शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गोळ्या झेलूनही ध्वजारोहणाचा मान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 22:37 IST

देशाच्या सीमांचे रक्षण करताना शत्रूच्या गोळ्या खायच्या आम्ही. बलिदानानंतर गावाकडे अंतिम संस्कार करताना चार बंदुकीच्या फैरी झाडल्या की झाला आमचा सन्मान. निवृत्तीनंतर साधा ध्वजारोहणाचा मानही आम्हाला मिळत नाही. हा प्रकार किती दिवस चालायचा, असा प्रश्न सेवानिवृत्त लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देमाजी सैनिकाची खंत । निवृत्त लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांची खदखद

संजय भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : देशाच्या सीमांचे रक्षण करताना शत्रूच्या गोळ्या खायच्या आम्ही. बलिदानानंतर गावाकडे अंतिम संस्कार करताना चार बंदुकीच्या फैरी झाडल्या की झाला आमचा सन्मान. निवृत्तीनंतर साधा ध्वजारोहणाचा मानही आम्हाला मिळत नाही. हा प्रकार किती दिवस चालायचा, असा प्रश्न सेवानिवृत्त लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांनी उपस्थित केला आहे.१५ आॅगस्टला सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्या पार्श्वभूमिवर त्यांनी ‘लौकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, देशाचा ध्वज उंच राहावा म्हणून सैनिक बलिदान करतात. मात्र जिवंतपणी आमच्या नशिबी नरक यातना येतात. आता सैनिकाच्या सन्मानात बदल झाला पाहिजे, अशी अपेक्षा घेऊन ते अन्य सैनिकांच्या अधिकारासाठी लढत आहे. सैनिकाच्या डोळ्यासमोर केवळ एकच विचार असतो, देशाचे संरक्षण करणे. मृत्यू केव्हा येईल हे सांगता येत नाही. डोळ्यात तेल घालून सीमेचे संरक्षण करताना आधी देश, नंतर कुटुंब हाच विचार मनात असतो. कित्येकदा कुटुंबातील सदस्यांचे छायाचित्र व त्यांची पत्रे खिशात घालूनच पहारा द्यावा लागतो, असे त्यांनी सांगितले.लक्ष्मणराव कानडे रा.मुडाणा यांच्या बालपणीच आई-वडिलांचा मृत्यू झाला. १९६४ मध्ये लक्ष्मणराव कानडेसह ७0 युवक यवतमाळला सैन्य भरतीसाठी गेले. त्या सर्वांची निवड झाली. कानडे यांना मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव ट्रेनिंग सेंटर येथे पहिली नियुक्ती मिळाली. प्रशिक्षण पूर्ण झाले त्यावेळी बांगलादेशचे युद्ध संपले होते. युद्ध संपल्यामुळे जनतेत जाऊन मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले होते. यानंतर त्यांची नियुक्ती लेह-लडाख येथे झाली. तेथे केवळ बर्फ आणि बर्फातच त्यांनी दिवस-रात्र काढली. निवृत्तीनंतर गाव, खेड्यांमध्ये सैनिकाच्या हस्ते साधे ध्वजारोहण केले जात नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.तहसीलमध्ये सैनिकांची माहितीच नाहीमाजी सैनिकांसाठी तालुका तेथे कार्यालयाकरिता जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी कानडे यांनी केली. १५ आॅगस्ट आला की आमची छाती भरून येते. मात्र दुर्दैव असे की निवृत्त सैनिकांची माहिती तहसीलमध्ये उपलब्ध नाही. ध्वजारोहणाचे साधे निमंत्रणही मिळत नाही. लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांनी निवृत्त सैनिकांच्या विविध समस्या शासन स्तरावर सोडवून घेण्याकरिता ‘जय जवान माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थे’ची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून माजी सैनिक रामदास वंजारे, संजय राठोड, दत्तराव टेकाळे, प्रयागबाई हिंगाडे, जगदेव हिंगमिरे, राजू कानडे, रंगराव आखरे, नंदाताई अंभोरे अहोरात्र काम करीत आहेत.

टॅग्स :SoldierसैनिकIndependence Dayस्वातंत्र्य दिन