शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाचही तालुके झाले नक्षलमुक्त

By admin | Updated: January 29, 2015 23:16 IST

नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाणारे जिल्ह्यातील वणी, मारेगाव, पांढरकवडा, आर्णी व घाटंजी हे पाचही तालुके नक्षलमुक्त झाल्याचे शासनाने घोषित केले़ त्यामुळे या पाच तालुक्यांना मिळणाऱ्या

कर्मचाऱ्यांचे वेतन घटले : भारनियमनाचे भूत बसले मानगुटीवरवणी : नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाणारे जिल्ह्यातील वणी, मारेगाव, पांढरकवडा, आर्णी व घाटंजी हे पाचही तालुके नक्षलमुक्त झाल्याचे शासनाने घोषित केले़ त्यामुळे या पाच तालुक्यांना मिळणाऱ्या विशेष सुविधा व निधी यांना लगाम लागणार आहे़ पाचही तालुक्यातील हजारो शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनात घट होणार आहे़ सोबतच वीज वितरण कंपनीला विजेचे भारनियमन करण्यास मोकळीक मिळाली आहे़जिल्ह्यातील वणी, झरी, पांढरकवडा, आर्णी, घाटंजी हे पाच तालुके आंध्र प्रदेश सीमेला लागून आहे़ या पाचही तालुक्यांत जंगली भूभाग मोठ्या प्रमाणात आहे़ मोठी वनसंपदा आहे. त्यामुळे कधी काळी या भागात नक्षली कारवाया होण्याची चिन्हे दिसत होती़ काही वर्षांपूर्वी वणी तालुक्यातील साखरा (कोलगाव) येथे नक्षलवाद्यांनी एस़टी़महामंडळाची बस पेटविली होती़ त्यामुळे पोलीस संचालकांच्या अहवालावरून हे पाचही तालुके सन २००२ मध्ये नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते़हे पाचही तालुके नक्षलग्रस्त घोषित झाले तेव्हापासून अर्थात सन २००२ पासून या पाच तालुक्यांना नक्षलग्रस्त विभागाला मिळणारा विशेष निधी मिळत होता. सोबतच या पाचही तालुक्यात काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती व पाचव्या वेतन आयोगाच्या मूळ वेतनावर १५ टक्के नक्षलग्रस्त भत्ता मिळत होता़ त्यामुळे या पाच तालुक्यातील कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील कर्मचाऱ्यांपेक्षा हजार-दोन हजार रूपये अधिक वेतन मिळत होते़ दरम्यान, गेल्या १० ते १२ वर्षांपासून या पाचही तालुक्यात एकाही ठिकाणी नक्षली कारवाई झाली नाही़ तरीही शासनाच्या कोट्यवधी रूपयांचा निधी केवळ जादा वेतनावर अकारण खर्च होत होता़ राज्याच्या पोलीस महासंचालकांनी नक्षलग्रस्त भागाचा वेळोवेळी आढावा घेऊन काही वेळा या विशेष योजनेला मुदतवाढही दिली़ त्यामुळे कर्मचाऱ्यांवर शासनाची १० ते १२ वर्षे कृपा कायम राहिली. मात्र राज्याच्या विद्यमान पोलीस महासंचालकांनी यावर्षी राज्यातील सर्व नक्षलग्रस्त भागांचा आढावा घेतला व ज्या भागात गेल्या कित्येक वर्षांपासून एकही नक्षली कारवाई झाली नाही़, त्या तालुक्यांना नक्षलमुक्त म्हणून घोषित केले़ यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यासह यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश आहे़शासनाने आता हे पाच तालुके नक्षलमुक्त म्हणून घोषित केल्याने जानेवारी २०१५ या महिन्याच्या वेतनापासून कर्मचाऱ्यांचा नक्षल भत्ता बंद करण्याचे, तसेच कालबध्द पदोन्नती मागे घेण्याचे आदेश विविध विभागांना प्राप्त झाले आहेत़ परिणामी या पाचही तालुक्यातील प्रत्येक कर्मचारी, शिक्षक यांचे वेतन हजार-दोन हजार रूपयांनी कमी होणार आहे. यापूर्वी नक्षलग्रस्त भागात रात्रीचे वीज भारनियमन करू नये, असा शासनाचा आदेश होता़ त्यामुळे या पाचही तालुक्यात रात्री भारनियमन होत नव्हते़ मात्र आता जनतेला रात्रीच्या वीज भारनियमनालाही सामोरे जावे लागणार आहे़ नक्षलग्रस्त कृती कार्यक्रमांतर्गत मिळणारा विशेष निधीही आता या पाच तालुक्यांना मिळणार नाही. परिणामी काही प्रमाणात विकासाची दारेही बंद होणार आहे़ राज्याचे पोलीस महासंचालक आता २०१६ मध्ये पुन्हा या भागातील नक्षल कारवायांचा आढावा घेणार आहे़ या काळात एखाद्या ठिकाणी नक्षली कारवाई झाल्यास, पुन्हा तो भाग नक्षलग्रस्त घोषित होण्याची शक्यता आहे. तथापि कोणतीही कारवाई झाल्याचे निष्पन्न न झाल्यास हा भाग कायमचा नक्षलमुक्त होण्याची शक्यता बळावली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)