शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पुसद येथे चार दुकाने आगीत भस्मसात, एक कोटींंची हानी

By admin | Updated: August 20, 2016 00:08 IST

येथील मुख्य बाजारपेठेत अचानक लागलेल्या आगीत चार दुकाने भस्मसात झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

मुख्य बाजारपेठेतील घटना : पाच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात पुसद : येथील मुख्य बाजारपेठेत अचानक लागलेल्या आगीत चार दुकाने भस्मसात झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीत तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पाच तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. मुख्य बाजारपेठेतील नगिना चौकातील मोहंमद आसीफ मो.इकबाल यांचे डायमंड शूज सेंटर, वसीम अहमद यांचे सीटी कलेक्शन हे कापड दुकान, मोहंमद शफीक अब्दूल रशीद यांचे बेन्टेक्स ज्वेलरीचे सिंगार नॉव्हेल्टी दुकान आणि आशीर्वाद ड्रेसेस ही चार दुकाने बेचिराख झाली. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक मुख्य बाजारपेठेतून धूर निघताना दिसला. हा प्रकार गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आला. त्यांनी ठाणेदार गजानन शेळके यांना माहिती दिली. शेळके यांनी पुसद, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, यवतमाळ व वाशिम येथील अग्नीशमन विभागाशी संपर्क साधला. उमरखेड येथील अग्नीशमन दल पुसद तालुक्यातील कारला देव येथे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या बंदोबस्तासाठी आले होते. त्यामुळे ते काही वेळातच घटनास्थळावर पोहोचले. त्यानंतर पुसद येथील अग्नीशमन दल घटनास्थळी आले. परंतु तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. दिग्रस, दारव्हा येथील अग्नीशमन दलही येऊन पोहोचले. तब्बल पाच तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत डायमंड शूज सेंटरचे ३० लाख, सीटी कलेक्शन ३० लाख, सिंगार नॉव्हेल्टीचे १४ लाख असा ७४ लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला. तर आशीर्वाद ड्रेसेसमध्ये किती नुकसान झाले हे कळू शकले नाही. त्यांचेही २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सदानंद मनवर, तहसीलदार डॉ. संजय गरकल, ठाणेदार गजानन शेळके आदी दाखल झाले होते. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीने पुसद शहरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करीत आहे. (प्रतिनिधी) घातपाताचा संशय एक ताब्यात मुख्य बाजारपेठेतील या आगीमागे भाऊबंदकीचा वाद असल्याचा संशय व्यक्त होत आहे. शहर ठाणेदार गजानन शेळके यांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी कुणाची तक्रार आल्यास गुन्हा नोंदविण्यात येईल, असे ठाणेदार गजानन शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.