शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

जिल्हा सहकारी बॅंकेवर महाविकास आघाडीचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 05:00 IST

जिल्हा बॅंक संचालकाच्या २१ जागा आहेत. त्यापैकी तालुका गटाच्या पुसद व उमरखेड येथील जागा बिनविरोध झाल्या. तेथे अनुक्रमे अनुकूल विजय चव्हाण आणि प्रकाश पाटील देवसरकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित १९ जागांसाठी सोमवार २१ डिसेंबर रोजी २९ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. त्याची मतमोजणी दारव्हा रोड स्थित गुरुदेव मंगल कार्यालयात मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली. अवघ्या तासभरात तालुका गटाचे निकाल येणे सुरू झाले.

ठळक मुद्देसर्वाधिक १६ जागांवर कब्जा : भाजप समर्थित पॅनलला दोन तर अपक्षांना तीन जागा, ११ नवे चेहरे तर दहा रिपीट

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या तब्बल १३ वर्षांनी झालेल्या संचालक मंडळ निवडणुकीत शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीने वर्चस्व स्थापन केले आहे. २१ पैकी सर्वाधिक १६ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. भाजप समर्थित शेतकरी सहकार विकास आघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. तर अपक्षांनी तीन जागांवर विजय मिळविला. महाविकास आघाडीची सत्ता आली असली तरी नेर व दिग्रस येथील उमेदवारांचा झालेला पराभव पालकमंत्री संजय राठाेड यांच्यासाठी धक्कातंत्र मानला जातो. भाजप समर्थित पॅनलमधीलही समन्वयकासह प्रमुख उमेदवार पराभूत झाले आहे. जिल्हा बॅंक संचालकाच्या २१ जागा आहेत. त्यापैकी तालुका गटाच्या पुसद व उमरखेड येथील जागा बिनविरोध झाल्या. तेथे अनुक्रमे अनुकूल विजय चव्हाण आणि प्रकाश पाटील देवसरकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित १९ जागांसाठी सोमवार २१ डिसेंबर रोजी २९ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. त्याची मतमोजणी दारव्हा रोड स्थित गुरुदेव मंगल कार्यालयात मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली. अवघ्या तासभरात तालुका गटाचे निकाल येणे सुरू झाले. तालुका गटातच नव्हे तर जिल्हा गटातही काट्याची लढत पहायला मिळाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक १६ जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांमध्ये टिकाराम कोंगरे (वणी), संजय देरकर (मारेगाव), राजीव येल्टीवार (झरीजामणी), बाबूपाटील वानखडे (कळंब), मनीष पाटील (आर्णी), शिवाजी राठोड (महागाव), आशिष लोणकर (घाटंजी), वर्षा तेलंगे (राळेगाव), वसंत घुईखेडकर (जिल्हा गट- यवतमाळ), राजूदास जाधव (जिल्हा गट- यवतमाळ),  संजय मोघे (जिल्हा गट- आर्णी), अनुकूल चव्हाण (पुसद), प्रकाश देवसरकर (उमरखेड), ॲड. शंकरराव राठोड (दारव्हा), शैलजा बोबडे (महिला गट- यवतमाळ), स्मिता कदम ( महिला गट- महागाव) यांचा समावेश आहे. भाजप समर्थित शेतकरी सहकार विकास आघाडीला केवळ दोन जागा मिळाल्या. त्यामध्ये अमन गावंडे (बाभूळगाव), राधेश्याम अग्रवाल (यवतमाळ) यांचा समावेश आहे. या निवडणुकीत  तीन अपक्ष उमेदवारांनीही बाजी मारली. त्यात संजय देशमुख (दिग्रस), प्रकाश मानकर (पांढरकवडा), स्नेहल भाकरे (नेर)  यांचा समावेश आहे.  जिल्हा बॅंकेच्या या निवडणुकीत शिवसेना व भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जिल्ह्यात भाजपचे सहा आमदार असताना भाजप समर्थित पॅनलला केवळ दोन जागा मिळविता आल्या.  जिल्हा बॅंकेच्या या निवडणुकीत जिल्हा गटामध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली. राजूदास जाधव आणि नाना गाडबैले यांच्यात काट्याची लढत झाली. गाडबैले यांची पाच मतांची आघाडी घोषित झाल्यानंतर राजूदास जाधव यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यानंतर केवळ एका मताचा फरक राहिला. यावेळी प्रचंड ओढाताण, आकडेमोड  व राजकीय घडामोडी घडल्या. त्यानंतर राजूदास जाधव यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रमेश कटके यांनी विजयी घोषित केले. जिल्हा बॅंकेच्या या निवडणुकीत मतदारांनी परंपरागत चेहऱ्यांना नाकारले. २१ पैकी तब्बल ११ नवीन चेहरे मतदारांनी बॅंकेत पाठविले. या नव्या चेहऱ्यांनी राजकीय दिग्गजांना चांगलीच धूळ चारली. तर दहा संचालक पुन्हा निवडून आले. माजी अध्यक्ष ॲड. विनायक एकरे, डॉ. रवींद्र देशमुख, नरेंद्र बोदकुरवार हे प्रमुख संचालक पराभूत झाले. तर मावळते अध्यक्ष अमन गावंडे, माजी अध्यक्ष मनीष पाटील हे बॅंकेत पुन्हा निवडून आले. या निवडणुकीत बॅंकेत माजी राज्यमंत्री, माजी आमदार पुन्हा निवडून आले आहेत. काही तालुका गटात मतदारांना ‘हाय रेट’  या निवडणुकीत सर्व मतदारांच्या नजरा या झरी, नेर व कळंब तालुक्यात लागल्या होत्या. कारण तेथे आर्थिकदृष्ट्या भक्कम उमेदवार रिंगणात होते. तेथील दरही बरेच ‘हाय’ असल्याचे चर्चिले गेले. परंतु नेर व कळंब तालुक्यात मतदारांनी पैश्याऐवजी व्यक्तीला अधिक पसंती दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. 

पराभूतांमार्फत ‘रिकव्हरी’ सुरू बॅंकेच्या या निवडणुकीत सर्वत्रच पैसा मोठ्या प्रमाणात चालला. काही मतदारांनी दोन्हीकडून पैसा ओढला. त्यामुळे आता काही ठिकाणी ‘रिकव्हरी’ही सुरू होण्याची शक्यता आहे. पांढरकवडा येथे अशाच रिकव्हरीवरून सोमवारी विजयी उमेदवाराच्या घरापुढे पराभूताच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला. अखेर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. या घटनेची जिल्ह्यात कळंब, नेर व इतरही तालुक्यात पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक काळात उमेदवारांनी पार्ट्याही मोठ्या प्रमाणात दिल्या. मात्र कळंब तालुक्यात अखेरच्या चार दिवसात काही मतदार दोन्ही उमेदवारांच्या ‘भेटी’ घेतल्याने पर्दाफाश होण्याच्या भीतीने दोघांच्याही पार्ट्यांना गैरहजर राहिले.

ॲड. शंकरराव राठोड चौथ्यांदा विजयी  जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत दारव्हा येथील ॲड. शंकरराव राठोड सलग चौथ्यांदा बॅंकेवर निवडून आले आहेत. सद्यस्थितीत ते सर्वात ज्येष्ठ संचालक आहे. कळंब तालुका गटातील चंद्रकांत उर्फ बाबूपाटील वानखडे तिसऱ्यांदा बॅंकेवर संचालक म्हणून निवडून आले आहे. अन्य काही संचालक दुसऱ्यांना निवडून आले.  

 

टॅग्स :bankबँक