शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

फ्लोराईडयुक्त पाणी उठले जीवावर

By admin | Updated: April 7, 2016 02:37 IST

तालुक्यालगतच्या बंदीभागात किडणी, हाडे ठिसूळ होणे, दात खराब होणे अशा आजाराने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.

बंदीभागात घराघरात रुग्ण : किडणीसह विविध आजाराचे थैमानमहागाव : तालुक्यालगतच्या बंदीभागात किडणी, हाडे ठिसूळ होणे, दात खराब होणे अशा आजाराने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. एक नव्हे, दोन नव्हे तर तीन-चार गावात या रोगाने थैमान घातले आहे. किडणीचा भयंकर आजार आणि प्रचंड खर्चाची बाजू सावरताना सामान्य कुटुंब अक्षरश: मेटाकुटीला आलेले आहे. उपचारासाठी हाती काहीच शिल्लक नाही. आता जीवन जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.उमरखेड तालुक्याच्या बंदीभागात आदिवासी, बंजाराबहुल गावे आहेत. चिखली या छोट्याशा गावात फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे २२ रुग्ण किडणीच्या आजाराचे शिकार बनले. त्यातील एक स्वत: डॉक्टर आहेत. डॉ. एल.डी. चव्हाण (७०) यांचा या रोगाबाबतचा अनुभव भयंकर असून हृदय पिळवटून टाकणारा आहे. आतापर्यंत डॉक्टरवर जे उपचार केले त्याचा खर्च आठ लाख रुपये झाला. आता दोन-तीन दिवसाआड त्यांना नांदेड येथे डायलेसिस उपचार करण्यासाठी जावे लागते. बंदीभागातील ३५ ते ५० वयोगटातील नैसर्गिक मृत्यू खरेतर आरोग्य यंत्रणेच अपयश लपवण्यासाठी नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवले जात आहेत. चिखलीचे यशवंत राठोड (४२), मोहन जाधव (४५) नांदेड येथे उपचार घेत आहेत. बाळू जाधव (३५) याचा काही महिन्यापूर्वी मृत्यू झाला आहे. अन्य २२ रुग्ण या गंभीर आजाराने तडफडत आहेत. धमापूर, भवानी, मुरली, डोंगरगाव, बोरगाव दराटी, कोरटा, खरबी यासह परिसरातील नागरिक दूषित पाणी आणि फ्लोराईडयुक्त पाणी सेवनामुळे विविध आजाराने त्रस्त आहेत. दराटी येथील उत्तमराव राठोड (४५) यांच्या उजव्या किडणीचे नुकतेच मुंबईत आॅपरेशन झाले. किडणीच काढून टाकण्यात आली. केवळ दूषित पाण्याचा होत असलेला पुरवठा हेच मुख्य कारण असावे असा त्यांचा वैयक्तिक समज असून डॉक्टरांनी मात्र अ‍ॅसेडीटीच्या गोळ्याच्या अतिसेवनाने हा आजार बळावल्याचे निदान केले. दराटीत या आजाराने आतापर्यंत चार मृत्यू झाले. टाकळीला राहुल नामक तरुण नुकताच याच आजाराने दगावला आहे. प्रशासन आणि बंदीभागातील आदिवासी यांची कायम नाळ तुटलेली आहे. कोरटा, दराटी येथे आरोग्य उपकेंद्र आहेत. त्यात औषध डॉक्टरांचा कायम तुटवडा असतो. वेळेत उपचार मिळत नाही. तालुका जिल्हा मुख्यालयी जावून उपचार करायचे झाल्यास रात्री-बेरात्री पैनगंगा अभयारण्यातील प्राण्याची भीती असते. बोरगाव येथे मुलगी आणि वडील आस्वलाने मारले होते. त्या जयस्वाल कुटुंबाला अद्याप लाभ मिळाला नाही. (शहर प्रतिनिधी)