शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाख टन ऊस धोक्यात

By admin | Updated: December 10, 2015 02:43 IST

तालुक्याची जीवनदायी पैनगंगा हिवाळ्यातच आटल्याने तालुक्यातील तब्बल पाच लाख टन ऊस वाळण्याची भीती निर्माण झाली आहे.

पैनगंगा आटली : नदी तीरावरील ५५ गावांमध्ये पाणीटंचाईचे सावटअविनाश खंदारे उमरखेडतालुक्याची जीवनदायी पैनगंगा हिवाळ्यातच आटल्याने तालुक्यातील तब्बल पाच लाख टन ऊस वाळण्याची भीती निर्माण झाली आहे. इसापूरचे पाणी भेटत नसल्याने आणि सिंचनात भारनियमन अडथळा निर्माण करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. नदी तीरावरील ५५ गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.उमरखेड तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखान्या कार्यक्षेत्रातील शेतकरी पैनगंगेच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करतात. यंदाही मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्यात आली आहे. परंतु अद्यापपर्यंत कारखाना सुरू झाला नाही, तर दुसरीकडे पैनगंगा नदी आटली आहे. त्यामुळे नदीवर लावलेले मोटरपंप बंद करण्याची वेळ आली आहे. शेतात असलेल्या विहिरीवरून ओलित करावे तर वीज भारनियमनामुळे ओलित करणे शक्य होत नाही. दुसरीकडे इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडले जात नाही. पैनगंगा नदी तीरावरील भांबरखेडा, तिवरंग, झाडगाव, हातला, दिवट पिंपरी, पळशी, नागापूर, बारा, बेलखेड, संगम चिंचोली, मार्लेगाव, तिवडी, लिंबगव्हाण, टाकळी, चालगणी, लोहरा, साखरा, खरूस, दिघडी, कारखेड, देवसरी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, गाजेगाव, सोईट, ढाणकी, विडूळ, सावळेश्वर, करंजी, भोजनगर, पिंपळगाव, जेवली आदी ५५ गावांतील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. तसेच या गावातील नळयोजना पैनगंगेच्या भरोशावरच सुरू असते. मात्र यावर्षी पहिल्यांदाच पैनगंगा हिवाळ्यात आटल्याने नळयोजना प्रभावीत झाल्या आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.