शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

पाच लाख टन ऊस धोक्यात

By admin | Updated: December 10, 2015 02:43 IST

तालुक्याची जीवनदायी पैनगंगा हिवाळ्यातच आटल्याने तालुक्यातील तब्बल पाच लाख टन ऊस वाळण्याची भीती निर्माण झाली आहे.

पैनगंगा आटली : नदी तीरावरील ५५ गावांमध्ये पाणीटंचाईचे सावटअविनाश खंदारे उमरखेडतालुक्याची जीवनदायी पैनगंगा हिवाळ्यातच आटल्याने तालुक्यातील तब्बल पाच लाख टन ऊस वाळण्याची भीती निर्माण झाली आहे. इसापूरचे पाणी भेटत नसल्याने आणि सिंचनात भारनियमन अडथळा निर्माण करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. नदी तीरावरील ५५ गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.उमरखेड तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखान्या कार्यक्षेत्रातील शेतकरी पैनगंगेच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करतात. यंदाही मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्यात आली आहे. परंतु अद्यापपर्यंत कारखाना सुरू झाला नाही, तर दुसरीकडे पैनगंगा नदी आटली आहे. त्यामुळे नदीवर लावलेले मोटरपंप बंद करण्याची वेळ आली आहे. शेतात असलेल्या विहिरीवरून ओलित करावे तर वीज भारनियमनामुळे ओलित करणे शक्य होत नाही. दुसरीकडे इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडले जात नाही. पैनगंगा नदी तीरावरील भांबरखेडा, तिवरंग, झाडगाव, हातला, दिवट पिंपरी, पळशी, नागापूर, बारा, बेलखेड, संगम चिंचोली, मार्लेगाव, तिवडी, लिंबगव्हाण, टाकळी, चालगणी, लोहरा, साखरा, खरूस, दिघडी, कारखेड, देवसरी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, गाजेगाव, सोईट, ढाणकी, विडूळ, सावळेश्वर, करंजी, भोजनगर, पिंपळगाव, जेवली आदी ५५ गावांतील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. तसेच या गावातील नळयोजना पैनगंगेच्या भरोशावरच सुरू असते. मात्र यावर्षी पहिल्यांदाच पैनगंगा हिवाळ्यात आटल्याने नळयोजना प्रभावीत झाल्या आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.