शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
2
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
3
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
4
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
5
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
6
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
7
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
8
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
9
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
10
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
11
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
12
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
13
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
14
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
15
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
16
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
17
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
18
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
19
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
20
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
Daily Top 2Weekly Top 5

शेती आणि शेतकºयांवरच फोकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:02 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेती आणि शेतकºयांवरच माझा सर्वाधिक फोकस राहील, सर्व विषयाला आपण प्राधान्य देणार असून....

ठळक मुद्देजिल्हाधिकारी राजेश देशमुख : प्रशासन पारदर्शक व गतिमान करणार

यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेती आणि शेतकºयांवरच माझा सर्वाधिक फोकस राहील, सर्व विषयाला आपण प्राधान्य देणार असून प्रशासन गतिमान आणि पारदर्शक करणार असल्याची ग्वाही नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची कृषी आयुक्त म्हणून पदोन्नती झाल्यानंतर त्यांच्या जागेवर सातारा येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांची नियुक्ती झाली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. शेतकरी व शेती संदर्भात केंद्र व राज्य शासनाच्या असलेल्या योजना अतिशय पारदर्शकपणे राबविण्याचे नियोजन करण्यात येईल. याशिवाय जिल्हा नियोजन समितीचा निधी मंजूर कामावर वेळेत कसा खर्च होईल, यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचा आपला प्रयत्न असेल. सर्व विभागांच्या समन्वयातून या योजना राबविल्या जातात. विशेष करून जिल्हा परिषदेची यंत्रणा नियोजन समितीचा निधी मोठ्या प्रमाणात खर्च करते. त्यासाठी विविध समित्यांकडून जिल्हा परिषदेत मंजुरी घ्यावी लागते. ही प्रक्रिया अधिक सुटसुटीत करून कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले. त्यांनी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील फ्लोराईड युक्त पाणी असलेल्या गावांची माहिती घेतली. या गावांमध्ये कायमस्वरूपी पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्याबाबत तोडगा काढण्यावर काम करणार आहे. शेतकºयांना पूरक व्यवसाय म्हणून दुध उत्पादन वाढविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.तत्पूर्वी जिल्हाधिकाºयांचे आगमन होताच अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी. भराडी, राष्टÑीय सूचना व माहिती केंद्राचे राजेश देवते, उपजिल्हाधिकारी महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.एमपीएससीत दुसरा क्रमांकजिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले डॉ. राजेश देशमुख १९९२ मध्ये महाराष्टÑ लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली. जून १९९३ मध्ये बीड येथे परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून ते शासन सेवेत रुजू झाले. त्यानंतर बीड येथे उपविभागीय अधिकारी, नांदेड येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, लातूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी आणि विविध मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. सातारा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक लोकाभिमूख उपक्रम राबविले. त्याची दखल राष्टÑीय व राज्य पातळीवर घेण्यात आली आहे.