावा, कार्यकर्त्यांनी ही कामे करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.दोन्ही नेत्यांमधील वाद मिटविणारमहसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्यातील वादाकडे एका पदाधिकाºयाने बैठकीत उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची भक्कम ताकद आहे. नेत्यांमधील वाद मिटल्यास ही ताकद आणखी वाढेल, असे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद राहणार नाही, वाद असतील तर ते आपण स्वत: मिटवू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना