शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

राज्यात शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी जबरदस्तीचे बालरक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 15:28 IST

दीड वर्षांपूर्वी राज्यात ४ लाख बालके शाळाबाह्य असल्याची आकडेवारी शिक्षण विभागानेच पुढे आणली. अशी मुले शोधण्यासाठी शिक्षकांमधूनच बालरक्षक नेमण्याची नवी संकल्पना विद्या प्राधिकरणाने पुढे केली आहे.

ठळक मुद्देसमता विभागाची सक्ती विद्या प्राधिकरणाच्या लिंकवर शिक्षकांचे दुर्लक्ष

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दीड वर्षांपूर्वी राज्यात ४ लाख बालके शाळाबाह्य असल्याची आकडेवारी शिक्षण विभागानेच पुढे आणली. अशी मुले शोधण्यासाठी शिक्षकांमधूनच बालरक्षक नेमण्याची नवी संकल्पना विद्या प्राधिकरणाने पुढे केली आहे. मात्र, बालरक्षक होण्यासाठी शिक्षक अनुत्सूक असताना त्यांच्याकडून जबरदस्तीने होकार घेण्याचे प्रयत्न होत आहेत.शाळाबाह्य मुले शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबाबत विद्या प्राधिकरणाने विशेष पावले उचलली आहेत. त्यासाठी समता विभाग निर्माण करण्यात आला आहे. हा विभाग शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी ‘बालरक्षक’ नेमणार आहेत. मात्र हे बालरक्षक बिनपगारी असतील. त्यामुळे हे पद शिक्षकांसाठी ऐच्छिक ठेवण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी आॅनलाईन लिंक तयार करून शिक्षकांकडून त्यावर स्वेच्छेने माहिती मागविली होती. परंतु, दोन महिने उलटूनही एकाही जिल्ह्यातील शिक्षकांनी बालरक्षक होण्यात रस दाखविलेला नाही.अखेर आता लिंक भरण्याची शिक्षकांवर जबरदस्ती करण्यात येत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाला ‘जलद’ हे पालुपद जोडून बालरक्षक ‘अ‍ॅक्टिव’ करून शाळाबाह्यची समस्या मिटविण्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु, जबरदस्ती करूनही शिक्षक बालरक्षक होण्यास तयार नाही, असे दिसताच आता सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी आदेश पाठूवन प्रत्येक केंद्रातून किमान पाच शिक्षकांकडून लिंक भरून घेण्याची सक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे शिक्षक वर्तुळात नाराजी आहे. जबरदस्तीने नेमलेले बालरक्षक केवळ कागदोपत्री आकडेवारी गोळा करून वेळ मारून नेतील. त्यातून शाळाबाह्य मुलांचा प्रश्न जैसे थे राहील, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.

प्रत्येक केंद्रातून पाच शिक्षकांवर जबाबदारीप्रत्येक तालुक्यातून किमान दोन बालरक्षक, तर आदिवासीबहुल क्षेत्रात प्रत्येक केंद्रातून दोन बालरक्षक निवडावे, असे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शहरी भागात शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात मुलांच्या सुरक्षेविषयक अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे शहरी भागात प्रत्येक केंद्रातून पाच शिक्षकांची निवड करण्याचे आदेश आहेत. या शिक्षकांकडून कोणत्याही स्थितीत २१ मार्चपर्यंत आॅनलाईन लिंक भरून घेण्याची सक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र