शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

चार नवे पोलीस ठाणे लवकरच

By admin | Updated: August 14, 2014 23:56 IST

यवतमाळ जिल्ह्यात मोहदा, वणी ग्रामीण, लोहारा आणि वसंतनगर (पुसद) या चार नवीन पोलीस ठाण्यांना शासनाने मंजूरी दिली असून हे ठाणे लवकरच अस्तित्वात येतील, अशी माहिती

पांढरकवडा : यवतमाळ जिल्ह्यात मोहदा, वणी ग्रामीण, लोहारा आणि वसंतनगर (पुसद) या चार नवीन पोलीस ठाण्यांना शासनाने मंजूरी दिली असून हे ठाणे लवकरच अस्तित्वात येतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली.येथील पोलीस कर्मचारी वसाहतीच्या इमारत लोकार्पणानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे होते. ना. पाटील पुढे म्हणाले, यवतमाळ जिल्ह्याचा परिसर मोठा असून कित्येक वर्षांपासून पोलीस ठाण्यांची संख्या वाढली नसल्याने पोलिसांवर ताण येत होता. नव्या ठाण्यांमुळे हा ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. आतापर्यंत आम्ही ४० टक्के पोलिसांनाच घरे देवू शकलो. अद्याप ६० टक्के कर्मचारी घरांपासून वंचित आहेत. त्यासाठी १२ हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सर्व कामे बाजूला ठेवून आधी पोलिसांसाठी घरे बांधावी, असा विचार येतो. मात्र दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, कुपोषण या गोष्टींनाही प्राधान्य द्यावे लागत असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.ना. पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात असलेला नक्षलवाद संपुष्टात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादही ५० टक्के कमी झाला. आपण आव्हान म्हणून गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वीकारले. सर्वात जास्त महिलांची संख्या असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. गेल्या चार वर्षात गडचिरोलीमध्ये अडीच हजार पोलिसांची भरती करण्यात आली असून त्यामध्ये ८०० मुलींचा समावेश आहे. अतिरेक्यांच्या कारवाया संपुष्टात आणण्यासाठी मुंबई फोर्स वनसारख्या दलाची निर्मिती करण्यात आली आहे. अद्ययावत शस्त्रसामग्रीने सज्ज असलेले दल कितीही अतिरेकी मुंबईत घुसले तरी त्यांचा सामना करण्यास सज्ज असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले. यावेळी ना. आर.आर. पाटील यांनी अवैध दारू विक्री, पोलिसांना माहीत असलेले अवैध धंदे, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांचे आव्हान, पोलिसांची वेतनवाढ आदी मुद्यांनाही हात घातला.यावेळी ना. पाटील यांनी संपूर्ण वसाहतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. कंत्राटदार हरिश पटेल, आर्किटेक्ट खंडारे यांचा गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी ना. शिवाजीराव मोघे, नगराध्यक्ष शंकर बडे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाला आमदार प्रकाश गजभिये, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, आशीष मानकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन येथील ठाणेदार अशोक बागुल यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)