शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

थेट नगराध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा

By admin | Updated: October 21, 2016 02:11 IST

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याने त्यांचा कार्यकाळ आणि अविश्वास प्रक्रियेसंदर्भातील संभ्रम दूर झाला आहे.

निवडणूक विभाग : दोन वर्षानंतर आणता येणार अविश्वास यवतमाळ : थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याने त्यांचा कार्यकाळ आणि अविश्वास प्रक्रियेसंदर्भातील संभ्रम दूर झाला आहे. नगराध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा राहणार आहे असून दोन वर्षानंतर अविश्वास आणता येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली. राज्य शासनाने नगरपरिषदेत स्थिर सत्ता देण्यासाठी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ५ आक्टोबर रोजी आरक्षण काढण्यात आले. मात्र त्यानंतरही अध्यक्षपदाचा कार्यकाळी किती वर्षांचा राहणार, थेट जनतेतून आल्याने नगराध्यक्ष, नगरसेवकांना उत्तरदायी राहणार की नाही, याबाबत संभ्रम होता. नगराध्यक्ष थेट जनेतून असला तरी त्यांना सभागृहात बहुमतानेच निर्णय घ्यावा लागणार आहे. सदस्यांना दोन तृतीयांश बहुमताने अविश्वास आणता येणार आहे. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे देशमुख यांनी जाहीर केले. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्र आयोगाने दिलेल्या वेब साईटवर भरावयाचा आहे. त्यानंतर या अर्जाची प्रिन्ट काढून तो अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जमा करावयाचा आहे. हे नामनिर्देशन पत्र २९ सप्टेंबरला दुपारी ३ वाजतापर्यंत स्वीकारण्यात येईल. नंतर छाननी, नामांकन मागे घेणे आणि प्रत्यक्ष मतदान २७ नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्याच दिवशी २८ नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यवतमाळात एकूण २८५ मतदार केंद्र राहणार आहे. शहरात मतदारांची संख्या दोन लाख ३३ हजार ४०५ असून त्यात एक लाख १९ हजार ६८८ पूरश, तर एक लाख १३ हजार ६९९ महिला आणि इतर १८ मतदार आहे. २८ प्रभागातील प्रत्येक मतदान केंद्रावर ८०० ते ८५० इतकेच मतदार राहणार आहे. मतदाराला दोन बॅलेट युनिटमध्ये तीन मतदान करायचे आहे. पहिले बॅलेट युनिट नगरसेवकांसाठी असून तेथे दोन बटन दाबायचे आहे. नगराध्यक्षासाठीच्या बॅलेट युनिटमध्ये एक बटन दाबायचे आहे. या दोन्ही युनिटमध्ये नोटाचे बटन देण्यात आले असून मतदारांचा नकाराधिकार कायम ठेवण्यात आला आहे. शहरात आदर्श अचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यकरिता चार पथक तयार करण्यात आले आहे. या सोबतच व्हिडीओग्राफी सर्व्हेलियन्स पथक राहील. या पथकात चार कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर आणि एक पोलीस अधिकारी राहील. आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार देण्यासाठी १८००२३३६३५८ टोल फ्री क्रमांक आहे. शहरातील आर्णी रोड, पाढंरकवडा रोड, बाभूळगांव रोड, दारव्हा रोड या चार ठिकाणी चेकपोस्टच्या माध्यमातून दारू, पैसा, प्रचार साहित्य, अवैध शस्त्र यावर पाळत ठेवली जाईल्. उमेदवारांना तहसीलमध्ये वाहन परवाना, प्रचार कार्यालय परवाना, फ्लॅक्स, बॅनर परवाना, सभा, लाउडस्पिकर, मिरवणूक आदी परवानगी घेण्यासाठी एक खिडकीची व्यवस्था करण्यात आल्याचे राजेंद्र देशमुख यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)