शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

बेंबळाचे चार कोटी बांधकामच्या तिजोरीतच

By admin | Updated: December 15, 2015 04:30 IST

पुलाच्या बांधकामासाठी बेंबळा कालवे विभागाकडून घेतलेले चार कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिजोरीत पडून

विलास गावंडे ल्ल यवतमाळ पुलाच्या बांधकामासाठी बेंबळा कालवे विभागाकडून घेतलेले चार कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिजोरीत पडून आहे. गेली एक वर्षापासून कामाला सुरुवातच करण्यात आली नाही, तर दुसरीकडे सुमारे नऊ हजार हेक्टर सिंचन प्रभावित झाले आहे. वारंवार तोंडी सूचना आणि पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभाग जुमानत नाही. त्यामुळे बेंबळा कालवे विभागाने बांधकाम विभागाला रक्कम परत मागितल्याची माहिती आहे. बेंबळा प्रकल्प पूर्ण होऊन सात वर्षांपूर्वीच सिंचनासाठी मोकळा करून देण्यात आला आहे. जवळपास १६५ किलोमीटर कालव्यांची निर्मिती करून चार तालुक्यातील गावांना सिंचनासाठी पाणी देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र या कामांमध्ये निर्माण होणाऱ्या अडथळ्यांचा आलेख सातत्याने वाढत आहे. अशातच सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडाचा असहकारही सुरू आहे. कालवा मार्गात येणाऱ्या रस्त्यांवर पुलाची उभारणी करण्यासाठी बेंबळा कालवे विभागाने गेली एक वर्षात बांधकाम विभागाला ३ कोटी ९० लाख रुपये दिले आहे. जानेवारी, मार्च आणि सप्टेंबर २०१५ अशा तीन टप्प्यात निधी दिला जावूनही बांधकाम विभागाने अजूनही कामाला सुरूवात केली नाही. कामांना विलंब होत असल्याने कामांची किंमत सातत्याने वाढत आहे. लाखांचे काम कोटींवर पोहोचले आहे. बांधकाम विभागाने दिलेल्या इस्टिमेटनुसार निधी देण्यात आला. यानंतरही कामे सुरू करण्यात कोणत्या अडचणी आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, पुलाची सर्व कामे मुख्य कालवा मार्गावरील आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पांढरकवडा कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. मागणीनुसार पुरविला निधी४मुख्य कालवा आणि वितरण प्रणालीतील प्रमुख जिल्हा मार्गावर पुलांच्या कामाला अजूनही हात लागलेला नाही. दहेगाव-कुंभा रस्ता, कोपरी-अंतरगाव मार्ग, वडकी-खैरी-करणवाडी, वाढोणाबाजार-आठमुर्डी, वाढोणाबाजार-वेडशी, वाढोणाबाजार-वडकी, वडकी-राळेगाव, राळेगाव-वाढोणाबाजार-वडकी, सावंगी-येवती या रस्त्यांवर पूल उभारणीसाठी बांधकाम विभागाला निधी देण्यात आला आहे. मात्र प्रत्येक कामासाठी आवश्यक तेवढा आणि मागणीनुसार निधी देण्यात आला. कामाला केव्हा सुरुवात होणार याची प्रतीक्षा बेंबळा कालवे विभागाला आहे. एका पुलाअभावी सात हजार हेक्टरचे सिंचन अडलेदहेगाव-कुंभा या प्रमुख जिल्हा मार्गावर पूल नसल्याने सुमारे ७ हजार २३८ हेक्टर क्षेत्रातील सिंचन थांबले आहे. या कामासाठी १ कोटी १० लाख ४० हजार रुपये १३ जानेवारी २०१५ रोजी सार्वजनिक बांधकामच्या पांढरकवडा विभागाला निधी देण्यात आला. सिंचनासाठी महाराष्ट्र सरकारची धडपड सुरू असताना बांधकाम विभागाची दिरंगाई यात खोडा ठरत आहे.