शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

बुडीत क्षेत्रातील चाऱ्याचा पशुधनाला आधार

By admin | Updated: January 24, 2015 01:56 IST

जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे चारा टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. पशुधनाला वाचविण्यासाठी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात चाऱ्याची लागवड केली जाणार आहे.

लोकमत विशेषयवतमाळ : जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे चारा टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. पशुधनाला वाचविण्यासाठी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात चाऱ्याची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. पशुधनासाठी ३ लाख ४२ हजार मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता भासणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी अभिनव प्रयोग जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. शेतकऱ्यांना विविध योजनेतून १०० टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. मात्र याचे आजपर्यंत योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले नाही. यावर्षी तर पावसाने दडी मारल्यामुळे चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे. आॅगस्ट ते जुलै या पद्धतीने चाऱ्याचे नियोजन केले जाते. यावर्षी पेरेपत्रकावरच्या पिकातून १९ लाख २३ हजार मेट्रिक टन चाऱ्याचे उत्पादन झाले. यातील ११ लाख २० हजार मेट्रिक टन चारा जानेवारी अखेरपर्यंत संपणार आहे. उर्वरित सहा महिन्यासाठी केवळ ८ लाख ३ हजार मेट्रिक टन चारा शिल्लक आहे. यातून दुधाळ जनावराचे संगोपन करणे शक्य होणार नाही. आज जिल्ह्यात ८९ हजार दुधाळ जनावरे आहेत. त्यांना किमान दीड लाख मेट्रिक टन हिरवा चारा लागणार आहे. शिवाय उर्वरित जनावरांच्या पोषणाचा प्रश्न कायम आहे. यावरच उपाय म्हणून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप सोनकुसळे यांनी अभिनव योजना आखली. यात थोडा बदल करून जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल यांनी त्याला मान्यता दिली आहे. चारा उत्पादनासाठी तालुक्यांच्या स्तरावर समिती स्थापन केली आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून तहसीलदार, सचिव पशुधन विकास अधिकारी, सदस्य तालुका कृषी अधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी राहणार आहेत. कृषी विभागाकडून सात हेक्टरवर आणि पशुसंवर्धन विभागाने पाच हजार हेक्टरवर चारा लागवडीचे नियोजन केले आहे. यातून किमान ३ लाख ७५ हजार मेट्रिक टन हिरवा चारा मिळणार आहे. जुन-जुलै महिन्यात उद्भवणाऱ्या चारा टंचाईचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून आताच केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)