शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

खरिपासाठी कपाशीचे 24 लाख पॅकेट बियाणे हवे, उपलब्ध केवळ 15 लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

देशभरातील ११४ कंपन्या बियाणे विक्रीसाठी जिल्ह्यात घोडदौड करीत आहेत. कोट्यवधी रुपयांचे बियाणे विक्री करताना कंपन्यांनी गावापासून ते शहरापर्यंत जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. मान्सूनपूर्व लागवड होऊ नये म्हणून कृषी विभागाने विशेष नियोजन केली होती. १ जूनपासून विक्री करण्याच्या सूचना होत्या. जिल्ह्यात चार लाख ५५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे. गतवर्षी कापूस लागवडीचे क्षेत्र चार लाख ३३ हजार हेक्टरवर मर्यादित राहिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी कापसाचे दर १४ हजार रुपये क्विंटलच्या पार पोहोचले आहेत. यामुळे खरीप हंगामात विक्रमी कापूस लागवड होण्याचे संकेत आहे. १ जूनपासून कापसाचे बियाणे विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे पहिल्याच दिवशी कृषी सेवा केंद्रांमध्ये बियाणे शोधण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर कापसाची लागवड होत असल्याने बियाणे कंपन्यांनी १५ लाख पॅकेटस्‌ बाजारात उतरविले आहे. मागणी २४ लाख पॅकेटस्‌ची आहे. देशभरातील ११४ कंपन्या बियाणे विक्रीसाठी जिल्ह्यात घोडदौड करीत आहेत. कोट्यवधी रुपयांचे बियाणे विक्री करताना कंपन्यांनी गावापासून ते शहरापर्यंत जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. मान्सूनपूर्व लागवड होऊ नये म्हणून कृषी विभागाने विशेष नियोजन केली होती. १ जूनपासून विक्री करण्याच्या सूचना होत्या. जिल्ह्यात चार लाख ५५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे. गतवर्षी कापूस लागवडीचे क्षेत्र चार लाख ३३ हजार हेक्टरवर मर्यादित राहिले होते. यावर्षी कापसाला चांगले दर मिळाल्याने कापसाचे लागवड क्षेत्र २५ हजार हेक्टरने वाढले आहे. यामध्ये पेरणी होईपर्यंत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चार लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्राकरिता २४ लाख पॅकेट्स जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यापैकी विविध कंपन्यांचे १५ लाख पॅकेट्स दाखल झालेले आहे. कापसाचे क्षेत्र वाढले तर मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. यासाेबतच दोन लाख ८३ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होण्याची शक्यता आहे. यासाठी दोन लाख क्विंटल बियाणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत ७७ हजार ९१९ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. पावणेदोन लाख क्विंटल बियाणे शेतकरी घरीच तयार करीत आहे. यामुळे या बियाणांचा खर्च शेतकऱ्यांना वाचविता येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र ३० हजार हेक्टरने घटले आहे. प्रत्यक्षात पेरणीनंतरच जिल्ह्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. यावर्षी तूर लागवडीचे क्षेत्रही सव्वा लाख हेक्टरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यासाठी १६ हजार १३३ क्विंटल बियाणाची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी आठ हजार ६०० क्विंटल बियाणे बाजारपेठेत दाखल झाले आहे. 

किमतीतही झाली मोठी वाढ - सोयाबीनच्या बॅगचे दर यावर्षी ३६०० रुपयांवरून चार हजार ते ४२०० रुपयापर्यंत पोहोचले आहे. त्याच सोबतच खताच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गतवर्षी १२०० रुपयांचे असलेले पोते यावर्षी १५०० रुपयांपर्यंत बाजारात पहायला मिळत आहे. यातून शेतकऱ्यांना आर्थिक गणित मांडताना मोठ्या अडचणी येणार आहे. 

बाजारपेठेत बोगस बिटीचा धुमाकूळ - चांगल्या बियाणासोबतच छुप्या पद्धतीने बोगस बियाणे बाजारात शिरले आहे. कृषी विभाग अशा बियाणांचा शोध घेत आहे. बियाणांच्या बॅगवरील टॅग आणि इतर माहिती तपासूनच बियाणांची खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अधिकृत दुकानातून खरेदी केली तरच बोगस बियाणांवर कारवाई करताना शेतकऱ्यांना आधार लागणार आहे. यामुळे बियाणांची खरेदी करताना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.

 

टॅग्स :agricultureशेती