शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पाचही आमदार मांडणार लेखाजोखा

By admin | Updated: October 15, 2015 02:52 IST

जिल्ह्यातील भाजपाचे पाचही आमदार गेल्या वर्षभरात आपल्या विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणकोणती कामगिरी केली,

युती सरकारची वर्षपूर्ती : मुंबईत आज बैठकयवतमाळ : जिल्ह्यातील भाजपाचे पाचही आमदार गेल्या वर्षभरात आपल्या विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणकोणती कामगिरी केली, याचा लेखाजोखा गुरुवारी १५ आॅक्टोबर रोजी मुंबईत मांडणार आहे. भाजपा-शिवसेना युती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व भाजपा आमदारांची खास बैठक गुरुवारी मुंबईत होत आहे. या बैठकीसाठी भाजपाचे यवतमाळचे आमदार मदन येरावार, राळेगावचे आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने, आर्णी-केळापूरचे आमदार प्रा.राजू तोडसाम आणि वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार बुधवारी सायंकाळी रवाना झाले. या आमदारांनी आपल्या वर्षभरातील कामगिरीचा मोठा अहवालच सोबत नेला आहे. गेल्या वर्षभरात आपल्या विधानसभा मतदारसंघात कोणती विकास कामे केली, पक्ष-संघटन वाढीच्या दृष्टीने नेमक्या काय योजना आखल्या, किती ग्रामपंचायतींवर आपल्या गटाचे वर्चस्व मिळविले, आता १ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी काय व्यूहरचना केली, मुख्यमंत्र्यांचे मिशन असलेल्या जलयुक्त शिवारमध्ये विधानसभा मतदारसंघात किती पाणी साठले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृतीच्या काय उपाययोजना हाती घेतल्या, अशा विविध पैलूंनी जिल्ह्यातील पाचही आमदारांकडून आढावा घेतला जाणार आहे. त्या दृष्टीने आमदारांनीही तयारी केली आहे. बरेच काही दाखविण्याचा प्रयत्न या आमदारांकडून होणार असला तरी प्रत्यक्षात त्यांच्या मतदारसंघात गेल्या वर्षभरात खरोखरच काय कामगिरी झाली हे तपासणे सरकार व पक्ष श्रेष्ठींसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामपंचायती या पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नाहीत, म्हणून अनेक ग्रामपंचायतींवर आपलाच वरचष्मा असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न आमदारांकडून होण्याची शक्यता आहे. अनेक विधानसभा मतदारसंघात आजही सत्ताधारी भाजपा पेक्षा काँग्रेसच्याच आमदारांची वेगाने आणि अधिक संख्येने कामे होत असल्याचे बोलले जाते. भाजपाच्या ताब्यातील या मतदारसंघांमध्ये अद्यापही काँग्रेसचेच वर्चस्व प्रशासनात पहायला मिळते. सत्ताधारी आमदाराएवढाच किंवा काही ठिकाणी त्या पेक्षाही अधिक सन्मान अधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या पराभूत आमदार व नेत्यांना दिला जात असल्याची भाजपा कार्यकर्त्यांची भावना आहे. निवडणुकीत जीवाचे रान करून आमदारांना निवडून आणले, मात्र आता त्यांच्या भोवती उपरे आणि दलालांचाच विळखा राहतो, कार्यकर्त्यांना साध्या भेटीसाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते, घेऊन आलेल्या कामाचे तर दूरच अशा शब्दात भाजपाचे सामान्य कार्यकर्ते आमदारांप्रती आपली नाराजी अवघ्या वर्षभरातच बोलून दाखवित आहे. भाजपा-शिवसेना सत्तेत असले तरी वणीत या पक्षाच्या नेत्यांमधील वाक्युद्ध सर्वांनाच अनुभवायला मिळाले. सूत गिरणीची निवडणूक त्याचे निमित्त ठरली. सूत गिरणीत २१ पैकी सर्वाधिक ११ जागा मिळवूनही भाजपाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांना आपला अध्यक्ष बसविता आला नाही. आमदारांच्या खेळीला काँग्रेसने सुरुंग लावला. त्याला सेनेची साथ असल्याचा भाजपाचा आरोप आहे. त्यातूनच सेना व भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांवर जाहीर आरोप केले. (जिल्हा प्रतिनिधी) शिवसेनेच्या ‘ट्रिटमेंट’ची चाचपणीराज्यातील भाजपा आमदारांच्या या जम्बो बैठकीमागे वर्षपूर्ती हे प्रमुख कारण सांगितले गेले असले, तरी प्रत्यक्षात शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेबाबत आमदारांची मते जाणून घेतली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. जिल्ह्यातील पाचही आमदार विकास निधी, पक्ष विस्तार, मानसन्मान आदी मुद्यांवरून शिवसेनेपासून दुखावले आहेत. मात्र अद्याप त्याबाबत त्यांनी जाहीर वाच्छता केलेली नाही. पक्ष स्तरावर मात्र त्यांनी ही बाब वेळोवेळी पोहोचविली आहे. पालकमंत्री पद शिवसेनेकडे असल्याने सामाजिक, शासकीय आणि विकास कामांमध्ये सेनेचाच वरचष्मा राहतो, निधीसाठीही बरीच ओढाताण करावी लागते, प्रोटोकॉलनुसार सन्मान राखला जात नाही, असा भाजपाच्या गोटातील सूर आहे. पाच आमदार असूनही मंत्रिपद मिळाले नसल्याने पक्ष वाढीच्या दृष्टीने फटका बसतो आहे. त्यातच पालकमंत्री पद सेनेकडे असल्याने आणि त्यातही महसूल खाते असल्याने प्रशासनावर सेनेचीच पकड आहे. त्यामुळे पाच आमदार असलेल्या भाजपाला दुय्यम वागणूक मिळत असल्याचा सूर आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत भाजपाने सत्तेत रहावे की नाही असा प्रश्न पुढे आल्यास या आमदारांकडून एखादवेळी ‘निगेटिव्ह’ रिमार्क मिळण्याची दाट शक्यता राजकीय गोटात वर्तविली जात आहे.