शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

पाच गावांचा राळेगावशी संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2016 00:39 IST

नाल्याला आलेल्या पुरामुळे पाच गावांचा राळेगावशी संपर्क तुटला आहे. कामानिमित्त राळेगाव येथे

नाल्याला पूर : ६० जणांना पाणी उतरण्याची प्रतीक्षा राळेगाव : नाल्याला आलेल्या पुरामुळे पाच गावांचा राळेगावशी संपर्क तुटला आहे. कामानिमित्त राळेगाव येथे आलेल्या ५० ते ६० जणांना आपल्या गावी जाण्यासाठी पूर उतरण्याची प्रतीक्षा आहे. वाऱ्हा आणि मेंगापूर मार्गावर असलेल्या नाल्याला आलेल्या पुरामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. वाऱ्हा, लिंगापूर, आष्टा, सगना, संगम, बोरी या गावातील नागरिकांचा राळेगावशी संपर्क तुटला आहे. यातील काही गावातील ५० ते ६० नागरिक राळेगावकडे अडकून पडले आहे. त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था तालुका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तहसीलदार हेमंत गांगुर्डे हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. शनिवारी दुपारपासून राळेगाव परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. आधीच दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यांना या पावसामुळे पूर आला. चार ते पाच फूट पाणी पुलावरून वाहत आहे. यामुळे सदर गावातील काही कामानिमित्त राळेगाव येथे आलेले नागरिक अडकून पडले आहे. पूर आलेला नाला राळेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. पाऊस थांबल्याने पूर ओसरणे सुरू झाले होते. मात्र अडकून पडलेल्या नागरिकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था तालुका प्रशासनाकडून केली जात आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्याच्या काही भागातील शेतामध्ये पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने पिके पिवळी पडून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी) धनोडा येथे पैनगंगेत एक जण वाहून गेला धनोडा : पैनगंगा नदीत पोहण्यासाठी उतरलेला एक जण वाहून गेल्याची घटना शनिवारी दुपारी ५.४५ वाजता घडली. उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. दरम्यान, या घटनेची तक्रार माहूर पोलिसात देण्यात आली आहे.एका चारचाकी वाहनाने माहूरकडे जात असलेले १२ ते १३ जण पैनगंगा नदीजवळ थांबले. यातील दोघांनी पोहण्यासाठी बंधाऱ्यावरून नदीमध्ये उडी घेतली. यातील एक जण बाहेर निघाला. दुसरा मात्र वाहून गेला. बराच वेळपर्यंत त्याचा शोध लागला नाही. अखेर सोबतच्या लोकांनी माहूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सदर वाहनातून आलेले नागरिक दारव्हा परिसरातील असल्याचे सांगितले जात होते. (वार्ताहर)