शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

६० वर्षांत दुसऱ्यांदा झेडपीवर प्रशासकराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

राज्यात १९६२ मध्ये जिल्हा परिषदांची स्थापना झाली, तेव्हापासून आजतागायत लोकप्रतिनिधीच जिल्हा परिषदेचा गाडा हाकत आहेत. यापूर्वी एकदा तब्बल १२ वर्षे निवडणूक झाली नव्हती. त्या दरम्यान १९९१-९२ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेषकुमार शर्मा यांची प्रशासक म्हणून काही महिन्यांसाठी नियुक्ती झाली होती.  यावेळी पदाधिकाऱ्यांची मुदत संपताच २१ मार्चपासून प्रशासक बसविण्यात आला आहे. 

रवींद्र चांदेकरलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : १९६२ मध्ये स्थापना झाल्यापासून ६० वर्षांच्या कार्यकाळात  दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर प्रशासकराज सुरू झाले आहे. २० मार्चला विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यामुळे २१ मार्चपासून प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कारभार हाती घेतला आहे. राज्यात १९६२ मध्ये जिल्हा परिषदांची स्थापना झाली, तेव्हापासून आजतागायत लोकप्रतिनिधीच जिल्हा परिषदेचा गाडा हाकत आहेत. यापूर्वी एकदा तब्बल १२ वर्षे निवडणूक झाली नव्हती. त्या दरम्यान १९९१-९२ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेषकुमार शर्मा यांची प्रशासक म्हणून काही महिन्यांसाठी नियुक्ती झाली होती.  यावेळी पदाधिकाऱ्यांची मुदत संपताच २१ मार्चपासून प्रशासक बसविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून देवराव आनंदराव चौधरी यांनी १९६२ पासून १९६७ पर्यंत कामकाज सांभाळले. त्यानंतर १९६७ ते ७२ पर्यंत सदाशिवराव ठाकरे, १९७२ ते ७७ पर्यंत सुधाकरराव नाईक, १९७७ ते ७८ पर्यंत सुधाकरराव पाटील, १९७८ ते ७९ पर्यंत पुरुषोत्तम इंगोले, १९७९ ते ८५ पर्यंत पुन्हा सदाशिवराव ठाकरे, १९८५ ते ८७ पर्यंत गोविंदराव पाटील, १९८७ ते १९९० पर्यंत प्रल्हादराव बोक्से यांनी कामकाज सांभाळले. त्यानंतर ॲड. निलय नाईक, शुभमताई इंगोले, अशोकराव घारफळकर, वेणुताई काटवले, भाऊराव चौधरी, माणिकराव मेश्राम, अनुसयाताई चौधरी, रमेशराव चव्हाण, संध्याताई सव्वालाखे, ॲड. प्रफुल्ल मानकर, प्रतिभाताई खडसे, प्रीतिलाताई दुधे, राहुल ठाकरे, प्रवीण देशमुख, डॉ. आरतीताई फुपाटे, माधुरी आडे आणि कालिंदा पवार यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. १९७८ पासून तब्बल बारा वर्षे निवडणूकच झाली नव्हती. त्या काळात चौघांनी अध्यक्षपद सांभाळले. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतानाच सदाशिवराव ठाकरे खासदार म्हणूनही निवडून आले होते. सुधाकरराव नाईक अध्यक्ष पदानंतर थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपालही झाले होते. आता ६० वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासकराज आले आहे. 

 दोन निवडणुका टळल्या- १९६२ मध्ये जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यानंतर दर पाच वर्षांनी निवडणूक होणे अपरिहार्य होते. त्यानुसार १९७७ पर्यंत दर पाच वर्षांनी निवडणुका झाल्या. मात्र, त्यानंतर १९८२ आणि १९८७ ला निवडणूक न होता थेट १९९२ मध्येच निवडणूक झाली. या काळात पाचजणांनी अध्यक्षपद सांभाळले. १९७७ ते १९९२ याच काळात एकदा राज्यातील सर्व जिल्हा परिषदा शासनाने बरखास्त केल्या होत्या. मात्र, एकमेव यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना तीन वर्षांची मुदतवाढ मिळाली होती. आता दुसऱ्यांदा प्रशासकांच्या हाती जिल्हा परिषदेचा कारभार सोपविण्यात आला.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद