शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

थेट नगराध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा

By admin | Updated: October 21, 2016 02:11 IST

थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याने त्यांचा कार्यकाळ आणि अविश्वास प्रक्रियेसंदर्भातील संभ्रम दूर झाला आहे.

निवडणूक विभाग : दोन वर्षानंतर आणता येणार अविश्वास यवतमाळ : थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड होणार असल्याने त्यांचा कार्यकाळ आणि अविश्वास प्रक्रियेसंदर्भातील संभ्रम दूर झाला आहे. नगराध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा राहणार आहे असून दोन वर्षानंतर अविश्वास आणता येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली. राज्य शासनाने नगरपरिषदेत स्थिर सत्ता देण्यासाठी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ५ आक्टोबर रोजी आरक्षण काढण्यात आले. मात्र त्यानंतरही अध्यक्षपदाचा कार्यकाळी किती वर्षांचा राहणार, थेट जनतेतून आल्याने नगराध्यक्ष, नगरसेवकांना उत्तरदायी राहणार की नाही, याबाबत संभ्रम होता. नगराध्यक्ष थेट जनेतून असला तरी त्यांना सभागृहात बहुमतानेच निर्णय घ्यावा लागणार आहे. सदस्यांना दोन तृतीयांश बहुमताने अविश्वास आणता येणार आहे. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे देशमुख यांनी जाहीर केले. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्र आयोगाने दिलेल्या वेब साईटवर भरावयाचा आहे. त्यानंतर या अर्जाची प्रिन्ट काढून तो अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जमा करावयाचा आहे. हे नामनिर्देशन पत्र २९ सप्टेंबरला दुपारी ३ वाजतापर्यंत स्वीकारण्यात येईल. नंतर छाननी, नामांकन मागे घेणे आणि प्रत्यक्ष मतदान २७ नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्याच दिवशी २८ नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यवतमाळात एकूण २८५ मतदार केंद्र राहणार आहे. शहरात मतदारांची संख्या दोन लाख ३३ हजार ४०५ असून त्यात एक लाख १९ हजार ६८८ पूरश, तर एक लाख १३ हजार ६९९ महिला आणि इतर १८ मतदार आहे. २८ प्रभागातील प्रत्येक मतदान केंद्रावर ८०० ते ८५० इतकेच मतदार राहणार आहे. मतदाराला दोन बॅलेट युनिटमध्ये तीन मतदान करायचे आहे. पहिले बॅलेट युनिट नगरसेवकांसाठी असून तेथे दोन बटन दाबायचे आहे. नगराध्यक्षासाठीच्या बॅलेट युनिटमध्ये एक बटन दाबायचे आहे. या दोन्ही युनिटमध्ये नोटाचे बटन देण्यात आले असून मतदारांचा नकाराधिकार कायम ठेवण्यात आला आहे. शहरात आदर्श अचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यकरिता चार पथक तयार करण्यात आले आहे. या सोबतच व्हिडीओग्राफी सर्व्हेलियन्स पथक राहील. या पथकात चार कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर आणि एक पोलीस अधिकारी राहील. आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार देण्यासाठी १८००२३३६३५८ टोल फ्री क्रमांक आहे. शहरातील आर्णी रोड, पाढंरकवडा रोड, बाभूळगांव रोड, दारव्हा रोड या चार ठिकाणी चेकपोस्टच्या माध्यमातून दारू, पैसा, प्रचार साहित्य, अवैध शस्त्र यावर पाळत ठेवली जाईल्. उमेदवारांना तहसीलमध्ये वाहन परवाना, प्रचार कार्यालय परवाना, फ्लॅक्स, बॅनर परवाना, सभा, लाउडस्पिकर, मिरवणूक आदी परवानगी घेण्यासाठी एक खिडकीची व्यवस्था करण्यात आल्याचे राजेंद्र देशमुख यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)