शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

गोळ्या झेलूनही ध्वजारोहणाचा मान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 22:37 IST

देशाच्या सीमांचे रक्षण करताना शत्रूच्या गोळ्या खायच्या आम्ही. बलिदानानंतर गावाकडे अंतिम संस्कार करताना चार बंदुकीच्या फैरी झाडल्या की झाला आमचा सन्मान. निवृत्तीनंतर साधा ध्वजारोहणाचा मानही आम्हाला मिळत नाही. हा प्रकार किती दिवस चालायचा, असा प्रश्न सेवानिवृत्त लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देमाजी सैनिकाची खंत । निवृत्त लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांची खदखद

संजय भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : देशाच्या सीमांचे रक्षण करताना शत्रूच्या गोळ्या खायच्या आम्ही. बलिदानानंतर गावाकडे अंतिम संस्कार करताना चार बंदुकीच्या फैरी झाडल्या की झाला आमचा सन्मान. निवृत्तीनंतर साधा ध्वजारोहणाचा मानही आम्हाला मिळत नाही. हा प्रकार किती दिवस चालायचा, असा प्रश्न सेवानिवृत्त लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांनी उपस्थित केला आहे.१५ आॅगस्टला सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्या पार्श्वभूमिवर त्यांनी ‘लौकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, देशाचा ध्वज उंच राहावा म्हणून सैनिक बलिदान करतात. मात्र जिवंतपणी आमच्या नशिबी नरक यातना येतात. आता सैनिकाच्या सन्मानात बदल झाला पाहिजे, अशी अपेक्षा घेऊन ते अन्य सैनिकांच्या अधिकारासाठी लढत आहे. सैनिकाच्या डोळ्यासमोर केवळ एकच विचार असतो, देशाचे संरक्षण करणे. मृत्यू केव्हा येईल हे सांगता येत नाही. डोळ्यात तेल घालून सीमेचे संरक्षण करताना आधी देश, नंतर कुटुंब हाच विचार मनात असतो. कित्येकदा कुटुंबातील सदस्यांचे छायाचित्र व त्यांची पत्रे खिशात घालूनच पहारा द्यावा लागतो, असे त्यांनी सांगितले.लक्ष्मणराव कानडे रा.मुडाणा यांच्या बालपणीच आई-वडिलांचा मृत्यू झाला. १९६४ मध्ये लक्ष्मणराव कानडेसह ७0 युवक यवतमाळला सैन्य भरतीसाठी गेले. त्या सर्वांची निवड झाली. कानडे यांना मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव ट्रेनिंग सेंटर येथे पहिली नियुक्ती मिळाली. प्रशिक्षण पूर्ण झाले त्यावेळी बांगलादेशचे युद्ध संपले होते. युद्ध संपल्यामुळे जनतेत जाऊन मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले होते. यानंतर त्यांची नियुक्ती लेह-लडाख येथे झाली. तेथे केवळ बर्फ आणि बर्फातच त्यांनी दिवस-रात्र काढली. निवृत्तीनंतर गाव, खेड्यांमध्ये सैनिकाच्या हस्ते साधे ध्वजारोहण केले जात नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.तहसीलमध्ये सैनिकांची माहितीच नाहीमाजी सैनिकांसाठी तालुका तेथे कार्यालयाकरिता जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी कानडे यांनी केली. १५ आॅगस्ट आला की आमची छाती भरून येते. मात्र दुर्दैव असे की निवृत्त सैनिकांची माहिती तहसीलमध्ये उपलब्ध नाही. ध्वजारोहणाचे साधे निमंत्रणही मिळत नाही. लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांनी निवृत्त सैनिकांच्या विविध समस्या शासन स्तरावर सोडवून घेण्याकरिता ‘जय जवान माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थे’ची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून माजी सैनिक रामदास वंजारे, संजय राठोड, दत्तराव टेकाळे, प्रयागबाई हिंगाडे, जगदेव हिंगमिरे, राजू कानडे, रंगराव आखरे, नंदाताई अंभोरे अहोरात्र काम करीत आहेत.

टॅग्स :SoldierसैनिकIndependence Dayस्वातंत्र्य दिन