शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

२४ तासांत चार खून

By admin | Updated: February 26, 2017 01:12 IST

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत खुनाच्या चार घटना घडल्या. या घटनेचा राजकीय वादाशी कुठलाही संबंध नसून स्थानिक पातळीवरील

एसपींची पत्रपरिषद : राजकीय संबंध नाही यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत खुनाच्या चार घटना घडल्या. या घटनेचा राजकीय वादाशी कुठलाही संबंध नसून स्थानिक पातळीवरील भांडणातून या घटना घडल्याचे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पत्रपरिषदेत सांगितले. दारव्हा तालुक्यातील रामगाव हरू येथे गुरुवारी सायंकाळी युवकाचा खून झाला. यातील आरोपी विजय गोबरसिंग पवार याला अटक केली आहे. त्यानंतर महागाव येथे चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात वैद्यकीय अहवालावरून खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी पित्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पांढरकवडा येथे शुक्रवारी सायंकाळी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या युवकाचा खून झाला. याही प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. घाटंजी येथे पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून झाला. यातही तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांचा नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीशी कुठलाही संबंध नाही किंवा इतर कोणत्या राजकीय हेवादाव्यातून या घटना घडल्या नाही, असे एम. राज कुमार यांनी सांगितले. गुरुवारी आर्णी तालुक्यातील अंजनखेड येथे माजी सरपंचांवर झालेला चाकू हल्लाही राजकीय वादातून झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यवतमाळ वाढत्या शहरातील चेन स्रॅचिंगमुळे पोलीस गस्त वाढविली जाणार आहे. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेचा इतर पथकांशी समन्वय ठेवून प्रतिबंधक नियोजन केले जात आहे. शहराच्या प्रमुख भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, बसस्थानकात कॅमेरे लावण्याबाबत आढावा घेण्यात येईल. जास्तीत जास्त गणवेषधारी पोलीस रस्त्यावर कसे दिसतील, याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.काकासाहेब डोळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय देशमुख, पांढरकवडाचे ठाणेदार गुलाबराव वाघ उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)