शहरं
Join us  
Trending Stories
1
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
2
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
5
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
6
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
7
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
8
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
9
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
10
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
11
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
12
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
13
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
14
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
15
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
16
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
17
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
18
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
19
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
20
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर

पुसद येथे चार दुकाने आगीत भस्मसात, एक कोटींंची हानी

By admin | Updated: August 20, 2016 00:08 IST

येथील मुख्य बाजारपेठेत अचानक लागलेल्या आगीत चार दुकाने भस्मसात झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

मुख्य बाजारपेठेतील घटना : पाच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात पुसद : येथील मुख्य बाजारपेठेत अचानक लागलेल्या आगीत चार दुकाने भस्मसात झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीत तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पाच तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. मुख्य बाजारपेठेतील नगिना चौकातील मोहंमद आसीफ मो.इकबाल यांचे डायमंड शूज सेंटर, वसीम अहमद यांचे सीटी कलेक्शन हे कापड दुकान, मोहंमद शफीक अब्दूल रशीद यांचे बेन्टेक्स ज्वेलरीचे सिंगार नॉव्हेल्टी दुकान आणि आशीर्वाद ड्रेसेस ही चार दुकाने बेचिराख झाली. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक मुख्य बाजारपेठेतून धूर निघताना दिसला. हा प्रकार गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आला. त्यांनी ठाणेदार गजानन शेळके यांना माहिती दिली. शेळके यांनी पुसद, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, यवतमाळ व वाशिम येथील अग्नीशमन विभागाशी संपर्क साधला. उमरखेड येथील अग्नीशमन दल पुसद तालुक्यातील कारला देव येथे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या बंदोबस्तासाठी आले होते. त्यामुळे ते काही वेळातच घटनास्थळावर पोहोचले. त्यानंतर पुसद येथील अग्नीशमन दल घटनास्थळी आले. परंतु तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. दिग्रस, दारव्हा येथील अग्नीशमन दलही येऊन पोहोचले. तब्बल पाच तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत डायमंड शूज सेंटरचे ३० लाख, सीटी कलेक्शन ३० लाख, सिंगार नॉव्हेल्टीचे १४ लाख असा ७४ लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला. तर आशीर्वाद ड्रेसेसमध्ये किती नुकसान झाले हे कळू शकले नाही. त्यांचेही २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सदानंद मनवर, तहसीलदार डॉ. संजय गरकल, ठाणेदार गजानन शेळके आदी दाखल झाले होते. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीने पुसद शहरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करीत आहे. (प्रतिनिधी) घातपाताचा संशय एक ताब्यात मुख्य बाजारपेठेतील या आगीमागे भाऊबंदकीचा वाद असल्याचा संशय व्यक्त होत आहे. शहर ठाणेदार गजानन शेळके यांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी कुणाची तक्रार आल्यास गुन्हा नोंदविण्यात येईल, असे ठाणेदार गजानन शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.