शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

बँकांकडून विड्रॉलसाठी पॅनकार्डची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:17 IST

यापुढे सर्व रकमेच्या व्यवहारासाठी पॅन नंबर अनिवार्य असल्याचा निर्णय बँकांनी घेतला आहे.

ठळक मुद्देखातेदारांमध्ये रोष : सणासुदीच्या काळात नागरिकांना मनस्ताप

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : यापुढे सर्व रकमेच्या व्यवहारासाठी पॅन नंबर अनिवार्य असल्याचा निर्णय बँकांनी घेतला आहे. ऐन दिवाळीच्या उत्सवात ही पॅनची सक्ती झाल्याने छोट्या मोठ्या विड्रॉलची मोठी अडचण निर्माण झाली असून सामान्य खातेदारांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.पूर्वी ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहाराकरिता पॅन नंबर मागितला जात होता. मात्र आता कितीही रकमेचा व्यवहार करायचा असेल तर पॅनची सक्ती झाली. त्यामुळे ज्यांच्याकडे पॅनकार्ड नाही त्यांनी विड्रॉल कसा करावा, या विवंचनेत खातेदार सापडले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयातून यासंदर्भात सर्व शाखांना पत्र पाठविण्यात आले. १५ आॅक्टोबरनंतर ज्या खात्यात पॅन नंबरची नोंद राहणार नाही त्यांना व्यवहार करू देवू नये, असे या पत्रात स्पष्टपणे बजावण्यात आले आहे. तत्पूर्वी १५ दिवसात पॅन नंबर सादर करण्याच्या सूचना सर्वांना देण्यात याव्या, असे सांगण्यात आले होते. परंतु एवढ्या कमी कालावधीत सर्व खातेदारांपर्यंत हा निर्णय पोहचणे शक्य नाही. त्यातच ग्रामीण भागातील आणि ज्यांना बँकेतील व्यवहाराचे जास्त काम पडत नाही त्या खातेदारांना अशा अचानक घेतलेल्या निर्णयाची कल्पनाच नाही. आता जेव्हा असे खातेदार खात्यातून पैसे काढण्यासाठी बँकेत जात आहे. त्यावेळी त्यांना पॅन नंबर मागितला जात आहे. आणि अनेकांचे पॅनकार्ड नसल्यामुळे खात्यात रक्कम असूनसुद्धा खाली हात परतावे लागत आहे.राष्ट्रीयकृत बँकांनीसुद्धा वरिष्ठांच्या आदेशावरून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे पॅन नंबर अभावी अनेक खातेदारांचे व्यवहार ठप्प झाले आहे. वरिष्ठांच्या पत्रामध्ये बँकींग विभाग व आयकर विभागाच्या सूचनांचे संदर्भ देण्यात आले. कोणत्याही बँकेमध्ये नवीन खाते उघडताना पॅन नंबर घ्यावा, त्याचप्रमाणे जुन्या खातेदारांना १५ आॅक्टोबरनंतर पॅन नंबर शिवाय व्यवहार करू देवू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. संस्था किंवा कंपनी खातेधारकांचे पॅन नंबर चालणार नाही तर कंपनीच्या नावे पॅनकार्ड काढावे लागणार आहे. या उपरही बिन पॅन नंबर व्यवहार झाल्यास आयकर विभागामार्फत दंडात्मक कार्यवाहीस शाखा व्यवस्थापक जबाबदार राहील असा इशारा देण्यात आल्यामुळे काटेकोरपणे या निर्णयाची अंमलबजावणी होत असून याचा फटका मात्र सर्वसामान्य खातेदारांना बसत आहे.विद्यार्थ्यांना तूर्तास सूटवरिष्ठांच्या आदेशात कुणालाही सूट नसली तरी निराधार योजना, विद्यार्थी यांचे हाल पाहता त्यांना यातून तोंडी सूचनेवरून सूट मिळाली. मात्र इतरही छोट्या खातेदारांना सक्ती असल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.