शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

६० वर्षांत दुसऱ्यांदा झेडपीवर प्रशासकराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

राज्यात १९६२ मध्ये जिल्हा परिषदांची स्थापना झाली, तेव्हापासून आजतागायत लोकप्रतिनिधीच जिल्हा परिषदेचा गाडा हाकत आहेत. यापूर्वी एकदा तब्बल १२ वर्षे निवडणूक झाली नव्हती. त्या दरम्यान १९९१-९२ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेषकुमार शर्मा यांची प्रशासक म्हणून काही महिन्यांसाठी नियुक्ती झाली होती.  यावेळी पदाधिकाऱ्यांची मुदत संपताच २१ मार्चपासून प्रशासक बसविण्यात आला आहे. 

रवींद्र चांदेकरलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : १९६२ मध्ये स्थापना झाल्यापासून ६० वर्षांच्या कार्यकाळात  दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर प्रशासकराज सुरू झाले आहे. २० मार्चला विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यामुळे २१ मार्चपासून प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कारभार हाती घेतला आहे. राज्यात १९६२ मध्ये जिल्हा परिषदांची स्थापना झाली, तेव्हापासून आजतागायत लोकप्रतिनिधीच जिल्हा परिषदेचा गाडा हाकत आहेत. यापूर्वी एकदा तब्बल १२ वर्षे निवडणूक झाली नव्हती. त्या दरम्यान १९९१-९२ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेषकुमार शर्मा यांची प्रशासक म्हणून काही महिन्यांसाठी नियुक्ती झाली होती.  यावेळी पदाधिकाऱ्यांची मुदत संपताच २१ मार्चपासून प्रशासक बसविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून देवराव आनंदराव चौधरी यांनी १९६२ पासून १९६७ पर्यंत कामकाज सांभाळले. त्यानंतर १९६७ ते ७२ पर्यंत सदाशिवराव ठाकरे, १९७२ ते ७७ पर्यंत सुधाकरराव नाईक, १९७७ ते ७८ पर्यंत सुधाकरराव पाटील, १९७८ ते ७९ पर्यंत पुरुषोत्तम इंगोले, १९७९ ते ८५ पर्यंत पुन्हा सदाशिवराव ठाकरे, १९८५ ते ८७ पर्यंत गोविंदराव पाटील, १९८७ ते १९९० पर्यंत प्रल्हादराव बोक्से यांनी कामकाज सांभाळले. त्यानंतर ॲड. निलय नाईक, शुभमताई इंगोले, अशोकराव घारफळकर, वेणुताई काटवले, भाऊराव चौधरी, माणिकराव मेश्राम, अनुसयाताई चौधरी, रमेशराव चव्हाण, संध्याताई सव्वालाखे, ॲड. प्रफुल्ल मानकर, प्रतिभाताई खडसे, प्रीतिलाताई दुधे, राहुल ठाकरे, प्रवीण देशमुख, डॉ. आरतीताई फुपाटे, माधुरी आडे आणि कालिंदा पवार यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. १९७८ पासून तब्बल बारा वर्षे निवडणूकच झाली नव्हती. त्या काळात चौघांनी अध्यक्षपद सांभाळले. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतानाच सदाशिवराव ठाकरे खासदार म्हणूनही निवडून आले होते. सुधाकरराव नाईक अध्यक्ष पदानंतर थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपालही झाले होते. आता ६० वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासकराज आले आहे. 

 दोन निवडणुका टळल्या- १९६२ मध्ये जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यानंतर दर पाच वर्षांनी निवडणूक होणे अपरिहार्य होते. त्यानुसार १९७७ पर्यंत दर पाच वर्षांनी निवडणुका झाल्या. मात्र, त्यानंतर १९८२ आणि १९८७ ला निवडणूक न होता थेट १९९२ मध्येच निवडणूक झाली. या काळात पाचजणांनी अध्यक्षपद सांभाळले. १९७७ ते १९९२ याच काळात एकदा राज्यातील सर्व जिल्हा परिषदा शासनाने बरखास्त केल्या होत्या. मात्र, एकमेव यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना तीन वर्षांची मुदतवाढ मिळाली होती. आता दुसऱ्यांदा प्रशासकांच्या हाती जिल्हा परिषदेचा कारभार सोपविण्यात आला.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद