शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ज्ञानगंगा अभयारण्यात रमलेल्या टिपेश्वरच्या 'त्या' वाघासाठी वनविभाग शोधतोय जोडीदार    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 12:08 IST

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन्यजीव विभागाअंतर्गत टिपेश्वर अभयारण्यातील टी१सी१ या  नर वाघाने  औरंगाबाद- बुलढाणा जिल्ह्याच्या  सिमेवरील ज्ञानगंगा अभयारण्यात आपले बस्तान   मांडले  आहे. आता तिथे त्याला स्थिरावण्यासाठी जोडीदाराचा शोध वनविभाग घेत आहे.

भास्कर देवकतेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन्यजीव विभागाअंतर्गत टिपेश्वर अभयारण्यातील टी१सी१ या  नर वाघाने  औरंगाबाद- बुलढाणा जिल्ह्याच्या  सिमेवरील ज्ञानगंगा अभयारण्यात आपले बस्तान   मांडले  आहे. आता तिथे त्याला स्थिरावण्यासाठी जोडीदाराचा शोध वनविभाग घेत आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात स्थायिक  होण्यापूर्वी या वाघाने  तब्बल तीन हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. त्याच्या या प्रवासात टिपेश्वर ते तेलंगणाजवळील आदिलाबादच्या जंगलापर्यंत तसेच उमरखेडचे  पैनगंगा अभयारण्य ते औरंगाबादमधील ज्ञानगंगा आणि अजिंठा डोंगरापर्यंतचा प्रवास समाविष्ट आहे.टिपेश्वरच्या आसपास या वाघाने ३६० किलोमीटर, टिपेश्वार ते ज्ञानगंगा १,४७५ किलोमीटर आणि ज्ञानगंगाच्या आसपास १,१५५ किलोमीटरचे अंतर कापल्याने वनाधिकाऱ्यांनी त्याचे वॉकर असे नामकरण केले आहे. वनाधिकाऱ्यांनी त्याला पकडले तेव्हा त्याच्या पोटाजवळ वायरचे जाळे होते. एक महिन्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि तो व्यवस्थित चालायला लागला. २१ जून २०१९  पर्यंत तो टिपेश्वर, आदिलाबाद आणि पैनगंगा येथे फिरत होता. तदपत्चात पाच डिसेंबरला ज्ञानगंगामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याठिकाणी तो बराचवेळ होता. आता तो त्याठिकाणीच स्थायिक झाला असून या अभयारण्यातील गाभा क्षेत्रातील ५२ चौरस किलोमीटरचे क्षेत्र त्याने व्यापले आहे.भारतीय वन्यजीव संस्थानचे वैज्ञानिक डॉ. बिलाल हबीब आणि त्यांच्या चमुने सुमारे सहा हजार वेगवेगळ्या ठिकाणचे त्याचे जीपीएस ठिकाण शोधले आहे. या दोन वर्षाच्या त्याच्या प्रवासात कधीही मानव आणि त्याचा संघर्ष घडून आला नाही. जंगलासह महामार्ग, नद्या, शेती अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून त्याचा प्रवास झाला आहे. तो त्याचे नैसर्गिक खाद्य वापरत आहे. कधीही त्याने माणसांवर हल्ला केला नाही. त्याची ही संपूर्ण वाटचाल जोडीदाराच्या शोधात असल्याचे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ज्ञानगंगातील त्याचा मुक्काम पाहता त्याच्यासाठी जोडीदार त्याठिकाणी सोडावा का? यावर निर्णय घेण्याकरिता वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी तज्ज्ञांची समिती नेमली आहे.

 

 

टॅग्स :Tigerवाघ