शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेती आणि शेतकºयांवरच फोकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:02 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेती आणि शेतकºयांवरच माझा सर्वाधिक फोकस राहील, सर्व विषयाला आपण प्राधान्य देणार असून....

ठळक मुद्देजिल्हाधिकारी राजेश देशमुख : प्रशासन पारदर्शक व गतिमान करणार

यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेती आणि शेतकºयांवरच माझा सर्वाधिक फोकस राहील, सर्व विषयाला आपण प्राधान्य देणार असून प्रशासन गतिमान आणि पारदर्शक करणार असल्याची ग्वाही नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची कृषी आयुक्त म्हणून पदोन्नती झाल्यानंतर त्यांच्या जागेवर सातारा येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांची नियुक्ती झाली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. शेतकरी व शेती संदर्भात केंद्र व राज्य शासनाच्या असलेल्या योजना अतिशय पारदर्शकपणे राबविण्याचे नियोजन करण्यात येईल. याशिवाय जिल्हा नियोजन समितीचा निधी मंजूर कामावर वेळेत कसा खर्च होईल, यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचा आपला प्रयत्न असेल. सर्व विभागांच्या समन्वयातून या योजना राबविल्या जातात. विशेष करून जिल्हा परिषदेची यंत्रणा नियोजन समितीचा निधी मोठ्या प्रमाणात खर्च करते. त्यासाठी विविध समित्यांकडून जिल्हा परिषदेत मंजुरी घ्यावी लागते. ही प्रक्रिया अधिक सुटसुटीत करून कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले. त्यांनी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील फ्लोराईड युक्त पाणी असलेल्या गावांची माहिती घेतली. या गावांमध्ये कायमस्वरूपी पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्याबाबत तोडगा काढण्यावर काम करणार आहे. शेतकºयांना पूरक व्यवसाय म्हणून दुध उत्पादन वाढविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.तत्पूर्वी जिल्हाधिकाºयांचे आगमन होताच अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी. भराडी, राष्टÑीय सूचना व माहिती केंद्राचे राजेश देवते, उपजिल्हाधिकारी महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.एमपीएससीत दुसरा क्रमांकजिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले डॉ. राजेश देशमुख १९९२ मध्ये महाराष्टÑ लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली. जून १९९३ मध्ये बीड येथे परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून ते शासन सेवेत रुजू झाले. त्यानंतर बीड येथे उपविभागीय अधिकारी, नांदेड येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, लातूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी आणि विविध मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. सातारा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक लोकाभिमूख उपक्रम राबविले. त्याची दखल राष्टÑीय व राज्य पातळीवर घेण्यात आली आहे.