शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार ! कुटुंबीयांनी धानोरकरांवर केले गंभीर आरोप
2
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
3
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
4
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
5
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
6
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
7
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
8
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
9
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
10
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
11
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
12
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
13
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
14
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
15
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
16
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
17
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
18
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
19
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
20
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?

निळोणा व चापडोहात तरंगते पंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:18 IST

इमरजन्सी लावून, चर खोदून पाणी ओढण्याची क्षमताही संपल्याने आता अखेरचा उपाय म्हणून निळोणा आणि चापडोह प्रकल्पात तरंगते पंप लावले जाणार आहे.

ठळक मुद्देमहिनाभराची सोय : विस्कळीत पाणीपुरवठा नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : इमरजन्सी लावून, चर खोदून पाणी ओढण्याची क्षमताही संपल्याने आता अखेरचा उपाय म्हणून निळोणा आणि चापडोह प्रकल्पात तरंगते पंप लावले जाणार आहे. या आधारे पिण्याच्या पाण्याची महिनाभराची सोय होणार आहे. पण, पाणी १५ किंवा त्यापेक्षाही अधिक दिवसानंतरच मिळणार आहे. शहरात विकास कामांची घाई सुरू आहे. मशीनने होणाऱ्या कामांमुळे पाईपलाईन फुटत आहे. हा प्रताप नळ सोडल्यानंतरच लक्षात येत असल्यानेही पाणी वितरण बिघडत असल्याचे सांगितले जाते.चापडोह प्रकल्पातून शहराच्या ६० टक्केपेक्षा अधिक भागाला पाणीपुरवठा होतो. वाघापूर नाका, पिंपळगाव, वैभवनगर, दर्डा नगर, सुयोगनगर आणि लोहारा ग्रामपंचायतीच्या आवारात असलेल्या दोन टाक्या याच प्रकल्पाच्या पाण्याने भरल्या जातात. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला असताना त्यातून तीन पंपाद्वारे दर तासाला सात लाख २० हजार लिटर पाण्याचा उपसा केला जातो. आता केवळ एक पंप सुरू आहे.निळोणा प्रकल्पाचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही. या प्रकल्पातून गोदनी रोडवरील दोन मोठ्या टाक्या भरल्या जातात. मागील काही वर्षांपासूनच हा प्रकल्प दगा देत आहे. प्रकल्पातील पाणी चर खोदून आणत असल्याने आता दर तासाला तीन लाख लिटरही पाण्याचा उपसा होत नाही.पाणी संपल्याने अनेकदा फुटबॉल बंद पडते. ओढलेले पाणी फिल्टर करून टाकीत सोडणे आणि पाणीपुरवठा करणे या प्रक्रियेला १२ तासांचा अवधी लागत आहे. चार तासांच्या पाणीपुरवठ्यानंतर रिकामी झालेली टाकी भरण्यासाठी दुसऱ्याच दिवसाची वाट पाहावी लागते. एका टाकीद्वारे सहा ते सात भागांना पाणीपुरवठा होतो.वाघापूर नाक्यावर असलेल्या टाकीतून अग्रवाल ले-आऊट, चांदोरेनगर, मोहा आदी धामणगाव रोडवर असलेल्या भागाला पाणीपुरवठा होतो. आता या भागाला १२ मार्च किंवा त्यानंतरच पाणीपुरवठा होणार आहे. या टाकीवरील पूर्ण भागात पाणी सोडल्यानंतर उर्वरित टाक्यांवर असलेल्या भागाला पाणी वितरण होणार आहे. मजीप्रा कार्यालयाच्या आवारात असलेल्या दोनही टाक्यावरून शहराच्या जुन्या भागासह, मोहा, उमरसरा या भागांना पाणी दिले जाते. दर्डानगर टाकीवरून ६ ते ८ मार्च या कालावधीत पाणीपुरवठा केला जाणार आहे. यात जाम रोड, ओम कॉलनी, श्रमिक सोसायटी, मुलकी आदी भागांचा समावेश आहे.चापडोह आणि निळोणा प्रकल्पात तरंगते पंप लावण्याची प्रक्रियाही वांद्यात आली होती. त्यातून मार्ग निघाला आहे. दोनही प्रकल्पामध्ये ३१५ एमएमचे प्रत्येकी सहा तरंगते पंप लावले जाणार आहे. अधिकाधिक पाणी वेलपर्यंत आणण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे पाणीपुरवठ्याला गती येईल, असा विश्वास प्राधिकरणाकडून व्यक्त केला जात आहे.पाण्याचा अपव्यय थांबविण्याची गरजभीषण टंचाईला सामोरे जावे लागत असतानाही यवतमाळ शहरात पाण्याचा अपव्यय सुरू आहे. नळ आल्यानंतर गाड्या धुणे, अंगणात शिंपडने, झाडांना पाणी टाकणे कमी झालेले नाही. रात्री नळाचा कॉक सुरू करून ठेवला जातो. टाकी भरल्यानंतर त्यातून पाणी धो-धो वाहत राहते. या विषयी दक्षता घेतल्यास पाण्याचा अपव्यय टाळला जाऊ शकतो.कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावनापाणीपुरवठ्यातील अनियमितता कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी ठरत आहे. त्यांना लोकांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे. एका कामगाराने तर भीतीपोटी काम सोडल्याची माहिती आहे. मोर्चा धडकल्यास पोलिसांची मदत मागितली जाते. पोलीस पोहोचेपर्यंत लोकांनी राग व्यक्त केलेला असतो. या सर्व प्रकारामुळे कर्मचाºयांमध्ये भीती आहे. लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.