शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
3
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
8
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
9
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
10
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
11
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
12
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
13
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
14
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
15
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
16
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
17
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
18
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

पुसद येथे प्रकल्पग्रस्तांचे अन्नत्याग आंदोलन

By admin | Updated: May 2, 2015 01:58 IST

तालुक्यातील इसापूर धरणामुळे १३ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र येथील ग्रामस्थांची समस्या अद्यापही कायम आहे.

पुसद : तालुक्यातील इसापूर धरणामुळे १३ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र येथील ग्रामस्थांची समस्या अद्यापही कायम आहे. शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने या ग्रामस्थांनी महाराष्ट्र दिनापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. पैनगंगा नदीवर ३५ वर्षांपूर्वी इसापूर धरण साकारण्यात आले. त्यावेळी मोप, शिवणी, रोहकर, जाम नाईक (१, २), जवळा, नाणंद (१, २, ३) ही गावे विस्थापित झाली. ३५ वर्षानंतरही येथील ग्रामस्थांना प्रकल्पग्रस्तांच्या एकही सोयी-सुविधा मिळाली नाही. केवळ प्रशासनाकडून लेखी आश्वासने देण्यात आली. आठ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या १३ गावात एकही पांदण रस्ता करण्यात आला नाही. धरणग्रस्त हे प्रमाणपत्र असलेल्या सुशिक्षीत बेरोजगारांना शासकीय सेवेत सामावून घेतले नाही. आठ हजार प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील केवळ २५ जणांना शासकीय सेवेत घेतले. होरकड येथील प्रकाश निवृत्ती कांबळे (३९) या युवकाने २००५ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यानंतरही १० वर्षे लोटून प्रकाशला नोकरी मिळाली नाही. आज त्याच्याकडे स्वत:चे घर नाही. अशीच अवस्था विलास रामा खंडारे याची आहे. शिवणी या गावात तीन वर्षांपासून ग्रामसभाच नाही. गावात ग्रामसेवक कधीच आला नाही, असे पंडीतराव घुमकर यांनी सांगितले. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, सिंचनाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही. २८ (अ)चा निधी अद्यापही उपलब्ध झालेला नाही. गावात सातवीपर्यंत शाळा नाही, स्मशानभूमी नाही. रोजगार नसल्याने युवकांत निराशा पसरली आहे, असे माधवराव कांबळे, विलास खंदारे, शिवाजी मस्के, कादूराम गुळवे, दत्तराव हाके, अंकुश शिंदे, विजय बोडखे, दीपक सावंत यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचे नेतृत्व अ‍ॅड़ सचिन नाईक करत आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या एक महिन्यात पूर्ण झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही असे सांगण्यात आले. पुसदच्या गांधी चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. यामध्ये मारोतराव जराड, माधव मस्के, पार्वतीबाई वाळले, शिला कांबळे, आनंद मरकड, गजानन बुरकुडे, रमेश खरात, डॉ. लक्ष्मण मस्के, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पग्रस्त कमिटीचे अध्यक्ष डॉ.बी.जी. नाईक, अभय गडम, ज्ञानेश्वर तडसे, अ‍ॅड़ चंद्रशेखर शिंदे, अरूण शिरसाठ, प्रभाकर थोरात आदी सहभागी झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)