शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

कारपेटयुक्त फळ विक्रेत्यांवर अन्न व औषधी प्रशासन मेहेरबान

By admin | Updated: June 11, 2014 00:20 IST

यवतमाळ शहरात फळे पिकविण्यासाठी कारपेटचा मोठ्या प्रमाणात आणि खुलेआम वापर सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असलेली ही फळे सर्रास बाजारात विकली जात आहे.

यवतमाळ : यवतमाळ शहरात फळे पिकविण्यासाठी कारपेटचा मोठ्या प्रमाणात आणि खुलेआम वापर सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असलेली ही फळे सर्रास बाजारात विकली जात आहे. त्यानंतरही गेल्या कित्येक वर्षात अन्न व औषधी प्रशासनाने एकाही फळ विक्रेत्यावर कारवाई केली नाही की फळांची साधी तपासणीही करण्याची तसदी घेतली नाही. यावरून हे प्रशासन या फळ विक्रेत्यांवर मेहेरबान असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान कारपेट युक्त फळाच्या होलसेल व चिल्लर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन ग्राहक संरक्षण संस्थेचे प्रदेशाध्यक्ष मोहनीश सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी विदर्भ अध्यक्ष सुरेश सिडाम, जिल्हा महासचिव विक्रांत वानखडे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ तेलतुंबडे, नाना हर्षे, प्रमोद गट्टावार, समीर भांडेगावकर, रवी ताटू, शाम सोळंकी, अविनाश राठोड, अशोक लुटे आदी उपस्थित होते. राज्यातील विविध बाजारांमध्ये रसायन वापरुन फळ पिकविणारे व विक्रेत्यांविरुद्ध अन्न व औषधी प्रशासनाने यंदाच्या उन्हाळ्यात बेधडक कारवाई केली. विशेषत: आंबा विक्रेत्यांवर पाळत ठेवली गेली. यवतमाळचा अन्न व औषधी प्रशासन विभाग मात्र याला अपवाद ठरला आहे. या विभागाने अशा फळ विक्रेत्यांविरुद्ध गेल्या कित्येक वर्षात एकही कारवाई केली नाही. एवढेच नव्हे तर तपासणी मोहीमही राबविली नाही. यावरून अन्न व औषधी प्रशासनाचे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या होलसेल फळविक्रेत्यांशी साटेलोटे असल्याचे उघड होते. फळ विक्रेत्यांवर कारवाईसाठी अन्न प्रशासन अधिकाऱ्यांना तक्रारीची आवश्यकता भासते. तक्रारकर्ता असल्याशिवाय हे अधिकारी कारवाईसाठी जाण्याची हिंमत दाखवत नाही. तक्रारकर्त्याला कारवाईसाठी सोबत राहण्याचा आग्रह धरला जातो. त्यामागे ‘आमचे काही नाही, तक्रार आली म्हणून तपासणीसाठी आलो’ असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. एवढेच नव्हे तर आलेली तक्रार दडपण्यासाठीही रॉयल्टी वाढवून घेतली जाते. हा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात व शहरात सर्वत्र सर्रास सुरू आहे. ग्राहक संरक्षण संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर आता काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न व औषधी प्रशासनाला एवढ्या वर्षात फळ विक्रेत्यावर नेमकी काय कारवाई केली याचा अहवाल मागावा, कारवाई नसल्यास या अधिकाऱ्यांवरच कारवाई करावी, अशी मागणीही ग्राहक संरक्षण संस्थेने केली आहे. (प्रतिनिधी)