शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

दारव्ह्यात तयार होतेय बेरोजगारांची फौज

By admin | Updated: May 6, 2015 01:57 IST

तालुक्यात सर्वाधिक संख्या शेतकरी, शेतमजुरांची आहे. स्वाभाविकच त्यांची मुले प्रथम ...

दारव्हा : तालुक्यात सर्वाधिक संख्या शेतकरी, शेतमजुरांची आहे. स्वाभाविकच त्यांची मुले प्रथम शिक्षणाकरिता व त्यानंतर नोकरीसाठी प्रयत्नशील असतात. उच्च शिक्षणासाठी प्रथम लाखो रुपये डोनेशन आणि त्यानंतर नोकरीसाठी पुन्हा डोनेशन देऊन नोकरी मिळविणे या बाबी या लोकसंख्येत सर्वाधिक लोकसंख्येने असलेल्या वर्गाला शक्य होत नाही, होऊ शकत नाही. त्यामुळेच तालुक्यात बेरोजगारांची फौज तयार होत आहे. या वर्गास आज स्थानिक स्तरावर स्वयंरोजगाराच्या अभ्यासक्रमाची गरज आहे. शासन, लोकप्रतिनिधींद्वारे नेमक्या याच गोष्टीकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष केले जात आहे. दारव्ह्यात आयटीआय आहे. पण त्याचा लाभ फक्त आदिवासी बांधवांनाच होतो. इतर मागासवर्गीय आणि सामान्यांकरितासुद्धा आयटीआयची आवश्यकता आहे. जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ, आदिवासी विकास प्रकल्प विभागही बदलत्या स्पर्धात्मक काळातही आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करू शकलेले नाही. हा आदिवासी, मागास भाग विविध प्रकारचे किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम, प्रशिक्षण सुरू करण्यास मागे राहिला आहे.विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठाने या परिसरात रोजगारावर आधारित अभ्यासक्रम सुरू करणे अपेक्षित होते. पण त्यांनीसुद्धा याकडे दुर्लक्ष केलेले आहे. डीएड, बीएड या अभ्यासक्रमांना आता पूर्वीप्रमाणे पसंती राहिली नाही. मात्र नवे अभ्यासक्रम परिसरात सुरू होण्यासाठी प्रयत्न झाले नाही. शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेले आहे. शेती, शेतीवर आधारित उद्योग, लघू उद्योग, जोड उद्योगांच्या प्रशिक्षणाची गरज या क्षेत्रात असताना त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याची नागरिकांची भावना झाली आहे. पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेशासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची सक्ती होती. या कार्यालयाने वेळेच्या आत विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र दिले नाही. त्यामुळे तंत्रनिकेतनमध्ये हमखास प्रवेश मिळू शकणारे अनेक विद्यार्थी वंचित राहिले. शासन, शासकीय अधिकारी जनतेकरिता असतात. पण येथे मात्र चित्र उलट झाले.स्थानिक रहिवाशांना तालुक्यातील, जिल्ह्यातील संस्थांमध्ये नोकऱ्या मिळत नाही, दिल्या जात नाही. व्यवहार सांभाळणाऱ्या बाहेरच्या, परजिल्ह्यातील बेरोजगार त्या पदरात पाडून घेत आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांमध्ये उच्च शिक्षणानंतर वैफल्य येते ते वेगळेच. या सर्व बाबींचा सर्व संबंधितांनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. दारव्हा तालुक्यात शेती हाच एक मजुरी मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे. मात्र हे काम बारमाही चालत नाही. त्यामुळे इतर ठिकाणी काम शोधावे लागते. तिथे समाधानकारक रोजगार मिळत नाही. (प्रतिनिधी)