शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

फ्लोराईडयुक्त पाणी उठले जीवावर

By admin | Updated: April 7, 2016 02:37 IST

तालुक्यालगतच्या बंदीभागात किडणी, हाडे ठिसूळ होणे, दात खराब होणे अशा आजाराने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.

बंदीभागात घराघरात रुग्ण : किडणीसह विविध आजाराचे थैमानमहागाव : तालुक्यालगतच्या बंदीभागात किडणी, हाडे ठिसूळ होणे, दात खराब होणे अशा आजाराने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. एक नव्हे, दोन नव्हे तर तीन-चार गावात या रोगाने थैमान घातले आहे. किडणीचा भयंकर आजार आणि प्रचंड खर्चाची बाजू सावरताना सामान्य कुटुंब अक्षरश: मेटाकुटीला आलेले आहे. उपचारासाठी हाती काहीच शिल्लक नाही. आता जीवन जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.उमरखेड तालुक्याच्या बंदीभागात आदिवासी, बंजाराबहुल गावे आहेत. चिखली या छोट्याशा गावात फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे २२ रुग्ण किडणीच्या आजाराचे शिकार बनले. त्यातील एक स्वत: डॉक्टर आहेत. डॉ. एल.डी. चव्हाण (७०) यांचा या रोगाबाबतचा अनुभव भयंकर असून हृदय पिळवटून टाकणारा आहे. आतापर्यंत डॉक्टरवर जे उपचार केले त्याचा खर्च आठ लाख रुपये झाला. आता दोन-तीन दिवसाआड त्यांना नांदेड येथे डायलेसिस उपचार करण्यासाठी जावे लागते. बंदीभागातील ३५ ते ५० वयोगटातील नैसर्गिक मृत्यू खरेतर आरोग्य यंत्रणेच अपयश लपवण्यासाठी नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवले जात आहेत. चिखलीचे यशवंत राठोड (४२), मोहन जाधव (४५) नांदेड येथे उपचार घेत आहेत. बाळू जाधव (३५) याचा काही महिन्यापूर्वी मृत्यू झाला आहे. अन्य २२ रुग्ण या गंभीर आजाराने तडफडत आहेत. धमापूर, भवानी, मुरली, डोंगरगाव, बोरगाव दराटी, कोरटा, खरबी यासह परिसरातील नागरिक दूषित पाणी आणि फ्लोराईडयुक्त पाणी सेवनामुळे विविध आजाराने त्रस्त आहेत. दराटी येथील उत्तमराव राठोड (४५) यांच्या उजव्या किडणीचे नुकतेच मुंबईत आॅपरेशन झाले. किडणीच काढून टाकण्यात आली. केवळ दूषित पाण्याचा होत असलेला पुरवठा हेच मुख्य कारण असावे असा त्यांचा वैयक्तिक समज असून डॉक्टरांनी मात्र अ‍ॅसेडीटीच्या गोळ्याच्या अतिसेवनाने हा आजार बळावल्याचे निदान केले. दराटीत या आजाराने आतापर्यंत चार मृत्यू झाले. टाकळीला राहुल नामक तरुण नुकताच याच आजाराने दगावला आहे. प्रशासन आणि बंदीभागातील आदिवासी यांची कायम नाळ तुटलेली आहे. कोरटा, दराटी येथे आरोग्य उपकेंद्र आहेत. त्यात औषध डॉक्टरांचा कायम तुटवडा असतो. वेळेत उपचार मिळत नाही. तालुका जिल्हा मुख्यालयी जावून उपचार करायचे झाल्यास रात्री-बेरात्री पैनगंगा अभयारण्यातील प्राण्याची भीती असते. बोरगाव येथे मुलगी आणि वडील आस्वलाने मारले होते. त्या जयस्वाल कुटुंबाला अद्याप लाभ मिळाला नाही. (शहर प्रतिनिधी)