शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

जवळा येथे पाणी पेटले

By admin | Updated: April 30, 2016 02:42 IST

आर्णी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून आजरोजी १५ हजार लोकसंख्या असलेले हे गाव पाण्याच्या टंचाईने हैराण झाले आहे.

गावकऱ्यांचे हाल : नळयोजना बंद, हातपंप पडले कोरडेजवळा : आर्णी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून आजरोजी १५ हजार लोकसंख्या असलेले हे गाव पाण्याच्या टंचाईने हैराण झाले आहे. गावातील नळ योजना पूर्णपणे बंद पडली आहे. पाणीपुरवठ्याच्या दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गावातील सर्व हातपंप कुचकामी झाले आहेत. त्यामुळे गावात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गुंडभर पाण्यासाठी एक-एक किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. महिला, पुरुष तसेच लहान मुले उन्हातान्हात पाण्यासाठी वनवन भटकत आहेत.ग्रामपंचायतसुद्धा पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र ग्रामपंचायतला अद्याप पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे यश आलेले नाही. ग्रामपंचायतीला पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ५ लाख ८० हजार रुपये निधी मंजूर झाला होता. या निधीतून ग्रामपंचायतने पाणीपुरवठ्याच्या विहिरीचे खोलीकरण केले. त्यानंतर त्याच विहिरीला आडवे बोर सुद्धा मारले. मात्र या कामाचा कोणताही फायदा झाला नाही.आजरोजी गावातील जनता प्रशासनावर कमालीची चिडली आहे. ग्रामपंचायत कार्यालयावर महिला मंडळीचा दररोज मोर्चा येत आहे. तहसीलदार गटविकास अधिकारी, ठाणेदार यांच्यासुद्धा पाणीटंचाई निवारणासाठी बैठका होत आहे. मात्र गावाला पाणीटंचाईपासून दिलासा मिळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरत आहे. देवगाव डॅम पूर्णपणे कारडा पडल्यामुळे परिसरातील छोट्या छोट्या खेड्यामध्येही पाणीटंचाई निर्माण झाली आहे.ग्राम स्वच्छता अभियान स्वच्छ भारत यासारख्या बाबी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात खर्च करून ग्रामीण भागात अनुदान देवून मोठ्या प्रमाणात शौचालय बांधून दिले. टीव्ही, रेडिओच्या माध्यमातून शौचालय बांधा व वापरा, त्यासाठी त्याचे महत्त्वही जनतेला पटवून दिले. मात्र पाणीटंचाईमुळे लुप्त झालेले टमरेल घेवून लोक सकाळी शौचासाठी बाहेर पडताना दिसत आहे. नियमित शौचालयाचा वापर करणारी मंडळी आता उघड्यावर जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जवळा येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. स्थानिक पुढाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण भागात भंडणतंटा गावातच सोडविला जावा यासाठी शासनाने तंटामुक्त अभियान राबविले. त्यासाठी बहुतांश गावाला त्या स्वरुपाचे पुरस्कारही प्राप्त झाले. मात्र आज पाणीटंचाईमुळे पाण्यासाठी शेजाऱ्या-शेजाऱ्यामध्ये भांडणतंटा होत आहे. वेळीच पाणीटंचाईवर मात करण्यात आली नाही तर गावात भीषण परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)