शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यावर भर द्या

By admin | Updated: January 18, 2016 02:29 IST

शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास ती गावातच सोडविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

व्ही. गिरीराज : बळीराजा चेतना अभियानासह विविध बाबींचा आढावायवतमाळ : शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास ती गावातच सोडविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी ग्रामस्तरावर याची व्याप्ती वाढविण्याचे आवाहन ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव व्ही. गिरीराज यांनी केले. महसूल भवन येथे पालक सचिवांनी बळीराजा चेतना अभियानासह धडक सिंचन विहीर, घरकुल, जीवनदायी आरोग्य योजना, आधारकार्ड, अन्न सुरक्षा योजना, सावकारी कर्जमाफी, जलयुक्त शिवार अभियान, विहिरींना विजजोडणी आदींचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, नरेंद्र फुलझेले, फडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मरसाळे, भुयार आदी उपस्थित होते. बळीराजा चेतना अभियानांतर्गत ग्रामस्तरावर जिल्हाभरात १८४८ समित्यांची स्थापना करण्यात आली. त्यातून अडचणी त्वरित सुटणार असल्याने नकारात्मक विचार डोक्याला शिवणार नाही. या समित्यांमुळे बळीराजाला जगण्याचे बळ मिळणार असल्याचे गिरीराज यांनी सांगितले. गावातील शेतकऱ्यांना गावातच सर्व प्रकारची सामाजिक, आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, असुरक्षिततेची भावना शेतकऱ्यांच्या मनालाही शिवणार नाही यासाठी गावस्तरावरील या समित्या काम करणार असल्याचे जिल्ह्याचे पालक सचिव व्ही. गिरीराज यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)