शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

२५० गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी

By admin | Updated: May 1, 2017 00:15 IST

जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील २५० गावांमधील पिण्याच्या पाण्याचे ४७१ स्त्रोत फ्लोराईडयुक्त आहे.

४७१ स्त्रोत्र :दूषित पाण्याची समस्या कायमच, २२५ ग्रामपंचायतीअंतर्गतची गावे, आरओ मंजूर, पण बसलेच नाही यवतमाळ : जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील २५० गावांमधील पिण्याच्या पाण्याचे ४७१ स्त्रोत फ्लोराईडयुक्त आहे. या गावांमधील नागरिकांना तेच पाणी प्राशन करावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात दोन हजारांवर गावे आहे. तब्बल बाराशे ग्रामपंचायती व गटग्रामपंचायती आहे. या अंतर्गत ही सर्व २५० गावे येतात. विविध गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या आहे. त्यात कुठे नळयोजना, हातपंप, सौरपंप, तर कुठे सार्वजनिक विहिरींव्दारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र यातील तब्बल २५० गावांमधील पिण्याच्या पाण्याचे ४७१ स्त्रोत्र फ्लोराईडयुक्त असल्याचे एका पाहणीत आढळून आले. तेथील ग्रामस्थ तेच पाणी प्राशन करीत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील २५० गावांमधील पाण्याचे ४७१ स्त्रोत्र फ्लोराईडयुक्त असून त्यात १३५ नळयोजना आहेत. या नळांना फ्लोराईडयुक्त पाणी येत आहे. उर्वरित स्त्रोत्रांमध्ये हातपंपाच्या पाण्याचा समावेश आहे. याशिवाय काही विहिरींचासुद्धा समावेश आहे. विशेष म्हणजे अशा परिसरात ५७ टक्के हातपंपांचे पाणी फ्लोराईडयुक्त असल्याचे पाहणीत आढळून आल्याने तेथील ग्रामस्थांच्या आरोग्याची समस्या उभी ठाकली आहे. या पाहणीत दिग्रस तालुक्यातील एकही स्त्रोत्र फ्लोराईडयुक्त नसल्याचे आढळून आले. मात्र याच तालुक्यातील काही गावांत किडणी आजाराचे रूग्ण आहे. (शहर प्रतिनिधी)