शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्ल्यूचा चारशेचा डोज तब्बल चार हजारांत

By admin | Updated: March 11, 2015 01:56 IST

साधा खोकला, ताप आला तरी स्वाईन फ्ल्यूची शंका येते. उपचारासाठी धावपळ सुरू होते. रुग्णाच्या याच मानसिकतेचा फायदा घेत अवघ्याचा चारशे रुपयाचा डोज चार हजारात दिला जातो.

यवतमाळ : साधा खोकला, ताप आला तरी स्वाईन फ्ल्यूची शंका येते. उपचारासाठी धावपळ सुरू होते. रुग्णाच्या याच मानसिकतेचा फायदा घेत अवघ्याचा चारशे रुपयाचा डोज चार हजारात दिला जातो. जिल्ह्यात हा प्रकार सुरू असून गैरसमज पसरवत रुग्णांना गंडविण्याचा गोरखधंदा काही डॉक्टरांनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयात परिपूर्ण मोफत उपचार होऊन अनेक रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. संपूर्ण राज्यात स्वाईन फ्ल्यूची दहशत आहे. महानगरातील हा आजार ग्रामीण भागातही येऊ पोहोचला आहे. मात्र याबाबत अनेक गैरसमज जाणिवपूर्वक पसरविण्यात येत आहे. लहान मुलांच्या बाबतीत त्यांचे पालक दक्ष असतात. मुलांना स्वाईन फ्ल्यूपासून वाचविण्यासाठी लस निर्माण झाली असल्याची बतावणी केली जात आहे. त्यासाठी पाच ते आठ हजार रुपये मोजावे लागतली असा सल्लाही दिला जात आहे. भितीपोटी अनेक नागरिक याला बळी पडत आहे. याच संधीचा फायदा घेऊन काही डॉक्टर मंडळींनी दुुकानदारीच थाटली आहे. पुणे येथून लस आणण्याचे सांगून पैसे उकळण्याचा धंदा सुरू आहे. या उलट वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत स्वाईन फ्ल्यूच्या १८ संशयीत रुग्णांवर उपचार करण्यात आला. महत्वाचे म्हणजे याच रुग्णालयात कार्यरत निवासी डॉक्टर आणि स्टाफ नर्सला स्वाईन फ्ल्यूची लागण झाली होती. त्यांना रुग्णालयात आठ दिवस भरती ठेवून त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता थेट शासकीय रुग्णालयातच उपचार घ्यावा असे आवाहन वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांकडून केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)खासगी रुग्णालयात प्रतिबंधक लस उपलब्ध नाहीस्वाईन फ्ल्यू प्रतिबंधक लसीचा वापर केवळ अती जोखमीच्या वातावरणात राहणाऱ्यांसाठी केला जात आहे. शासनाकडून डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी ही लस दिली आहे. खासगीत ही लसच उपलब्ध नाही. तसेच सर्दी, ताप, खोकला असलेल्या व्यक्तीला लस देऊनही कोणताच फायदा होत नाही. जास्त प्रोटीन असलेले पदार्थ सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढविता येते.अशी घ्या दक्षतापाच वर्षा आतील बाळ, ६५ वर्षावरील व्यक्ती आणि गरोदर मातांनी यांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. याशिवाय ज्यांना टीबी, दमा, रक्तदाब, किडणी, हृदयाचे आजार असलेल्या व्यक्तींनी सुध्दा गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. शक्यतो हस्तांदोलन करून नये, सर्दी, खोकला, ताप असलेल्या व्यक्तीशी संर्पक टाळावा.ज्या व्यक्तींना सर्दी, ताप, खोकला यासाठी अ‍ॅटीबायोटिकचा दोन दिवसांचा डोज घेऊनही आराम पडत नाही, अशाच व्यक्तीने टॅमीफ्ल्यूचा डोज घ्यावा. ज्यांना सात दिवसापेक्षा अधिक काळ खोकला, ताप, सर्दी आहे. अशा व्यक्तींना टॅमीफ्ल्यू घेण्याची गरज नाही. पहिल्या दोन दिवसानंतरही ३८ डीग्रीपेक्षा अधिक ताप असलेल्या व्यक्तीला टॅमीफ्ल्यू देणे आवश्यक आहे. ज्यांना श्वास घेण्यास त्रास होतो, शरीरातील आॅक्सीजन कमी होऊन त्वचेचा रंग निळसर येतो असा रुग्ण अतिशय जोखमीत मोडतो. - डॉ. बाबा येलके, विभाग प्रमुख औषधशास्त्र वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय