शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बाजार समितीला चार कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:36 IST

यंदा कधी नव्हे ते कापूस व धान्य व्यापाऱ्यांनी वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठ फिरविली आहे. परिणामी बाजार समितीला चार कोटी रुपयांचा फटका बसला.

ठळक मुद्देटाळे लावण्याची वेळ : दोन हजार कुटुंबांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर होणार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : यंदा कधी नव्हे ते कापूस व धान्य व्यापाऱ्यांनी वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठ फिरविली आहे. परिणामी बाजार समितीला चार कोटी रुपयांचा फटका बसला. परिस्थिती अशीच कायम राहिली, तर नजिकच्या काळात या बाजार समितीला टाळे लावावे लागणार आहे. परिणामी बाजार समितीवर विसंबून असलेल्या दोन हजार कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे.मागील वर्षी वणी कृषी उत्पन्न बाजार समितीने २० पैैसे सेस केला होता. त्यावेळी वणीच्या बाजार समितीत विक्रमी कापूस खरेदी झाली. मात्र नंतर बाजार समितीने आकारलेल्या या सेसवर पणन महामंडळाने आक्षेप घेतल्याने बाजार समितीला हा सेस २० पैशावरून ५५ पैैसे करावा लागला. तसेच व्यापाऱ्यांकडून २० पैैशाच्या अतिरिक्त ३० पैैसे सेस वसुल करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे बाजार समितीने संबंधित १८ व्यापाºयांविरुद्ध सहाय्यक निबंधकांकडे सेस वसुलीबाबत प्रकरण दाखल केले. या घडामोडींमुळे संबंधित व्यापारी नाराज झालेत आणि यंदा या व्यापाºयांनी वणीच्या बाजार समितीवर अघोषित बहिष्कारच टाकला. सीसीआयने बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू केले. मात्र बोटावर मोजण्याईतक्या शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस दिला. इकडे खासगी बाजार समितीत शेतकºयांनी गर्दी केली. त्यामुळे खासगी बाजार समितीत १ डिसेंबरपर्यंत सव्वा दोन लाख क्विंटल कापूस व्यापाºयांनी खरेदी केला.धान्य व्यापारीदेखील वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य खरेदी करायला तयार नाहीत. परिणामी बाजार समितीत सध्या शुकशुकाट आहे. सोयाबीनची आवक सध्या वाढली आहे. तीन हजारापर्यंत भाव मिळत असल्याने काही शेतकरी वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत. एकूणच निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एपीएमसीला पुन्हा जुने दिवस येतील काय, अशी भीती व्यक्त होत आहे. बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना दरमहा साडेपाच लाख रुपये वेतन द्यावे लागते. त्यामुळे वेतनाचा प्रश्न गंभीर होणार आहे.निर्णय घेण्याचे अधिकार हवे - संतोष कुचनकारवणी कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. सेसच्या विषयात स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांना अधिकार दिल्यास निर्माण होत असलेल्या परिस्थितीवर मात करता येईल, असे एपीएमसी सभापती संतोष कुचनकार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.