शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

फ्लोराईडयुक्त पाणी उठले जीवावर

By admin | Updated: April 7, 2016 02:37 IST

तालुक्यालगतच्या बंदीभागात किडणी, हाडे ठिसूळ होणे, दात खराब होणे अशा आजाराने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.

बंदीभागात घराघरात रुग्ण : किडणीसह विविध आजाराचे थैमानमहागाव : तालुक्यालगतच्या बंदीभागात किडणी, हाडे ठिसूळ होणे, दात खराब होणे अशा आजाराने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. एक नव्हे, दोन नव्हे तर तीन-चार गावात या रोगाने थैमान घातले आहे. किडणीचा भयंकर आजार आणि प्रचंड खर्चाची बाजू सावरताना सामान्य कुटुंब अक्षरश: मेटाकुटीला आलेले आहे. उपचारासाठी हाती काहीच शिल्लक नाही. आता जीवन जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.उमरखेड तालुक्याच्या बंदीभागात आदिवासी, बंजाराबहुल गावे आहेत. चिखली या छोट्याशा गावात फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे २२ रुग्ण किडणीच्या आजाराचे शिकार बनले. त्यातील एक स्वत: डॉक्टर आहेत. डॉ. एल.डी. चव्हाण (७०) यांचा या रोगाबाबतचा अनुभव भयंकर असून हृदय पिळवटून टाकणारा आहे. आतापर्यंत डॉक्टरवर जे उपचार केले त्याचा खर्च आठ लाख रुपये झाला. आता दोन-तीन दिवसाआड त्यांना नांदेड येथे डायलेसिस उपचार करण्यासाठी जावे लागते. बंदीभागातील ३५ ते ५० वयोगटातील नैसर्गिक मृत्यू खरेतर आरोग्य यंत्रणेच अपयश लपवण्यासाठी नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवले जात आहेत. चिखलीचे यशवंत राठोड (४२), मोहन जाधव (४५) नांदेड येथे उपचार घेत आहेत. बाळू जाधव (३५) याचा काही महिन्यापूर्वी मृत्यू झाला आहे. अन्य २२ रुग्ण या गंभीर आजाराने तडफडत आहेत. धमापूर, भवानी, मुरली, डोंगरगाव, बोरगाव दराटी, कोरटा, खरबी यासह परिसरातील नागरिक दूषित पाणी आणि फ्लोराईडयुक्त पाणी सेवनामुळे विविध आजाराने त्रस्त आहेत. दराटी येथील उत्तमराव राठोड (४५) यांच्या उजव्या किडणीचे नुकतेच मुंबईत आॅपरेशन झाले. किडणीच काढून टाकण्यात आली. केवळ दूषित पाण्याचा होत असलेला पुरवठा हेच मुख्य कारण असावे असा त्यांचा वैयक्तिक समज असून डॉक्टरांनी मात्र अ‍ॅसेडीटीच्या गोळ्याच्या अतिसेवनाने हा आजार बळावल्याचे निदान केले. दराटीत या आजाराने आतापर्यंत चार मृत्यू झाले. टाकळीला राहुल नामक तरुण नुकताच याच आजाराने दगावला आहे. प्रशासन आणि बंदीभागातील आदिवासी यांची कायम नाळ तुटलेली आहे. कोरटा, दराटी येथे आरोग्य उपकेंद्र आहेत. त्यात औषध डॉक्टरांचा कायम तुटवडा असतो. वेळेत उपचार मिळत नाही. तालुका जिल्हा मुख्यालयी जावून उपचार करायचे झाल्यास रात्री-बेरात्री पैनगंगा अभयारण्यातील प्राण्याची भीती असते. बोरगाव येथे मुलगी आणि वडील आस्वलाने मारले होते. त्या जयस्वाल कुटुंबाला अद्याप लाभ मिळाला नाही. (शहर प्रतिनिधी)