शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

गोळ्या झेलूनही ध्वजारोहणाचा मान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 22:37 IST

देशाच्या सीमांचे रक्षण करताना शत्रूच्या गोळ्या खायच्या आम्ही. बलिदानानंतर गावाकडे अंतिम संस्कार करताना चार बंदुकीच्या फैरी झाडल्या की झाला आमचा सन्मान. निवृत्तीनंतर साधा ध्वजारोहणाचा मानही आम्हाला मिळत नाही. हा प्रकार किती दिवस चालायचा, असा प्रश्न सेवानिवृत्त लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देमाजी सैनिकाची खंत । निवृत्त लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांची खदखद

संजय भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : देशाच्या सीमांचे रक्षण करताना शत्रूच्या गोळ्या खायच्या आम्ही. बलिदानानंतर गावाकडे अंतिम संस्कार करताना चार बंदुकीच्या फैरी झाडल्या की झाला आमचा सन्मान. निवृत्तीनंतर साधा ध्वजारोहणाचा मानही आम्हाला मिळत नाही. हा प्रकार किती दिवस चालायचा, असा प्रश्न सेवानिवृत्त लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांनी उपस्थित केला आहे.१५ आॅगस्टला सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्या पार्श्वभूमिवर त्यांनी ‘लौकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, देशाचा ध्वज उंच राहावा म्हणून सैनिक बलिदान करतात. मात्र जिवंतपणी आमच्या नशिबी नरक यातना येतात. आता सैनिकाच्या सन्मानात बदल झाला पाहिजे, अशी अपेक्षा घेऊन ते अन्य सैनिकांच्या अधिकारासाठी लढत आहे. सैनिकाच्या डोळ्यासमोर केवळ एकच विचार असतो, देशाचे संरक्षण करणे. मृत्यू केव्हा येईल हे सांगता येत नाही. डोळ्यात तेल घालून सीमेचे संरक्षण करताना आधी देश, नंतर कुटुंब हाच विचार मनात असतो. कित्येकदा कुटुंबातील सदस्यांचे छायाचित्र व त्यांची पत्रे खिशात घालूनच पहारा द्यावा लागतो, असे त्यांनी सांगितले.लक्ष्मणराव कानडे रा.मुडाणा यांच्या बालपणीच आई-वडिलांचा मृत्यू झाला. १९६४ मध्ये लक्ष्मणराव कानडेसह ७0 युवक यवतमाळला सैन्य भरतीसाठी गेले. त्या सर्वांची निवड झाली. कानडे यांना मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव ट्रेनिंग सेंटर येथे पहिली नियुक्ती मिळाली. प्रशिक्षण पूर्ण झाले त्यावेळी बांगलादेशचे युद्ध संपले होते. युद्ध संपल्यामुळे जनतेत जाऊन मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले होते. यानंतर त्यांची नियुक्ती लेह-लडाख येथे झाली. तेथे केवळ बर्फ आणि बर्फातच त्यांनी दिवस-रात्र काढली. निवृत्तीनंतर गाव, खेड्यांमध्ये सैनिकाच्या हस्ते साधे ध्वजारोहण केले जात नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.तहसीलमध्ये सैनिकांची माहितीच नाहीमाजी सैनिकांसाठी तालुका तेथे कार्यालयाकरिता जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी कानडे यांनी केली. १५ आॅगस्ट आला की आमची छाती भरून येते. मात्र दुर्दैव असे की निवृत्त सैनिकांची माहिती तहसीलमध्ये उपलब्ध नाही. ध्वजारोहणाचे साधे निमंत्रणही मिळत नाही. लान्स नायक लक्ष्मणराव कानडे यांनी निवृत्त सैनिकांच्या विविध समस्या शासन स्तरावर सोडवून घेण्याकरिता ‘जय जवान माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थे’ची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून माजी सैनिक रामदास वंजारे, संजय राठोड, दत्तराव टेकाळे, प्रयागबाई हिंगाडे, जगदेव हिंगमिरे, राजू कानडे, रंगराव आखरे, नंदाताई अंभोरे अहोरात्र काम करीत आहेत.

टॅग्स :SoldierसैनिकIndependence Dayस्वातंत्र्य दिन