शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

जवळा येथे पाणी पेटले

By admin | Updated: April 30, 2016 02:42 IST

आर्णी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून आजरोजी १५ हजार लोकसंख्या असलेले हे गाव पाण्याच्या टंचाईने हैराण झाले आहे.

गावकऱ्यांचे हाल : नळयोजना बंद, हातपंप पडले कोरडेजवळा : आर्णी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून आजरोजी १५ हजार लोकसंख्या असलेले हे गाव पाण्याच्या टंचाईने हैराण झाले आहे. गावातील नळ योजना पूर्णपणे बंद पडली आहे. पाणीपुरवठ्याच्या दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गावातील सर्व हातपंप कुचकामी झाले आहेत. त्यामुळे गावात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गुंडभर पाण्यासाठी एक-एक किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. महिला, पुरुष तसेच लहान मुले उन्हातान्हात पाण्यासाठी वनवन भटकत आहेत.ग्रामपंचायतसुद्धा पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र ग्रामपंचायतला अद्याप पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे यश आलेले नाही. ग्रामपंचायतीला पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ५ लाख ८० हजार रुपये निधी मंजूर झाला होता. या निधीतून ग्रामपंचायतने पाणीपुरवठ्याच्या विहिरीचे खोलीकरण केले. त्यानंतर त्याच विहिरीला आडवे बोर सुद्धा मारले. मात्र या कामाचा कोणताही फायदा झाला नाही.आजरोजी गावातील जनता प्रशासनावर कमालीची चिडली आहे. ग्रामपंचायत कार्यालयावर महिला मंडळीचा दररोज मोर्चा येत आहे. तहसीलदार गटविकास अधिकारी, ठाणेदार यांच्यासुद्धा पाणीटंचाई निवारणासाठी बैठका होत आहे. मात्र गावाला पाणीटंचाईपासून दिलासा मिळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरत आहे. देवगाव डॅम पूर्णपणे कारडा पडल्यामुळे परिसरातील छोट्या छोट्या खेड्यामध्येही पाणीटंचाई निर्माण झाली आहे.ग्राम स्वच्छता अभियान स्वच्छ भारत यासारख्या बाबी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात खर्च करून ग्रामीण भागात अनुदान देवून मोठ्या प्रमाणात शौचालय बांधून दिले. टीव्ही, रेडिओच्या माध्यमातून शौचालय बांधा व वापरा, त्यासाठी त्याचे महत्त्वही जनतेला पटवून दिले. मात्र पाणीटंचाईमुळे लुप्त झालेले टमरेल घेवून लोक सकाळी शौचासाठी बाहेर पडताना दिसत आहे. नियमित शौचालयाचा वापर करणारी मंडळी आता उघड्यावर जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जवळा येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. स्थानिक पुढाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण भागात भंडणतंटा गावातच सोडविला जावा यासाठी शासनाने तंटामुक्त अभियान राबविले. त्यासाठी बहुतांश गावाला त्या स्वरुपाचे पुरस्कारही प्राप्त झाले. मात्र आज पाणीटंचाईमुळे पाण्यासाठी शेजाऱ्या-शेजाऱ्यामध्ये भांडणतंटा होत आहे. वेळीच पाणीटंचाईवर मात करण्यात आली नाही तर गावात भीषण परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)